शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

तरणतलाव आठ वर्षे कागदावरच, नवी मुंबई महापालिकेची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 07:08 IST

शहरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असतानाही त्यांना दर्जेदार तरणतलाव उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. तरणतलावासाठी सिडकोकडून भूखंड मिळूनही त्यावरील अवघ्या एका अनधिकृत बांधकामामुळे प्रत्यक्षात त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई - शहरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असतानाही त्यांना दर्जेदार तरणतलाव उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. तरणतलावासाठी सिडकोकडून भूखंड मिळूनही त्यावरील अवघ्या एका अनधिकृत बांधकामामुळे प्रत्यक्षात त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही.सिडकोने २००९ साली वाशी सेक्टर १२ येथील १९६ क्रमांकाचा सुमारे चार हजार चौ.मी.चा भूखंड जलतरण तलावासाठी पालिकेकडे हस्तांतर केला आहे. त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणतलाव उभारण्याच्या हालचाली पालिकेने चालवल्या होत्या. त्याकरिता २०११च्या अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र आठ वर्षांनंतरही तरणतलावाच्या कामाला सुरुवात होऊ शकली नाही.जागतिक स्तरावर महापालिकेचे नाव उंचावणारे जलतरणपटू शहरात राहायला आहेत. त्यांची सरावासाठी दर्जेदार तरणतलाव नसल्याने गैरसोय होत असून आर्थिक फटकाही बसत आहे. शहरात वास्तव्यास असलेल्या जलतरणपटूंमध्ये सुरभी टिपरे, लेखा कामत, ज्योत्सना पानसरे, विराज प्रभू, नचिकेत वाघमारे, शुभम वनमाळी आदींचा समावेश आहे. त्यांनी आशियाई तसेच राष्टÑकुल स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार मिळवले आहेत; परंतु अपेक्षित यश गाठण्यासाठी त्यांना सरावाकरिता आंतरराष्टÑीय दर्जाच्या जलतरण तलावाची आवश्यकता आहे, असा तलाव व चांगले प्रशिक्षक शहरात नसल्याने अवघ्या काही तासांच्या सरावाकरिता त्यांना मुंबई, पुणे अथवा बंगळुरूला जावे लागत आहे. त्यापैकी बहुतांश जलतरणपटू पुण्यातील बालेवाडी येथे जातात. यामध्ये प्रवासातच जास्त वेळ जातो.शहरात काही खासगी क्रीडा संस्थांचे तरणतलाव असून, त्यांची लांबी २५ मीटरची व शुल्कही अधिक आहे; परंतु राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तराच्या स्पर्धा ५० मीटर लांबीच्या तरणतलावात होतात. यामुळे स्पर्धकांना सरावासाठी तेवढ्याच लांबीचा तरणतलाव आवश्यक आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात खासगी व पालिकेचे तरणतलाव आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य दाखवणारे सर्वाधिक जलतरणपटू नवी मुंबईत असतानाही, त्यांना पालिकेच्या तरणतलावाची प्रतीक्षा करावी लागत आहे. २०१३मध्ये तलावाच्या कामाची काढलेली सुमारे ४० कोटींच्या कामाची निविदा अतिक्रमणामुळे रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली आहे. तलावासाठी राखीव भूखंडावरील शिवसेनेच्या अनधिकृत शाखेमुळे प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही.महापालिकेतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. त्याकरिता दर्जेदार शिक्षणाबरोबरच उत्तम खेळाडू घडवण्यावरही भर दिला जातो; परंतु स्वत:चे जलतरण तलाव नसल्याने पालिकेतर्फे होणाºया जलतरण स्पर्धाही खासगी तलावांमध्ये घ्याव्या लागतात, ही शोकांतिका आहे.तरणतलावासाठी भूखंड राखीव असतानाही त्यावरील अतिक्रमण हटवून प्रत्यक्षात कामाला वेळीच सुरुवात करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचाही अभाव दिसून येत आहे. परिणामी, शहरातील राष्टÑीय, आंतरराष्टÑीय दर्जाच्या जलतरणपटूंची गैरसोय होत असून, त्यांच्या यशाच्या मार्गात अनधिकृत बांधकामाचा अडथळा निर्माण झाला आहे.नवी मुंबईत ५० मीटर लांबीचा तलाव नसल्याने सरावासाठी मुंबईत जावे लागते. प्रवासातच वेळ जात असून, सरावादरम्यान थकवाही जाणवतो. पालिकेने सरावासाठी दर्जात्मक तरणतलाव उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.- जोत्सना पानसरे,आंतरराष्टÑीय जलतरणपटूअनधिकृत शाखेमुळे गेली अनेक वर्षे तरणतलावाच्या कामाला सुरुवात होऊ शकली नाही. तसेच वेळेत कामाला सुरुवात न झाल्याने काढलेली निविदाही रद्द करावी लागली आहे; परंतु लवकरच एनएमएमटी डेपो व जलतरण तलाव यांचा एकत्रित आराखडा तयार करून कामाला सुरुवात केली जाईल.- मोहन डगावकर,शहर अभियंता-न.मु.म.पा.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई