शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खांदेश्वर स्थानकातील सब-वे कायमच पाण्यात

By admin | Updated: September 23, 2016 03:36 IST

अनंत चतुर्दशीपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पनवेल परिसरातील सखल भागाबरोबरच अंतर्गत रस्ते, महामार्गावरही पाणीच पाणी साचले आहे.

अरुणकुमार मेहत्रे , कळंबोलीअनंत चतुर्दशीपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पनवेल परिसरातील सखल भागाबरोबरच अंतर्गत रस्ते, महामार्गावरही पाणीच पाणी साचले आहे. त्याचबरोबर खांदेश्वर रेल्वेस्थानकातील सब-वे सुध्दा पाण्यात गेल्याने प्रवाशांची त्रेधातिरपीट उडत आहे. स्थानकातील सब-वेमध्ये साचलेल्या पाण्याचा दिवसातून दोनदाच उपसा केला जात असल्याने इतर वेळी प्रवाशांना पाण्यातूनच वाट काढत जावे लागते. पाऊस असो वा नसो गेल्या दोन महिन्यांपासून खांदेश्वर स्थानकातील सबवे पाण्यात असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. वारंवार तक्रार करूनही रेल्वे तसेच सिडकोकडून लक्ष दिले जात नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. कळंबोली, कामोठे, खांदा वसाहत, नवीन पनवेल येथील हजारो नागरिक दररोज खांदेश्वर स्थानकातून प्रवास करतात. मात्र रोजच सब-वेतील पाण्यातून जावे लागत असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. खांदेश्वर रेल्वेस्थानक सध्या समस्यांच्या चक्र व्यूहात सापडले आहे. बडा घर पोकळ वासा या उक्तीप्रमाणे हे स्थानक बाहेरून चकाचक दिसत असले तरी आतमधील परिस्थिती अतिशय बिकट आहे. नियोजित वसाहतींबरोबरच सुनियोजित रेल्वेस्थानक असा प्रचार सिडको करीत आहे, मात्र हे स्थानक बांधताना आपत्ती व्यवस्थापन त्याचबरोबर इतर गोष्टीचे योग्य नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे स्थानक कायमच समस्यांच्या गर्तेत अडकलेले दिसते. फलाटावर जाण्यासाठी सबवे बांधण्यात आले आहे. मात्र पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजनच न झाल्याने पावसाळ्याचे चारही महिने सबवे पाण्यात असतो. पाऊस थांबला तरी येथील पाण्याचा निचरा काही थांबत नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. सबवेमध्ये जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांच्या मध्यभागी असलेले रेलिंग तुटलेले आहेत. त्यामुळे ट्रेन पकडण्याच्या गडबडीत असलेले प्रवासी अनेकदा पाय घसरून पडतात. त्यामुळे गंभीर दुखापत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. गेल्या तीन दिवसांपासून पनवेल परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे खांदेश्वरमधील सब-वेमध्ये गुडघाभर पाण्यातून प्रवाशांना जावे लागले. तीनही दिवस सकाळीच सब -वेत कमरेइतके पाणी साचले होते. पाण्यातून जाण्याशिवाय प्रवाशांकडे अन्य पर्याय नाही. सबवेमध्ये पाणी साचत असल्याने अनेक प्रवासी फलाटालगत असलेल्या अवघड वाटेवरून जाणे पसंत करतात. मात्र रात्रीच्यावेळी ही वाट धोकादायक ठरत आहे. यासंदर्भात सिडको-रेल्वे प्रकल्प कार्यालयात संपर्क साधला असता तेथून जबाबदार अधिकाऱ्याची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.