शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
3
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
4
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
5
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
6
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
7
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
8
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
9
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
10
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
11
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
12
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
13
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
14
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
15
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
16
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
17
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
18
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
19
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
20
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले

टँकरमाफिया पळवताहेत पाणी

By admin | Updated: March 5, 2016 02:18 IST

शहरात पाणी तुटवडा असतानाच टँकरमाफियांकडून सुरू असलेली पाणीचोरी उघड होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबेच्या मुख्य जलवाहिनीला व्हॉल्व बसवून त्यामधून दररोज ६० ते ७० पाण्याचे टँकर भरले जात आहेत

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईशहरात पाणी तुटवडा असतानाच टँकरमाफियांकडून सुरू असलेली पाणीचोरी उघड होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबेच्या मुख्य जलवाहिनीला व्हॉल्व बसवून त्यामधून दररोज ६० ते ७० पाण्याचे टँकर भरले जात आहेत. तर चोरीचे हेच पाणी अडीच हजार रुपयांना एक टँकर याप्रमाणे शहरवासीयांनाच विकले जात आहे.मोरबे धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने कधीही पाणीकपात होणार नाही, अशा वल्गना करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेलाही पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. गतवर्षी मोरबे धरण क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने शहरवासीयांना सध्या शटडाऊनला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागात कमी दाबाने पुरवठा होत असून, सर्वत्रच पाण्याची चणचण भासत आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत असून, प्रत्येक टँकरमागे सुमारे अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. अशातच नागरिकांच्याच तोंडचे पाणी चोरून टँकरने पुरवले जात असल्याची बाब उघड झाली आहे. शाहबाज गाव येथे रेल्वेपुलाखाली मोरबेच्या मुख्य जलवाहिनीला छेद करून व्हॉल्व बसवण्यात आलेला आहे. त्यावर पाणीउपसा करणारी उच्च क्षमतेची मोटर बसवून टँकरमध्ये पाणी भरले जात आहे. साधारण १०० मीटरच्या अंतरावर तीनहून अधिक ठिकाणी जलवाहिनीला छेद करून त्या ठिकाणी ही पाणीचोरी सुरू आहे. परंतु अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराची माहिती पालिका अधिकाऱ्यांना नाही, याबाबत साशंकता आहे. जुन्या बेलापूर विभाग कार्यालयापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर हा प्रकार सुरू आहे. मात्र अद्याप त्यावर कारवाई झालेली नसल्याने पालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या संमतीनेच ही पाणीचोरी होत असल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. त्या ठिकाणी दररोज १० हजार लिटर क्षमतेचे सुमारे ६० ते ७० पाण्याचे टँकर भरले जात आहेत. यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत टँकरच्या रांगा लागत असून, त्यामधून सुमारे ५ लक्ष लिटर पाणी दररोज चोरीला जात आहे. तर चोरीच्या याच पाण्याची मागणी वाढवण्यासाठी काही ठिकाणी कृत्रिम पाणीटंचाई केली जात असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. 2014-15मध्ये पाणीपुरवठ्यावर ११५ कोटी रुपये खर्च झाले असून, पाणी बिलापोटी अवघे ८६ कोटी ७७ लाख रुपये वसूल झाले आहेत. पालिका क्षेत्रात एकूण ५६ जल उदंचन केंद्रे आहेत. तर एबीआर भूमिगत व उच्चस्तरीय असे पाणी साठवण्यासाठी ११४ जलकुंभ. आहेत. जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी छिद्र पाडून त्यामधून पाण्याची चोरी होत आहे. शहरात टँकरमाफियांचे जाळे पसरले असून चाळी, इमारती, अनेक सोसायट्यांना पिण्यासाठी तसेच विकासकांना बांधकामासाठी चोरीचे पाणी पुरवले जात आहे. शहरात २४ तास पाणीपुरवठा होत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावाही यामुळे फोल ठरला आहे. अनेक विभागांमध्ये अद्यापही दिवसातून किमान दोन तास देखील पाणीपुरवठा होत नाही. तर गळतीची कारणे नजरेसमोर असतानाही प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. शाहबाज गाव येथे रेल्वेपुलाखाली मोरबेच्या मुख्य जलवाहिनीला छेद करून व्हॉल्व बसवण्यात आलेला आहे. त्यावर पाणीउपसा करणारी उच्च क्षमतेची मोटर बसवून टँकरमध्ये पाणी भरले जात आहे. साधारण १०० मीटरच्या अंतरावर तीनहून अधिक ठिकाणी जलवाहिनीला छेद करून त्या ठिकाणी ही पाणीचोरी सुरू आहे.