शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

अभ्यासाचा तणाव! दोन अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या; नेरुळ आणि करावे मधील धक्कादायक घटना  

By सूर्यकांत वाघमारे | Updated: December 11, 2023 19:58 IST

दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

नवी मुंबई : दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. नेरुळ व करावे येथे या घटना घडल्या असून दोन्ही मुलांना अभ्यासाचा तणाव होता असे समोर आले आहे. त्यामुळे एकाने तलावात उडी मारून तर दुसऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जड झालेल्या शिक्षणाचा भार विद्यार्थी पेलवू शकत नसल्याचे धक्कादायक घटनेवरून समोर आले आहे. नवी मुंबईत काही तासाच्या अंतराने दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. नेरुळ व करावे गाव याठिकाणी या घटना घडल्या असून त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. करावे येथे राहणाऱ्या दर्शील पाटील (१५) याच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले आहे. वडिलांच्या निधनानंतर आई त्याचे व त्याच्या लहान बहिणीचे संगोपन करत आहे. यामुळे दर्शील याच्यावर कुटुंबियांच्या अपेक्षा होत्या. मात्र अभ्यास जड जात असल्याने आपण कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही असे सतत त्याला वाटत होते. यामुळे त्याचे मानसिक खच्चीकरण झाले होते. अखेर रविवारी मध्यरात्री त्याने आपण आत्महत्या करत असल्याचा मॅसेज बहिणीसह कुटुंबियांना पाठवला होता. सोमवारी पहाटे तो घरात आढळून न आल्याने परिसरात त्याचा शोध सुरु असताना करावे येथील तलावालगत त्याची चप्पल आढळून आली. यामुळे पाण्यात शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला.

तर नेरुळ सेक्टर १६ येथील पृथ्वी प्रमोद ढवळे (१४) याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तो नववी मध्ये शिकत होता. रविवारी संध्याकाळी त्याच्या घरातील सर्वजण खरेदीसाठी घराबाहेर गेले होते. यामुळे तो घरात एकटाच असताना त्याने बेडशीटच्या साहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. रात्री अकराच्या सुमारास घरातील परत आल्या असता दरवाजा आतून बंद होता. आतून प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडला असता पृथीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. अभ्यास कठीण जात होता असे पोलिस तपासात समोर आले आहे. यामध्ये त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या दोन्ही घटनांनी शहरात पालक वर्गांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईDeathमृत्यू