शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
2
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
3
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
4
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
5
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
6
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
7
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
8
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
9
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
10
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
11
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
12
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
13
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
15
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
16
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
17
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
18
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
19
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
20
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल

पाणीटंचाईवर विहिरी, कूपनलिकांची मात्रा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 06:56 IST

पाणीटंचाई निवारण्याकरिता विहिरी, कूपनलिकांचे हे स्रोत पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून आहे. याबाबत सभागृह आणि बाहेर फक्त चर्चाच होत आहे. पूर्वी नगरपालिका आणि आता महापालिकेकडून याविषयी ठोस पावले उचलण्यात येत नाही. म्हणून पनवेलकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पाणीटंचाई निवारण्याकरिता विहिरी, कूपनलिकांचे हे स्रोत पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून आहे. याबाबत सभागृह आणि बाहेर फक्त चर्चाच होत आहे. पूर्वी नगरपालिका आणि आता महापालिकेकडून याविषयी ठोस पावले उचलण्यात येत नाही. म्हणून पनवेलकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सिडको वसाहती आणि २९ महसुली गावांचा समावेश आहे. देहरंग धरणातील बारा एमएलडी पाण्याव्यतिरिक्त महापालिकेच्या मालकीचा दुसरा स्रोत नाही.पनवेल, नवीन पनवेल आणि कळंबोली वसाहती एमजेपीवर अवलंबून आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण टाटा पॉवरने सोडलेले पाणी उचलते आणि तेच सिडको वसाहतींना पुरवते. मात्र सुटीच्या दिवशी हा प्रकल्प बंद असल्याने नदीत पाणी येतच नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पनवेलकरांना कमी पाणी मिळते. जुनाट झालेल्या जलवाहिन्यांमुळे मागणीप्रमाणे पाणी मिळत नाही. देहरंग धरण आटले असल्याने येथून पाणी मिळत नाही. त्यामुळे पनवेल शहराला पाणीटंचाई जाणवू लागली आहे.त्यात एमजेपी आणि एमआयडीकडून पाणीपुरवठा कमी झालाय. समाविष्ट केलेल्या अनेक गावांमध्ये पाण्याचा कोणताही स्रोत नाही. ती गावे बोअरवेलवर अवलंबून राहतात. एकंदरीतच कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा याकरिता एक स्वतंत्र धरण घेण्याबाबतचा पाठपुरावा सुरू आहे.मात्र ही बाब धोरणात्मक असल्याने त्याला विलंब लागेल. म्हणून तात्पुरती उपाययोजना म्हणून पनवेल महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील विहिरी आणि कूपनलिकेतील पाण्याचा वापर करणे सयुक्तिक ठरेल अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी या अगोदरच सभागृहात केली होती. या स्रोताची साफसफाई केली तर टंचाई निवारण्याकरिता त्याचा चांगला वापर होवू शकते हे त्यांनी पटवून दिले आहे.गेल्या काही दिवसांपासून पाणीप्रश्नावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.विहिरी आणि कूपनलिकांचा मुद्दाही प्रकर्षाने पुढे आला आहे. महापालिका प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे.परंतु याबाबत कार्यवाही होताना दिसत नाही.पनवेल नगरपालिका, ग्रामपंचायत अस्तित्वात होती त्यावेळी सुध्दा याबाबत चर्चा होती. मात्र ठोस पावले उचलण्यात आली नाहीत त्यामुळे पनवेलकरांना पाण्याची कमतरता भासत आहे.जुन्या विहिरी आणि बोअरवेल या जलस्रोताचा वापर करण्याचा प्रस्ताव आमच्याकडे आहे. साफसफाई, गाळ काढण्याचे काम करावे लागणार आहे. त्याकरिता आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. आम्ही एमजेपीकडून तीनपेक्षा जास्त एमएलडी पाणी वाढवून घेतले आहे. त्यामुळे फारशी टंचाई निर्माण होणार नाही.- जमीर लेंगरेकर,उपायुक्त,पनवेल महानगरपालिका

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbaiनवी मुंबई