शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

तरणतलाव आठ वर्षे कागदावरच, नवी मुंबई महापालिकेची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 07:08 IST

शहरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असतानाही त्यांना दर्जेदार तरणतलाव उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. तरणतलावासाठी सिडकोकडून भूखंड मिळूनही त्यावरील अवघ्या एका अनधिकृत बांधकामामुळे प्रत्यक्षात त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई - शहरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असतानाही त्यांना दर्जेदार तरणतलाव उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. तरणतलावासाठी सिडकोकडून भूखंड मिळूनही त्यावरील अवघ्या एका अनधिकृत बांधकामामुळे प्रत्यक्षात त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही.सिडकोने २००९ साली वाशी सेक्टर १२ येथील १९६ क्रमांकाचा सुमारे चार हजार चौ.मी.चा भूखंड जलतरण तलावासाठी पालिकेकडे हस्तांतर केला आहे. त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणतलाव उभारण्याच्या हालचाली पालिकेने चालवल्या होत्या. त्याकरिता २०११च्या अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र आठ वर्षांनंतरही तरणतलावाच्या कामाला सुरुवात होऊ शकली नाही.जागतिक स्तरावर महापालिकेचे नाव उंचावणारे जलतरणपटू शहरात राहायला आहेत. त्यांची सरावासाठी दर्जेदार तरणतलाव नसल्याने गैरसोय होत असून आर्थिक फटकाही बसत आहे. शहरात वास्तव्यास असलेल्या जलतरणपटूंमध्ये सुरभी टिपरे, लेखा कामत, ज्योत्सना पानसरे, विराज प्रभू, नचिकेत वाघमारे, शुभम वनमाळी आदींचा समावेश आहे. त्यांनी आशियाई तसेच राष्टÑकुल स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार मिळवले आहेत; परंतु अपेक्षित यश गाठण्यासाठी त्यांना सरावाकरिता आंतरराष्टÑीय दर्जाच्या जलतरण तलावाची आवश्यकता आहे, असा तलाव व चांगले प्रशिक्षक शहरात नसल्याने अवघ्या काही तासांच्या सरावाकरिता त्यांना मुंबई, पुणे अथवा बंगळुरूला जावे लागत आहे. त्यापैकी बहुतांश जलतरणपटू पुण्यातील बालेवाडी येथे जातात. यामध्ये प्रवासातच जास्त वेळ जातो.शहरात काही खासगी क्रीडा संस्थांचे तरणतलाव असून, त्यांची लांबी २५ मीटरची व शुल्कही अधिक आहे; परंतु राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तराच्या स्पर्धा ५० मीटर लांबीच्या तरणतलावात होतात. यामुळे स्पर्धकांना सरावासाठी तेवढ्याच लांबीचा तरणतलाव आवश्यक आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात खासगी व पालिकेचे तरणतलाव आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य दाखवणारे सर्वाधिक जलतरणपटू नवी मुंबईत असतानाही, त्यांना पालिकेच्या तरणतलावाची प्रतीक्षा करावी लागत आहे. २०१३मध्ये तलावाच्या कामाची काढलेली सुमारे ४० कोटींच्या कामाची निविदा अतिक्रमणामुळे रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली आहे. तलावासाठी राखीव भूखंडावरील शिवसेनेच्या अनधिकृत शाखेमुळे प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही.महापालिकेतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. त्याकरिता दर्जेदार शिक्षणाबरोबरच उत्तम खेळाडू घडवण्यावरही भर दिला जातो; परंतु स्वत:चे जलतरण तलाव नसल्याने पालिकेतर्फे होणाºया जलतरण स्पर्धाही खासगी तलावांमध्ये घ्याव्या लागतात, ही शोकांतिका आहे.तरणतलावासाठी भूखंड राखीव असतानाही त्यावरील अतिक्रमण हटवून प्रत्यक्षात कामाला वेळीच सुरुवात करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचाही अभाव दिसून येत आहे. परिणामी, शहरातील राष्टÑीय, आंतरराष्टÑीय दर्जाच्या जलतरणपटूंची गैरसोय होत असून, त्यांच्या यशाच्या मार्गात अनधिकृत बांधकामाचा अडथळा निर्माण झाला आहे.नवी मुंबईत ५० मीटर लांबीचा तलाव नसल्याने सरावासाठी मुंबईत जावे लागते. प्रवासातच वेळ जात असून, सरावादरम्यान थकवाही जाणवतो. पालिकेने सरावासाठी दर्जात्मक तरणतलाव उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.- जोत्सना पानसरे,आंतरराष्टÑीय जलतरणपटूअनधिकृत शाखेमुळे गेली अनेक वर्षे तरणतलावाच्या कामाला सुरुवात होऊ शकली नाही. तसेच वेळेत कामाला सुरुवात न झाल्याने काढलेली निविदाही रद्द करावी लागली आहे; परंतु लवकरच एनएमएमटी डेपो व जलतरण तलाव यांचा एकत्रित आराखडा तयार करून कामाला सुरुवात केली जाईल.- मोहन डगावकर,शहर अभियंता-न.मु.म.पा.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई