शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

शेतकऱ्यांची न्यायासाठी शासन दरबारी वणवण

By admin | Updated: October 19, 2015 01:17 IST

येथील आयपीसीएल प्रकल्पासाठी १९८४ मध्ये शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने त्यावेळी हजारो एकर जमीन घेतली होती.

नागोठणे : येथील आयपीसीएल प्रकल्पासाठी १९८४ मध्ये शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने त्यावेळी हजारो एकर जमीन घेतली होती. मात्र, त्यावेळी शेतकऱ्यांना अल्प मोबदला देऊन ती खरेदी करण्यात आली असल्याने अनेकदा सरकार आणि स्थानिक शेतकरी यांच्यात संघर्षसुद्धा झाला होता. जागा संपादनाची प्रक्रि या शासनाकडून त्यावेळी घाई गडबडीने उरकण्यात आली असल्याने त्याचा फटका विभागातील कुहीरे गावातील शेतकऱ्याला बसला असून न्याय मिळण्यासाठी ३१ वर्षे तो झगडत आहे,तरी जिवंतपणी तरी शासनाकडून न्याय मिळू शकेल का,अशी एका त्रस्त शेतकरी महिलेने विचारणा केली आहे. विभागातील पेण तालुक्यातील कुहिरे येथील विठ्ठल तेलंगे यांच्या मालकीची एक हेक्टर नऊ आर एवढी जमीन होती. ही जमीन कुहिरे गावाच्या दक्षिण बाजूला लागून आहे. या जमिनीच्या लगत असलेल्या जमिनी सुद्धा त्यावेळी प्रकल्पासाठी संपादित केल्या गेल्या नव्हत्या. मात्र, तेलंगे यांची जमीन न घेताही शासकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही खातरजमा करून न घेता या जमिनीच्या सातबारा वर एमआयडीसीचा शिक्का मारण्याचा प्रताप केला आहे. आणि तोही या जमिनीचा कोणताही मोबदला न देता, झालेल्या अन्यायाबाबत संबंधित शेतकरी विठ्ठल तेलंगे व त्यांच्या पश्चात वारस असलेल्या मालती मनोहर तेलंगे यांनी शासनाचे उंबरठे झिजवले असले, तरी त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. आपल्या मालकीच्या जमिनीवर बसलेला सरकारी शिक्का उठविण्यासाठी त्यांनी आतापर्यंत जिल्हाधिकारी-रायगड, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाड व मुंबई, भू संपादन खाते, रायगड,जिल्हा अधीक्षक-भूमी अभिलेख, रायगड यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. तर काही अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत, मात्र अद्याप न्याय मिळाला नाही असे तेलंगे यांनी सांगितले.