शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

पाण्याची पळवापळवी थांबवून नवी मुंबईकरांची तहान भागवा: अधिकाऱ्यांना मडके भेट देऊन केला निषेध

By नामदेव मोरे | Updated: August 18, 2023 19:29 IST

हक्काच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई: महानगरपालिका क्षेत्रात तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली असताना नवी मुंबईकरांच्या हक्काचे पाणी इतर शहरांना दिले जात आहे. मोरबे धरणास, एमआयडीसीतील पाणी इतर ठिकाणी वळविले जात आहे. पाण्याची ही पळवापळवी थांबवावी व सर्वप्रथम नवी मुंबईकरांची तहान भागवावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी दिला आहे. अधिकाऱ्यांना मडका भेट देवून पाणी टंचाईचा निषेध व्यक्त केला.

नेरूळसह शहरातील विविध ठिकाणी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असताना व २४ तास पाणी पुरवठा करण्याचा दावा केला जात असतानाही प्रत्यक्षात आवश्यक तेवढेही पाणी उपलब्ध होत नाही. नेरूळ विभागामध्येही वेळेत पाणी पुरवठा हाेत नाही. अनेकवेळा गढूळ पाणी येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. भाजपाचे माजी नगरसेवक सुूरज पाटील यांनी अतिरिक्त शहर अभियंता सूरज पाटील यांची भेट घेऊन त्यांना मडके भेट देवून पाणी टंचाईचा निषेध व्यक्त केला. शहरातील प्रत्येक नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले पाहिजे अशी आग्रही मागणी केली.

नवी मुंबईला बारवी धरणातून एमआयडीसीच्या माध्यमातून १६० एमएलडी पाणी मिळणे आवश्यक आहे. परंतु त्यामधीलही ८० एमएलडीच पाण्याचा कोटा ठेवला आहे. हा कोटाही पूर्ण मिळत नसून मनपाला फक्त ४० ते ४५ एमएलडी एवढेच पाणी मिळत आहे. नवी मुंबईच्या हक्काचे पाणी इतर शहरांकडे वळविण्यात येत आहे. मोरबे धरणातील पाणीही खारघर, कामोठे, कळंबोली परिसराला दिले जात आहे. शहरवासी तहानलेले असताना दुसऱ्या शहरांची तहान भागविण्याची जबाबदारी का घेतली जात आहे असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

इतर शहरांचे पाणी थांबवा अन्यथा आंदोलन

नवी मुंबईकरांच्या हक्काचे पाणी नवी मुंबईलाच मिळाले पाहिजे. मोरबे धरणाचे पाणी खारघर ते कळंबोली पर्यंतच्या परिसराला जात आहे. जीवनप्राधीकरणाचे एमआयडीसीच्या माध्यमातून मिळणारे नवी मुंबईच्या हक्काचे पाणी इतर शहरांकडे वळविणे तत्काळ थांबवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

नवी मुंबईमधील पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मोरबे धरणातील सर्व पाणी मनपा क्षेत्रासाठी वापरावे व एमआयडीसीकडून कराराप्रमाणे ठरलेला साठा मिळवावा. हक्काचे पाणी पळविण्याच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी अधिकाऱ्यांना मडके दिले आहे.-सूरज पाटील, माजी नगरसेवक, नेरूळ

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी