शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणात पालिकेचा सावळा गोंधळ, परवानाधारकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 3:52 AM

फेरीवाल्यांच्या संदर्भात पालिकेच्या दुटप्पी भूमिकेमुळे परवानाधारक फेरीवाल्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एकीकडे सर्वेक्षण होणार असल्याचे सांगत असताना, दुसरीकडे मात्र परवानाधारक फेरीवाल्यांवरच कारवाईचा धडाका सुरू आहे.

नवी मुंबई : फेरीवाल्यांच्या संदर्भात पालिकेच्या दुटप्पी भूमिकेमुळे परवानाधारक फेरीवाल्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एकीकडे सर्वेक्षण होणार असल्याचे सांगत असताना, दुसरीकडे मात्र परवानाधारक फेरीवाल्यांवरच कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणात सावळागोंधळ सुरू असून मर्जीतल्या फेरीवाल्यांना लाभार्थी करण्यासाठी हा प्रकार होत आहे.पालिकेतर्फे सध्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. उपलब्ध मार्केटमध्ये फेरीवाल्यांना स्थान देण्यापूर्वी हे सर्वेक्षण करून पात्र फेरीवाल्यांना परवाना मिळणार आहेत. यामुळे पूर्वी ज्यांना पालिकेने परवाने दिले होते त्यांच्या आशा निर्माण झाल्या. पालिकेचा परवाना असताना त्यांना मार्केटमध्ये जागा देण्यापासून डावलले जात होते.शुक्रवारी कोपरखैरणेच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई झाली. त्यात परवानाधारक फेरीवाल्यांच्या हातगाड्या व टपºयांची तोडफोड करण्यात आली असल्याचे श्याम कांबळे यांचे म्हणणे आहे. कांबळे यांच्या पत्नीच्या नावे फेरीवाला परवाना असून कोपरखैरणे सेक्टर ८ येथील फेरीवाला भूखंडावर अनेक वर्षांपासून ते व्यवसाय करत आहेत.सदर भूखंडावर अद्ययावत मार्केट उभारणीच्या बहाण्याने तिथल्या सर्वच फेरीवाल्यांना बाहेर काढले होते. यानंतर एक वर्षापासून इमारत बांधून तयार असतानाही फेरीवाल्यांनी पदपथावर व्यवसाय मांडला. दोन दिवसांपूर्वी तेथे पालिकेतर्फे सर्वेक्षण होणार असल्याची नोटीस लावली. यामुळे लवकरच मार्केटमध्ये हक्काची जागा मिळणार या आनंदात फेरीवाले असतानाच कारवाई झाली आहे. यामध्ये १५ ते २० परवानाधारक फेरीवाल्यांच्या टपºया व हातगाड्यांची तोडफोड करण्यात आली. पालिकेच्या या दुटप्पी भूमिकेबाबत संताप व्यक्त करत सर्वेक्षणात सावळागोंधळ असल्याचा आरोप कांबळे यांनी केला. तर अपंग असल्याकारणाने उदरनिर्वाहासाठी परवाना घेऊन सुरू केलेला व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचा संताप चंद्रकांत धनावडे यांनी व्यक्त केला. या कारवाईमागे कटकारस्थान असून अधिकाºयांच्या मर्जीतल्या अनधिकृत फेरीवाल्यांना पालिकेचे ‘लाभार्थी‘ बनवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप कांबळेंनी केला. परवाना असतानाही पालिकेच्या अधिकाºयांनी केलेल्या कारवाईविरोधात ते पोलिसांकडेही तक्रार करण्यासाठी गेले होते. वेळोवेळी पालिकेचे शुल्क भरूनही झालेल्या कारवाईमुळे प्रशासनाकडून आपली फसवणूक झाल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार देऊन पिटाळून लावल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे; परंतु यासंदर्भात विभाग अधिकारी अशोक मढवी यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई