शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

तरणतलाव आठ वर्षे कागदावरच, नवी मुंबई महापालिकेची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 07:08 IST

शहरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असतानाही त्यांना दर्जेदार तरणतलाव उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. तरणतलावासाठी सिडकोकडून भूखंड मिळूनही त्यावरील अवघ्या एका अनधिकृत बांधकामामुळे प्रत्यक्षात त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई - शहरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असतानाही त्यांना दर्जेदार तरणतलाव उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. तरणतलावासाठी सिडकोकडून भूखंड मिळूनही त्यावरील अवघ्या एका अनधिकृत बांधकामामुळे प्रत्यक्षात त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही.सिडकोने २००९ साली वाशी सेक्टर १२ येथील १९६ क्रमांकाचा सुमारे चार हजार चौ.मी.चा भूखंड जलतरण तलावासाठी पालिकेकडे हस्तांतर केला आहे. त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणतलाव उभारण्याच्या हालचाली पालिकेने चालवल्या होत्या. त्याकरिता २०११च्या अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र आठ वर्षांनंतरही तरणतलावाच्या कामाला सुरुवात होऊ शकली नाही.जागतिक स्तरावर महापालिकेचे नाव उंचावणारे जलतरणपटू शहरात राहायला आहेत. त्यांची सरावासाठी दर्जेदार तरणतलाव नसल्याने गैरसोय होत असून आर्थिक फटकाही बसत आहे. शहरात वास्तव्यास असलेल्या जलतरणपटूंमध्ये सुरभी टिपरे, लेखा कामत, ज्योत्सना पानसरे, विराज प्रभू, नचिकेत वाघमारे, शुभम वनमाळी आदींचा समावेश आहे. त्यांनी आशियाई तसेच राष्टÑकुल स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार मिळवले आहेत; परंतु अपेक्षित यश गाठण्यासाठी त्यांना सरावाकरिता आंतरराष्टÑीय दर्जाच्या जलतरण तलावाची आवश्यकता आहे, असा तलाव व चांगले प्रशिक्षक शहरात नसल्याने अवघ्या काही तासांच्या सरावाकरिता त्यांना मुंबई, पुणे अथवा बंगळुरूला जावे लागत आहे. त्यापैकी बहुतांश जलतरणपटू पुण्यातील बालेवाडी येथे जातात. यामध्ये प्रवासातच जास्त वेळ जातो.शहरात काही खासगी क्रीडा संस्थांचे तरणतलाव असून, त्यांची लांबी २५ मीटरची व शुल्कही अधिक आहे; परंतु राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तराच्या स्पर्धा ५० मीटर लांबीच्या तरणतलावात होतात. यामुळे स्पर्धकांना सरावासाठी तेवढ्याच लांबीचा तरणतलाव आवश्यक आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात खासगी व पालिकेचे तरणतलाव आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य दाखवणारे सर्वाधिक जलतरणपटू नवी मुंबईत असतानाही, त्यांना पालिकेच्या तरणतलावाची प्रतीक्षा करावी लागत आहे. २०१३मध्ये तलावाच्या कामाची काढलेली सुमारे ४० कोटींच्या कामाची निविदा अतिक्रमणामुळे रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली आहे. तलावासाठी राखीव भूखंडावरील शिवसेनेच्या अनधिकृत शाखेमुळे प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही.महापालिकेतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. त्याकरिता दर्जेदार शिक्षणाबरोबरच उत्तम खेळाडू घडवण्यावरही भर दिला जातो; परंतु स्वत:चे जलतरण तलाव नसल्याने पालिकेतर्फे होणाºया जलतरण स्पर्धाही खासगी तलावांमध्ये घ्याव्या लागतात, ही शोकांतिका आहे.तरणतलावासाठी भूखंड राखीव असतानाही त्यावरील अतिक्रमण हटवून प्रत्यक्षात कामाला वेळीच सुरुवात करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचाही अभाव दिसून येत आहे. परिणामी, शहरातील राष्टÑीय, आंतरराष्टÑीय दर्जाच्या जलतरणपटूंची गैरसोय होत असून, त्यांच्या यशाच्या मार्गात अनधिकृत बांधकामाचा अडथळा निर्माण झाला आहे.नवी मुंबईत ५० मीटर लांबीचा तलाव नसल्याने सरावासाठी मुंबईत जावे लागते. प्रवासातच वेळ जात असून, सरावादरम्यान थकवाही जाणवतो. पालिकेने सरावासाठी दर्जात्मक तरणतलाव उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.- जोत्सना पानसरे,आंतरराष्टÑीय जलतरणपटूअनधिकृत शाखेमुळे गेली अनेक वर्षे तरणतलावाच्या कामाला सुरुवात होऊ शकली नाही. तसेच वेळेत कामाला सुरुवात न झाल्याने काढलेली निविदाही रद्द करावी लागली आहे; परंतु लवकरच एनएमएमटी डेपो व जलतरण तलाव यांचा एकत्रित आराखडा तयार करून कामाला सुरुवात केली जाईल.- मोहन डगावकर,शहर अभियंता-न.मु.म.पा.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई