शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

इरशाळगडवाडीच्या विकासाला गती, सौरऊर्जेने उजळले गाव, रस्त्याला रेलिंग बसविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 01:51 IST

रायगड जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इरशाळगडवाडीच्या विकासाला आता गती येऊ लागली आहे. ‘लोकमत’ने येथील प्रश्नांवर आवाज उठविल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील गैरसोयी दूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. गावामधील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये सौरऊर्जेचे दिवे देण्यात आले असून, गावापर्यंतच्या पायवाटेला पाइप रेलिंग बसविण्यात येणार आहे.रायगड जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. रायगडपासून ते प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक गड-किल्ले आहेत. दुर्लक्षित राहिलेल्या किल्ल्यांमध्ये इरशाळगडचा समावेश होतो. गडावर कोणतेही पुरातन बांधकाम नसले तरी गडावरील शिखर सर करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येत असतात. पावसाळ्यात प्रत्येक रविवारी दोन ते तीन हजार पर्र्यटक गडाला भेट देतात. ठाकूरवाडीमध्ये गाडी ठेवून पायवाटेने इरशाळगडवाडी व तेथून गडावर जावे लागते. गडावर जाण्यासाठी रस्ता नाही. पायवाटही व्यवस्थित नाही. गावामध्ये अद्याप विजेची सोय नव्हती. सौरऊर्जेच्या माध्यमातून विजेची सुविधा उपलब्ध करून दिली होती; परंतु अनेक घरातील दिवे बंद झाले होते. गावातील शाळाही बंद झाल्याने मुलांना आश्रमशाळेत जावे लागत आहेत. ‘लोकमत’ने १५ आक्टोबरला येथील समस्यांवर लक्ष वेधले होते. गावामध्ये येण्यासाठी रस्ता तयार करण्यात यावा. विजेचे खांब टाकून वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेऊन पनवेलमधील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत रणवरे यांनी आपले सरकार पोर्टलवर ‘लोकमत’ची बातमी टाकून या समस्येकडे लक्ष वेधले होते. शासनाने या तक्रारीची दखल घेऊन येथील प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. चौक ग्रामपंचायतीने या परिसरामध्ये सुरू असलेल्या कामांची माहिती गटविकास अधिकारी खालापूर यांना दिली आहे.ग्रुप ग्रामपंचायत चौक येथील इरशाळगडवाडी (इसाळवाडी) येथील रस्ता हा डोंगराळ भागातील असून तो वनखात्याच्या अखत्यारित येतो. यामुळे ‘आमचा गाव, आमचा विकास’ आराखड्यामध्ये वाडीपर्यंतच्या रस्त्याला पाइप रेलिंग करण्याचे काम हाती घेतले असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी यांच्या मार्फत गेल्या १५ दिवसांपासून सर्व कुटुंबांना घरगुती सोलर दिवे बसविण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे.गावामधील ग्रामस्थ गणपत पारधी यांच्याशी संपर्क साधला असता गावामधील प्रत्येक घरामध्ये शासनाच्या एजन्सीच्या माध्यमातून सौरऊर्जेचे दिवे दिले असल्याचे सांगितले आहे.पर्यटनवाढीला संधीखालापूर तालुक्यामधील इरशाळगड परिसरामध्ये पर्यटनवृद्धीला संधी आहे. पावसाळ्यात प्रत्येक रविवारी दोन ते तीन हजार पर्यटक गडाला भेट देत असतात. गडावरून मोरबे धरणाचा निसर्गरम्य परिसर पाहवयास मिळतो. गडाचा सुळका देशभरातील ट्रेकर्सला आकर्षित करत असतो. या परिसरातील रस्त्याचे काम मार्गी लावले व इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांची संख्या अजून वाढेल, असा विश्वास पर्यटकही व्यक्त करत आहेत.ऐतिहासिक इरशाळगडवाडीमधील नागरिकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी ‘आपले सरकार पोर्टल’वर पाठपुरावा केला होता. या तक्रारीची दखल घेऊन आदिवासीपाड्यामधील प्रत्येक घरात सौरऊर्जेचे दिवे दिले असून रस्त्याला पाइप रेलिंग केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.- प्रशांत रणवरे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Raigadरायगड