शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

सकल मराठा समाजाचे राज्य शासनाला अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 05:24 IST

पनवेल : फेब्रुवारीपर्यंत राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास सरकारविरोधात उग्र आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.

पनवेल : फेब्रुवारीपर्यंत राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास सरकारविरोधात उग्र आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. पनवेल येथील व्हीके हायस्कूलमध्ये सोमवारी सकल मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी राज्यातील २९ जिल्ह्यांतील सकल मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित होते.राज्यभरात लाखोंचे मोर्चे निघूनसुद्धा शासनाने केवळ आश्वासनावर मराठा समाजाची बोळवण केली असल्याचे सांगत राज्य शासनाविरोधात विविध स्तरांवर आंदोलन छेडून मागण्या मान्य करण्यासाठी शासनाला भाग पडणार असल्याचे सांगितले. या बैठकीला प्रत्येक जिल्ह्यातून पाच प्रतिनिधी आले होते. प्रत्येक जिल्ह्यातील एका प्रतिनिधीला पाच मिनिटांचा कालावधी देऊन मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. विशेष म्हणजे गुजरातमध्ये ज्या प्रकारे पाटीदार समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाविरोधात भूमिका घेतली त्याच प्रकारे भूमिका महाराष्ट्रात सकल मराठा समाजाने घेणे गरजेचे असल्याचे या वेळी सांगण्यात आले. ९ आॅगस्ट रोजी मुंबईमध्ये महामोर्चा आयोजित करण्यात आला होता.या मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला विविध आश्वासने दिली, मात्र त्यापैकी एकही मागणी अद्याप मान्य झाली नसल्याने १० फेब्रुवारीनंतर राज्य शासनाविरोधात बंड पुकारणार असल्याचे या वेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक विनोद साबळे यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या हस्ते अरबी समुद्रात महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन मागच्या वर्षी झाले होते. मात्र अद्याप या ठिकाणी एक वीटही लागली नसल्याने शासनाला सर्वच गोष्टींचा जाब विचारणार असल्याचे सांगितले.राज्यभरात १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या शाळा सुरू ठेवण्यात याव्यात, ही मागणी नव्याने सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.>पनवेलच्या राज्यस्तरीय बैठकीत तीन ठरावया राज्यस्तरीय बैठकीत तीन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. या वेळी पहिला ठराव सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यामुळे राज्य शासनाचा निषेध ठराव करण्यात आला. दुसरा ठराव १९ फेब्रुवारीनंतर राज्यभरात उग्र आंदोलन छेडणार हा करण्यात आला. तिसरा ठराव अर्थसंकल्प अधिवेशन २६ फे बु्रवारी २०१८ रोजी पार पडणार आहे, त्या अधिवेशनादरम्यान घेराव घालण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे.>या विषयांवर झाली चर्चा : कोपर्डी, मराठा आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, शेतीला हमीभाव, स्वामिनाथन आयोग, सारथी संस्था, वसतिगृह, शिवस्मारक, ईबीसी सवलत, पुढील आंदोलनाची दिशा यांवर चर्चा झाली.>अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी घालणार घेराववारंवार मागणी करूनदेखील शासन मराठा समाजाला गांभीर्याने घेत नसल्याचे सांगत ११ फेब्रुवारी रोजी जळगाव या ठिकाणी राज्यस्तरीय बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठा