शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

इरशाळगडवाडीच्या विकासाला गती, सौरऊर्जेने उजळले गाव, रस्त्याला रेलिंग बसविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 01:51 IST

रायगड जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इरशाळगडवाडीच्या विकासाला आता गती येऊ लागली आहे. ‘लोकमत’ने येथील प्रश्नांवर आवाज उठविल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील गैरसोयी दूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. गावामधील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये सौरऊर्जेचे दिवे देण्यात आले असून, गावापर्यंतच्या पायवाटेला पाइप रेलिंग बसविण्यात येणार आहे.रायगड जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. रायगडपासून ते प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक गड-किल्ले आहेत. दुर्लक्षित राहिलेल्या किल्ल्यांमध्ये इरशाळगडचा समावेश होतो. गडावर कोणतेही पुरातन बांधकाम नसले तरी गडावरील शिखर सर करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येत असतात. पावसाळ्यात प्रत्येक रविवारी दोन ते तीन हजार पर्र्यटक गडाला भेट देतात. ठाकूरवाडीमध्ये गाडी ठेवून पायवाटेने इरशाळगडवाडी व तेथून गडावर जावे लागते. गडावर जाण्यासाठी रस्ता नाही. पायवाटही व्यवस्थित नाही. गावामध्ये अद्याप विजेची सोय नव्हती. सौरऊर्जेच्या माध्यमातून विजेची सुविधा उपलब्ध करून दिली होती; परंतु अनेक घरातील दिवे बंद झाले होते. गावातील शाळाही बंद झाल्याने मुलांना आश्रमशाळेत जावे लागत आहेत. ‘लोकमत’ने १५ आक्टोबरला येथील समस्यांवर लक्ष वेधले होते. गावामध्ये येण्यासाठी रस्ता तयार करण्यात यावा. विजेचे खांब टाकून वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेऊन पनवेलमधील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत रणवरे यांनी आपले सरकार पोर्टलवर ‘लोकमत’ची बातमी टाकून या समस्येकडे लक्ष वेधले होते. शासनाने या तक्रारीची दखल घेऊन येथील प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. चौक ग्रामपंचायतीने या परिसरामध्ये सुरू असलेल्या कामांची माहिती गटविकास अधिकारी खालापूर यांना दिली आहे.ग्रुप ग्रामपंचायत चौक येथील इरशाळगडवाडी (इसाळवाडी) येथील रस्ता हा डोंगराळ भागातील असून तो वनखात्याच्या अखत्यारित येतो. यामुळे ‘आमचा गाव, आमचा विकास’ आराखड्यामध्ये वाडीपर्यंतच्या रस्त्याला पाइप रेलिंग करण्याचे काम हाती घेतले असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी यांच्या मार्फत गेल्या १५ दिवसांपासून सर्व कुटुंबांना घरगुती सोलर दिवे बसविण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे.गावामधील ग्रामस्थ गणपत पारधी यांच्याशी संपर्क साधला असता गावामधील प्रत्येक घरामध्ये शासनाच्या एजन्सीच्या माध्यमातून सौरऊर्जेचे दिवे दिले असल्याचे सांगितले आहे.पर्यटनवाढीला संधीखालापूर तालुक्यामधील इरशाळगड परिसरामध्ये पर्यटनवृद्धीला संधी आहे. पावसाळ्यात प्रत्येक रविवारी दोन ते तीन हजार पर्यटक गडाला भेट देत असतात. गडावरून मोरबे धरणाचा निसर्गरम्य परिसर पाहवयास मिळतो. गडाचा सुळका देशभरातील ट्रेकर्सला आकर्षित करत असतो. या परिसरातील रस्त्याचे काम मार्गी लावले व इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांची संख्या अजून वाढेल, असा विश्वास पर्यटकही व्यक्त करत आहेत.ऐतिहासिक इरशाळगडवाडीमधील नागरिकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी ‘आपले सरकार पोर्टल’वर पाठपुरावा केला होता. या तक्रारीची दखल घेऊन आदिवासीपाड्यामधील प्रत्येक घरात सौरऊर्जेचे दिवे दिले असून रस्त्याला पाइप रेलिंग केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.- प्रशांत रणवरे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Raigadरायगड