शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेऊन मायदेशात परतावे- तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:21 IST

कर्जतमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

कर्जत : कर्जतसारख्या शैक्षणिक हब बनत असलेल्या तालुक्यातील विद्यार्थी दहावी आणि बारावीमध्ये उत्तम गुण मिळवीत आहेत. त्या विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यावे, मात्र त्यानंतर देशाची सेवा करण्यासाठी पुन्हा भारतात परतावे, असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केले. कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने दहिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.तटकरे म्हणाले, कर्जत तालुक्यातील आमदार सुरेश लाड यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याची २० वर्षांपूर्वी सुरू केलेली परंपरा आजही कायम आहे. मधल्या काळात पाच वर्षे सुरेश लाड हे आमदार देखील नव्हते. मात्र विद्यार्र्थ्यांचे कौतुक करण्याच्या कार्यक्रमात कधी खंड पडला नसल्याचे त्यांनी सांगितले. दहावी आणि बारावीनंतर पुढे काय, यावर मार्गदर्शन मेळावेही आयोजित करण्यात येत आहेत.कर्जत परिसरात मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी महाविद्यालये येत आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे आणि पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जावे, मात्र परदेशात शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी पुन्हा आपल्या देशात येऊन देशाचा आलेख कसा उंचावेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला ज्येष्ठ कार्यकर्ते वि. रा. देशमुख, माजी सभापती तानाजी चव्हाण, अशोक भोपतराव, माजी नगराध्यक्ष शरद लाड, अजय सावंत, रजनी गायकवाड, कांगणे, स्मिता पतंगे, हिराताई दुबे आदी प्रमुख उपस्थित होते. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ४३ विद्यार्थ्यांचा तसेच १०० टक्के निकाल लागलेल्या चार माध्यमिक शाळांचा विशेष सत्कार करण्यात आला. बारावीच्या परीक्षेत ९ कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरे