शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

अभ्यासाचा तणाव! दोन अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या; नेरुळ आणि करावे मधील धक्कादायक घटना  

By सूर्यकांत वाघमारे | Updated: December 11, 2023 19:58 IST

दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

नवी मुंबई : दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. नेरुळ व करावे येथे या घटना घडल्या असून दोन्ही मुलांना अभ्यासाचा तणाव होता असे समोर आले आहे. त्यामुळे एकाने तलावात उडी मारून तर दुसऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जड झालेल्या शिक्षणाचा भार विद्यार्थी पेलवू शकत नसल्याचे धक्कादायक घटनेवरून समोर आले आहे. नवी मुंबईत काही तासाच्या अंतराने दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. नेरुळ व करावे गाव याठिकाणी या घटना घडल्या असून त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. करावे येथे राहणाऱ्या दर्शील पाटील (१५) याच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले आहे. वडिलांच्या निधनानंतर आई त्याचे व त्याच्या लहान बहिणीचे संगोपन करत आहे. यामुळे दर्शील याच्यावर कुटुंबियांच्या अपेक्षा होत्या. मात्र अभ्यास जड जात असल्याने आपण कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही असे सतत त्याला वाटत होते. यामुळे त्याचे मानसिक खच्चीकरण झाले होते. अखेर रविवारी मध्यरात्री त्याने आपण आत्महत्या करत असल्याचा मॅसेज बहिणीसह कुटुंबियांना पाठवला होता. सोमवारी पहाटे तो घरात आढळून न आल्याने परिसरात त्याचा शोध सुरु असताना करावे येथील तलावालगत त्याची चप्पल आढळून आली. यामुळे पाण्यात शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला.

तर नेरुळ सेक्टर १६ येथील पृथ्वी प्रमोद ढवळे (१४) याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तो नववी मध्ये शिकत होता. रविवारी संध्याकाळी त्याच्या घरातील सर्वजण खरेदीसाठी घराबाहेर गेले होते. यामुळे तो घरात एकटाच असताना त्याने बेडशीटच्या साहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. रात्री अकराच्या सुमारास घरातील परत आल्या असता दरवाजा आतून बंद होता. आतून प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडला असता पृथीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. अभ्यास कठीण जात होता असे पोलिस तपासात समोर आले आहे. यामध्ये त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या दोन्ही घटनांनी शहरात पालक वर्गांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईDeathमृत्यू