शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची न्यायासाठी शासन दरबारी वणवण

By admin | Updated: October 19, 2015 01:17 IST

येथील आयपीसीएल प्रकल्पासाठी १९८४ मध्ये शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने त्यावेळी हजारो एकर जमीन घेतली होती.

नागोठणे : येथील आयपीसीएल प्रकल्पासाठी १९८४ मध्ये शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने त्यावेळी हजारो एकर जमीन घेतली होती. मात्र, त्यावेळी शेतकऱ्यांना अल्प मोबदला देऊन ती खरेदी करण्यात आली असल्याने अनेकदा सरकार आणि स्थानिक शेतकरी यांच्यात संघर्षसुद्धा झाला होता. जागा संपादनाची प्रक्रि या शासनाकडून त्यावेळी घाई गडबडीने उरकण्यात आली असल्याने त्याचा फटका विभागातील कुहीरे गावातील शेतकऱ्याला बसला असून न्याय मिळण्यासाठी ३१ वर्षे तो झगडत आहे,तरी जिवंतपणी तरी शासनाकडून न्याय मिळू शकेल का,अशी एका त्रस्त शेतकरी महिलेने विचारणा केली आहे. विभागातील पेण तालुक्यातील कुहिरे येथील विठ्ठल तेलंगे यांच्या मालकीची एक हेक्टर नऊ आर एवढी जमीन होती. ही जमीन कुहिरे गावाच्या दक्षिण बाजूला लागून आहे. या जमिनीच्या लगत असलेल्या जमिनी सुद्धा त्यावेळी प्रकल्पासाठी संपादित केल्या गेल्या नव्हत्या. मात्र, तेलंगे यांची जमीन न घेताही शासकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही खातरजमा करून न घेता या जमिनीच्या सातबारा वर एमआयडीसीचा शिक्का मारण्याचा प्रताप केला आहे. आणि तोही या जमिनीचा कोणताही मोबदला न देता, झालेल्या अन्यायाबाबत संबंधित शेतकरी विठ्ठल तेलंगे व त्यांच्या पश्चात वारस असलेल्या मालती मनोहर तेलंगे यांनी शासनाचे उंबरठे झिजवले असले, तरी त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. आपल्या मालकीच्या जमिनीवर बसलेला सरकारी शिक्का उठविण्यासाठी त्यांनी आतापर्यंत जिल्हाधिकारी-रायगड, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाड व मुंबई, भू संपादन खाते, रायगड,जिल्हा अधीक्षक-भूमी अभिलेख, रायगड यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. तर काही अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत, मात्र अद्याप न्याय मिळाला नाही असे तेलंगे यांनी सांगितले.