शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

खांदेश्वर स्थानकातील सब-वे कायमच पाण्यात

By admin | Updated: September 23, 2016 03:36 IST

अनंत चतुर्दशीपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पनवेल परिसरातील सखल भागाबरोबरच अंतर्गत रस्ते, महामार्गावरही पाणीच पाणी साचले आहे.

अरुणकुमार मेहत्रे , कळंबोलीअनंत चतुर्दशीपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पनवेल परिसरातील सखल भागाबरोबरच अंतर्गत रस्ते, महामार्गावरही पाणीच पाणी साचले आहे. त्याचबरोबर खांदेश्वर रेल्वेस्थानकातील सब-वे सुध्दा पाण्यात गेल्याने प्रवाशांची त्रेधातिरपीट उडत आहे. स्थानकातील सब-वेमध्ये साचलेल्या पाण्याचा दिवसातून दोनदाच उपसा केला जात असल्याने इतर वेळी प्रवाशांना पाण्यातूनच वाट काढत जावे लागते. पाऊस असो वा नसो गेल्या दोन महिन्यांपासून खांदेश्वर स्थानकातील सबवे पाण्यात असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. वारंवार तक्रार करूनही रेल्वे तसेच सिडकोकडून लक्ष दिले जात नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. कळंबोली, कामोठे, खांदा वसाहत, नवीन पनवेल येथील हजारो नागरिक दररोज खांदेश्वर स्थानकातून प्रवास करतात. मात्र रोजच सब-वेतील पाण्यातून जावे लागत असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. खांदेश्वर रेल्वेस्थानक सध्या समस्यांच्या चक्र व्यूहात सापडले आहे. बडा घर पोकळ वासा या उक्तीप्रमाणे हे स्थानक बाहेरून चकाचक दिसत असले तरी आतमधील परिस्थिती अतिशय बिकट आहे. नियोजित वसाहतींबरोबरच सुनियोजित रेल्वेस्थानक असा प्रचार सिडको करीत आहे, मात्र हे स्थानक बांधताना आपत्ती व्यवस्थापन त्याचबरोबर इतर गोष्टीचे योग्य नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे स्थानक कायमच समस्यांच्या गर्तेत अडकलेले दिसते. फलाटावर जाण्यासाठी सबवे बांधण्यात आले आहे. मात्र पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजनच न झाल्याने पावसाळ्याचे चारही महिने सबवे पाण्यात असतो. पाऊस थांबला तरी येथील पाण्याचा निचरा काही थांबत नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. सबवेमध्ये जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांच्या मध्यभागी असलेले रेलिंग तुटलेले आहेत. त्यामुळे ट्रेन पकडण्याच्या गडबडीत असलेले प्रवासी अनेकदा पाय घसरून पडतात. त्यामुळे गंभीर दुखापत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. गेल्या तीन दिवसांपासून पनवेल परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे खांदेश्वरमधील सब-वेमध्ये गुडघाभर पाण्यातून प्रवाशांना जावे लागले. तीनही दिवस सकाळीच सब -वेत कमरेइतके पाणी साचले होते. पाण्यातून जाण्याशिवाय प्रवाशांकडे अन्य पर्याय नाही. सबवेमध्ये पाणी साचत असल्याने अनेक प्रवासी फलाटालगत असलेल्या अवघड वाटेवरून जाणे पसंत करतात. मात्र रात्रीच्यावेळी ही वाट धोकादायक ठरत आहे. यासंदर्भात सिडको-रेल्वे प्रकल्प कार्यालयात संपर्क साधला असता तेथून जबाबदार अधिकाऱ्याची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.