शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

नवीन पुलाच्या कामाची गती मंदावली, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 02:18 IST

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तालुक्यातील केवाळे, महालुंगी व चिपळे येथील पुलाची दुरुस्ती व नवीन पुलाचे काम सुरू आहे.

- मयूर तांबडेपनवेल - सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तालुक्यातील केवाळे, महालुंगी व चिपळे येथील पुलाची दुरुस्ती व नवीन पुलाचे काम सुरू आहे; परंतु ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने पावसाळ्यात नागरिकांना याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने या पुलांचे काम पूर्ण करावे, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पनवेल तालुक्यातील चिपळे येथील जुन्या पुलाची डागडुजी तर केवाळे, व महालुंगी येथे नवीन पूल बांधण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही कामे सुरू आहेत. त्यातल्या त्यात मागील दोन तीन महिन्यांपासून या कामाची गती मंदावल्याचे दिसून आले आहे.गाढी नदीवर हे नवीन पूल बांधण्यात येत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाने जोर धरल्यास परिसरातील रहिवाशांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. पुलाच्या कामाच्या मंद गतीमुळे रहिवाशांत संभ्रम निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालीत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.चिपळे येथील पुलाच्या डागडुजीचे २३ लाख रु पये खर्च केले जाणार आहेत. हे काम अद्याप अर्धवट अवस्थेत आहेत. हा पूल १९७५ मध्ये बांधण्यात आला होता. सध्या या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. गाढी नदीवर असलेल्या या पुलाला २00५ मध्ये आलेल्या पुराचा तडाखा बसला होता. त्यामुळे पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हा पूल चाळीस वर्षे जुना असल्याने त्याची पडझड झाली आहे. वाहतुकीला धोकादायक ठरलेल्या या पुलाच्या डागडुजीसाठी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार गेल्या वर्षी कामही सुरू करण्यात आले; परंतु आतापर्यंत ५0 टक्के काम सुद्धा पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम रखडल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. पावसाचा जोर वाढण्यापूर्वी पूल वाहतुकीला खुला न झाल्यास मोठ्याप्रमाणात गैरसोय होईल, असे परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे.केवाळे व महालुंगी येथील नवीन पुलाचे काम सुद्धा कुर्मगतीने सुरू आहे. पुढील दोन तीन महिन्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. केवाळे व महालुंगी येथील जुने पूल पाडून रहिवाशांसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी नवीन पुलाला वळसा मारून नदीच्या पात्रातून प्रवास करावा लागत आहे. केवाळे येथील पूल गंजल्याने तो धोकादायक व अरु ंद बनला होता.या भागात केवाळे, वाकडी, चिंचवली, उसर्ली, दुंदरे, मोरबे यांच्यासह आदिवासी वाड्यांचे प्रमाण अधिक आहे. हा पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी १ कोटी २ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. त्याचप्रमाणे महाळुंगी येथील पुलासाठी ५0 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.खाजगी जागेतून प्रवासमोरबे गावातील रस्त्याच्या मोरीचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना सहकार द्वारकाच्या खासगी जागेतून प्रवास करावा लागत आहे. मागील सात आठ महिन्यापासून या पुलांचे काम सुरू आहे; परंतु या कामाने अपेक्षित गती न घेतल्याने पावसाळ्यात या परिसरातील रहिवाशांना पुन्हा कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, यासंदर्भात वस्तुस्थितीची चौकशी करून माहिती दिली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सतीश श्रावगे यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई