शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

अ‍ॅम्फिबीअस बस प्रकल्पाचा प्रस्ताव स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 02:49 IST

शहरात रोड व पाण्यातून चालणारी अ‍ॅम्फिबीअस बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आठ महिन्यांनंतर पुन्हा सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता.

नवी मुंबई : शहरात रोड व पाण्यातून चालणारी अ‍ॅम्फिबीअस बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आठ महिन्यांनंतर पुन्हा सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता; परंतु राष्ट्रवादी काँगे्रसने या प्रस्तावास आक्षेप घेतला. विरोधी पक्षांनी मात्र ही बससेवा सुरू करण्याचा आग्रह धरला; परंतु सत्ताधारी नगरसेवकांचा विरोध असल्यामुळे तो पुन्हा स्थगित करण्यात आला.नेरुळ सेक्टर-२६ मधील ज्वेल्स आॅफ नवी मुंबईमध्ये व शहरातील महत्त्वाच्या उद्यान परिसरामध्ये ही बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता. या बससेवेसाठी जवळपास जवाहरलाल नेहरू पतन न्यास (जेएनपीटी)ने ही बस महापालिकेला देण्याचा निर्णय घेतला आहे. बसचा पूर्ण खर्च जेएनपीटीच करणार असून, उत्पन्नातील २५ टक्के वाटा पालिकेला दिला जाणार आहे. आयुक्तांनी फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता; परंतु त्या सभेमध्ये या बसमार्गाचा विस्तार करण्यात यावा. वाशीतील सागर विहार व तेथून ऐरोलीपर्यंत ही बससेवा नेण्यात यावी, अशी मागणी सत्ताधारी नगरसेवकांनी केली होती. यानंतर प्रशासनाने जेएनपीटीकडील अधिकाऱ्यांना या विषयी माहिती दिली होती. संबंधितांनी दोन्ही मार्गांचे परीक्षण केले होते. वाशीतील धारण तलावात तीव्र उतार व खडकाळ भाग असल्याने अ‍ॅम्फिबीअस बसचे परिचलन करणे शक्य नसल्याचे नमूद केले आहे. ऐरोली खाडीक्षेत्रात सदर बससेवा सुरू करण्याविषयी फेब्रुवारीमध्ये पाहणी केली होती. क्षेत्रीय वनाधिकारी एम. एस. बोथे यांच्याशीही चर्चा करण्यात आली. या क्षेत्रामध्ये वनविभागाकडून बोट सेवा सुरू आहे. हे क्षेत्र फ्लेमिंगो पक्ष्यांचे आश्रयस्थान असल्यामुळे तेथे सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे प्रशासनाने ज्वेल्स आॅफ नवी मुंबईमध्ये अ‍ॅम्फिबीअस बस सेवा सुरू करण्याविषयीचा प्रस्ताव पुन्हा सर्वसाधारण सभेमध्ये मांडला होता. या विषयावर चर्चा सुरू होण्यापूर्वीच सभागृहनेते रवींद्र इथापे यांनी हा प्रस्ताव स्थगित करण्याची सूचना मांडण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह एम. के. मढवी व इतर नगरसेवकांनी सत्ताधाºयांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने आणलेल्या प्रस्तावामुळे महापालिकेला काहीही खर्च येणार नाही. यामुळे हा प्रस्ताव मंजूर करावा, अशी भूमिका मांडली; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रस्तावात त्रुटी असल्याचे कारण देऊन तो पुन्हा स्थगित केला आहे.>आयुक्तांनी घेतली हरकतसभागृहनेते रवींद्र इथापे यांनी चर्चा सुरू होण्यापूर्वीच बस प्रकल्प स्थगित करण्याची सूचना मांडली. यामुळे आयुक्त रामास्वामी एन. यांनी पाइंट आॅफ आॅर्डर म्हटले. सभागृहामध्ये नगरसेवक दुसºया सदस्याच्या भाषणावर पॉइंट आॅफ आॅर्डर घेत असतात; परंतु पहिल्यांदा आयुक्तांनी अशाप्रकारे हरकत घेतली. सत्ताधाºयांकडून प्रशासनाचे ठराव फेटाळण्याचे किंवा स्थगित करण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे आयुक्तांनी मध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सुरू झाली होती. ही बस जेएनपीटी आपणास देणार असल्यामुळे पालिकेचे काहीही नुकसान होणार नसल्याचे स्पष्ट केले.>विरोधी पक्षाचे नगरसेवक आग्रहीविरोधी पक्षनेते विजय चौगुले, एम. के. मढवी, गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी प्रशासनाने आणलेल्या प्रस्तावामुळे पालिकेचे नुकसान होणार नाही. बससेवा सुरू करणे आवश्यक आहे. सत्ताधाºयांनी विनाकारण त्याला विरोध करू नये, अशी भूमिका मांडली.>सत्ताधाºयांनाबसेसविषयी शंकासत्ताधारी राष्ट्रवादीचे अनंत सुतार, रवींद्र इथापे, देविदास हांडे-पाटील, सूरज पाटील यांनी या विषयावर चर्चा करताना विविध शंका उपस्थित केल्या. या प्रकल्पाला विरोध नाही; परंतु सागर विहार ते ऐरोली दरम्यान बससेवा सुरू करण्यासाठी नक्की काय सर्वेक्षण केले व इतर सर्व माहिती देण्याची मागणी केली. हांडे-पाटील यांनी या बसचा अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित केला.