शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

टँकरमाफिया पळवताहेत पाणी

By admin | Updated: March 5, 2016 02:18 IST

शहरात पाणी तुटवडा असतानाच टँकरमाफियांकडून सुरू असलेली पाणीचोरी उघड होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबेच्या मुख्य जलवाहिनीला व्हॉल्व बसवून त्यामधून दररोज ६० ते ७० पाण्याचे टँकर भरले जात आहेत

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईशहरात पाणी तुटवडा असतानाच टँकरमाफियांकडून सुरू असलेली पाणीचोरी उघड होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबेच्या मुख्य जलवाहिनीला व्हॉल्व बसवून त्यामधून दररोज ६० ते ७० पाण्याचे टँकर भरले जात आहेत. तर चोरीचे हेच पाणी अडीच हजार रुपयांना एक टँकर याप्रमाणे शहरवासीयांनाच विकले जात आहे.मोरबे धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने कधीही पाणीकपात होणार नाही, अशा वल्गना करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेलाही पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. गतवर्षी मोरबे धरण क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने शहरवासीयांना सध्या शटडाऊनला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागात कमी दाबाने पुरवठा होत असून, सर्वत्रच पाण्याची चणचण भासत आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत असून, प्रत्येक टँकरमागे सुमारे अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. अशातच नागरिकांच्याच तोंडचे पाणी चोरून टँकरने पुरवले जात असल्याची बाब उघड झाली आहे. शाहबाज गाव येथे रेल्वेपुलाखाली मोरबेच्या मुख्य जलवाहिनीला छेद करून व्हॉल्व बसवण्यात आलेला आहे. त्यावर पाणीउपसा करणारी उच्च क्षमतेची मोटर बसवून टँकरमध्ये पाणी भरले जात आहे. साधारण १०० मीटरच्या अंतरावर तीनहून अधिक ठिकाणी जलवाहिनीला छेद करून त्या ठिकाणी ही पाणीचोरी सुरू आहे. परंतु अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराची माहिती पालिका अधिकाऱ्यांना नाही, याबाबत साशंकता आहे. जुन्या बेलापूर विभाग कार्यालयापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर हा प्रकार सुरू आहे. मात्र अद्याप त्यावर कारवाई झालेली नसल्याने पालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या संमतीनेच ही पाणीचोरी होत असल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. त्या ठिकाणी दररोज १० हजार लिटर क्षमतेचे सुमारे ६० ते ७० पाण्याचे टँकर भरले जात आहेत. यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत टँकरच्या रांगा लागत असून, त्यामधून सुमारे ५ लक्ष लिटर पाणी दररोज चोरीला जात आहे. तर चोरीच्या याच पाण्याची मागणी वाढवण्यासाठी काही ठिकाणी कृत्रिम पाणीटंचाई केली जात असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. 2014-15मध्ये पाणीपुरवठ्यावर ११५ कोटी रुपये खर्च झाले असून, पाणी बिलापोटी अवघे ८६ कोटी ७७ लाख रुपये वसूल झाले आहेत. पालिका क्षेत्रात एकूण ५६ जल उदंचन केंद्रे आहेत. तर एबीआर भूमिगत व उच्चस्तरीय असे पाणी साठवण्यासाठी ११४ जलकुंभ. आहेत. जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी छिद्र पाडून त्यामधून पाण्याची चोरी होत आहे. शहरात टँकरमाफियांचे जाळे पसरले असून चाळी, इमारती, अनेक सोसायट्यांना पिण्यासाठी तसेच विकासकांना बांधकामासाठी चोरीचे पाणी पुरवले जात आहे. शहरात २४ तास पाणीपुरवठा होत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावाही यामुळे फोल ठरला आहे. अनेक विभागांमध्ये अद्यापही दिवसातून किमान दोन तास देखील पाणीपुरवठा होत नाही. तर गळतीची कारणे नजरेसमोर असतानाही प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. शाहबाज गाव येथे रेल्वेपुलाखाली मोरबेच्या मुख्य जलवाहिनीला छेद करून व्हॉल्व बसवण्यात आलेला आहे. त्यावर पाणीउपसा करणारी उच्च क्षमतेची मोटर बसवून टँकरमध्ये पाणी भरले जात आहे. साधारण १०० मीटरच्या अंतरावर तीनहून अधिक ठिकाणी जलवाहिनीला छेद करून त्या ठिकाणी ही पाणीचोरी सुरू आहे.