शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेऊन मायदेशात परतावे- तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:21 IST

कर्जतमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

कर्जत : कर्जतसारख्या शैक्षणिक हब बनत असलेल्या तालुक्यातील विद्यार्थी दहावी आणि बारावीमध्ये उत्तम गुण मिळवीत आहेत. त्या विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यावे, मात्र त्यानंतर देशाची सेवा करण्यासाठी पुन्हा भारतात परतावे, असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केले. कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने दहिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.तटकरे म्हणाले, कर्जत तालुक्यातील आमदार सुरेश लाड यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याची २० वर्षांपूर्वी सुरू केलेली परंपरा आजही कायम आहे. मधल्या काळात पाच वर्षे सुरेश लाड हे आमदार देखील नव्हते. मात्र विद्यार्र्थ्यांचे कौतुक करण्याच्या कार्यक्रमात कधी खंड पडला नसल्याचे त्यांनी सांगितले. दहावी आणि बारावीनंतर पुढे काय, यावर मार्गदर्शन मेळावेही आयोजित करण्यात येत आहेत.कर्जत परिसरात मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी महाविद्यालये येत आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे आणि पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जावे, मात्र परदेशात शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी पुन्हा आपल्या देशात येऊन देशाचा आलेख कसा उंचावेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला ज्येष्ठ कार्यकर्ते वि. रा. देशमुख, माजी सभापती तानाजी चव्हाण, अशोक भोपतराव, माजी नगराध्यक्ष शरद लाड, अजय सावंत, रजनी गायकवाड, कांगणे, स्मिता पतंगे, हिराताई दुबे आदी प्रमुख उपस्थित होते. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ४३ विद्यार्थ्यांचा तसेच १०० टक्के निकाल लागलेल्या चार माध्यमिक शाळांचा विशेष सत्कार करण्यात आला. बारावीच्या परीक्षेत ९ कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरे