शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

पाण्याची पळवापळवी थांबवून नवी मुंबईकरांची तहान भागवा: अधिकाऱ्यांना मडके भेट देऊन केला निषेध

By नामदेव मोरे | Updated: August 18, 2023 19:29 IST

हक्काच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई: महानगरपालिका क्षेत्रात तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली असताना नवी मुंबईकरांच्या हक्काचे पाणी इतर शहरांना दिले जात आहे. मोरबे धरणास, एमआयडीसीतील पाणी इतर ठिकाणी वळविले जात आहे. पाण्याची ही पळवापळवी थांबवावी व सर्वप्रथम नवी मुंबईकरांची तहान भागवावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी दिला आहे. अधिकाऱ्यांना मडका भेट देवून पाणी टंचाईचा निषेध व्यक्त केला.

नेरूळसह शहरातील विविध ठिकाणी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असताना व २४ तास पाणी पुरवठा करण्याचा दावा केला जात असतानाही प्रत्यक्षात आवश्यक तेवढेही पाणी उपलब्ध होत नाही. नेरूळ विभागामध्येही वेळेत पाणी पुरवठा हाेत नाही. अनेकवेळा गढूळ पाणी येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. भाजपाचे माजी नगरसेवक सुूरज पाटील यांनी अतिरिक्त शहर अभियंता सूरज पाटील यांची भेट घेऊन त्यांना मडके भेट देवून पाणी टंचाईचा निषेध व्यक्त केला. शहरातील प्रत्येक नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले पाहिजे अशी आग्रही मागणी केली.

नवी मुंबईला बारवी धरणातून एमआयडीसीच्या माध्यमातून १६० एमएलडी पाणी मिळणे आवश्यक आहे. परंतु त्यामधीलही ८० एमएलडीच पाण्याचा कोटा ठेवला आहे. हा कोटाही पूर्ण मिळत नसून मनपाला फक्त ४० ते ४५ एमएलडी एवढेच पाणी मिळत आहे. नवी मुंबईच्या हक्काचे पाणी इतर शहरांकडे वळविण्यात येत आहे. मोरबे धरणातील पाणीही खारघर, कामोठे, कळंबोली परिसराला दिले जात आहे. शहरवासी तहानलेले असताना दुसऱ्या शहरांची तहान भागविण्याची जबाबदारी का घेतली जात आहे असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

इतर शहरांचे पाणी थांबवा अन्यथा आंदोलन

नवी मुंबईकरांच्या हक्काचे पाणी नवी मुंबईलाच मिळाले पाहिजे. मोरबे धरणाचे पाणी खारघर ते कळंबोली पर्यंतच्या परिसराला जात आहे. जीवनप्राधीकरणाचे एमआयडीसीच्या माध्यमातून मिळणारे नवी मुंबईच्या हक्काचे पाणी इतर शहरांकडे वळविणे तत्काळ थांबवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

नवी मुंबईमधील पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मोरबे धरणातील सर्व पाणी मनपा क्षेत्रासाठी वापरावे व एमआयडीसीकडून कराराप्रमाणे ठरलेला साठा मिळवावा. हक्काचे पाणी पळविण्याच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी अधिकाऱ्यांना मडके दिले आहे.-सूरज पाटील, माजी नगरसेवक, नेरूळ

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी