शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? ...वाला? विचारल्यानंतर ' ठेवून घ्या' असे खेवलकर यांनी दिले होते होकारार्थी उत्तर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
4
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
5
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
6
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
7
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
8
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
9
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
10
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
11
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
12
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
13
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
14
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
15
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
16
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
17
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
18
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
20
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?

पाण्याची पळवापळवी थांबवून नवी मुंबईकरांची तहान भागवा: अधिकाऱ्यांना मडके भेट देऊन केला निषेध

By नामदेव मोरे | Updated: August 18, 2023 19:29 IST

हक्काच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई: महानगरपालिका क्षेत्रात तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली असताना नवी मुंबईकरांच्या हक्काचे पाणी इतर शहरांना दिले जात आहे. मोरबे धरणास, एमआयडीसीतील पाणी इतर ठिकाणी वळविले जात आहे. पाण्याची ही पळवापळवी थांबवावी व सर्वप्रथम नवी मुंबईकरांची तहान भागवावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी दिला आहे. अधिकाऱ्यांना मडका भेट देवून पाणी टंचाईचा निषेध व्यक्त केला.

नेरूळसह शहरातील विविध ठिकाणी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असताना व २४ तास पाणी पुरवठा करण्याचा दावा केला जात असतानाही प्रत्यक्षात आवश्यक तेवढेही पाणी उपलब्ध होत नाही. नेरूळ विभागामध्येही वेळेत पाणी पुरवठा हाेत नाही. अनेकवेळा गढूळ पाणी येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. भाजपाचे माजी नगरसेवक सुूरज पाटील यांनी अतिरिक्त शहर अभियंता सूरज पाटील यांची भेट घेऊन त्यांना मडके भेट देवून पाणी टंचाईचा निषेध व्यक्त केला. शहरातील प्रत्येक नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले पाहिजे अशी आग्रही मागणी केली.

नवी मुंबईला बारवी धरणातून एमआयडीसीच्या माध्यमातून १६० एमएलडी पाणी मिळणे आवश्यक आहे. परंतु त्यामधीलही ८० एमएलडीच पाण्याचा कोटा ठेवला आहे. हा कोटाही पूर्ण मिळत नसून मनपाला फक्त ४० ते ४५ एमएलडी एवढेच पाणी मिळत आहे. नवी मुंबईच्या हक्काचे पाणी इतर शहरांकडे वळविण्यात येत आहे. मोरबे धरणातील पाणीही खारघर, कामोठे, कळंबोली परिसराला दिले जात आहे. शहरवासी तहानलेले असताना दुसऱ्या शहरांची तहान भागविण्याची जबाबदारी का घेतली जात आहे असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

इतर शहरांचे पाणी थांबवा अन्यथा आंदोलन

नवी मुंबईकरांच्या हक्काचे पाणी नवी मुंबईलाच मिळाले पाहिजे. मोरबे धरणाचे पाणी खारघर ते कळंबोली पर्यंतच्या परिसराला जात आहे. जीवनप्राधीकरणाचे एमआयडीसीच्या माध्यमातून मिळणारे नवी मुंबईच्या हक्काचे पाणी इतर शहरांकडे वळविणे तत्काळ थांबवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

नवी मुंबईमधील पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मोरबे धरणातील सर्व पाणी मनपा क्षेत्रासाठी वापरावे व एमआयडीसीकडून कराराप्रमाणे ठरलेला साठा मिळवावा. हक्काचे पाणी पळविण्याच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी अधिकाऱ्यांना मडके दिले आहे.-सूरज पाटील, माजी नगरसेवक, नेरूळ

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी