शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

इरशाळगडवाडीच्या विकासाला गती, सौरऊर्जेने उजळले गाव, रस्त्याला रेलिंग बसविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 01:51 IST

रायगड जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इरशाळगडवाडीच्या विकासाला आता गती येऊ लागली आहे. ‘लोकमत’ने येथील प्रश्नांवर आवाज उठविल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील गैरसोयी दूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. गावामधील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये सौरऊर्जेचे दिवे देण्यात आले असून, गावापर्यंतच्या पायवाटेला पाइप रेलिंग बसविण्यात येणार आहे.रायगड जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. रायगडपासून ते प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक गड-किल्ले आहेत. दुर्लक्षित राहिलेल्या किल्ल्यांमध्ये इरशाळगडचा समावेश होतो. गडावर कोणतेही पुरातन बांधकाम नसले तरी गडावरील शिखर सर करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येत असतात. पावसाळ्यात प्रत्येक रविवारी दोन ते तीन हजार पर्र्यटक गडाला भेट देतात. ठाकूरवाडीमध्ये गाडी ठेवून पायवाटेने इरशाळगडवाडी व तेथून गडावर जावे लागते. गडावर जाण्यासाठी रस्ता नाही. पायवाटही व्यवस्थित नाही. गावामध्ये अद्याप विजेची सोय नव्हती. सौरऊर्जेच्या माध्यमातून विजेची सुविधा उपलब्ध करून दिली होती; परंतु अनेक घरातील दिवे बंद झाले होते. गावातील शाळाही बंद झाल्याने मुलांना आश्रमशाळेत जावे लागत आहेत. ‘लोकमत’ने १५ आक्टोबरला येथील समस्यांवर लक्ष वेधले होते. गावामध्ये येण्यासाठी रस्ता तयार करण्यात यावा. विजेचे खांब टाकून वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेऊन पनवेलमधील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत रणवरे यांनी आपले सरकार पोर्टलवर ‘लोकमत’ची बातमी टाकून या समस्येकडे लक्ष वेधले होते. शासनाने या तक्रारीची दखल घेऊन येथील प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. चौक ग्रामपंचायतीने या परिसरामध्ये सुरू असलेल्या कामांची माहिती गटविकास अधिकारी खालापूर यांना दिली आहे.ग्रुप ग्रामपंचायत चौक येथील इरशाळगडवाडी (इसाळवाडी) येथील रस्ता हा डोंगराळ भागातील असून तो वनखात्याच्या अखत्यारित येतो. यामुळे ‘आमचा गाव, आमचा विकास’ आराखड्यामध्ये वाडीपर्यंतच्या रस्त्याला पाइप रेलिंग करण्याचे काम हाती घेतले असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी यांच्या मार्फत गेल्या १५ दिवसांपासून सर्व कुटुंबांना घरगुती सोलर दिवे बसविण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे.गावामधील ग्रामस्थ गणपत पारधी यांच्याशी संपर्क साधला असता गावामधील प्रत्येक घरामध्ये शासनाच्या एजन्सीच्या माध्यमातून सौरऊर्जेचे दिवे दिले असल्याचे सांगितले आहे.पर्यटनवाढीला संधीखालापूर तालुक्यामधील इरशाळगड परिसरामध्ये पर्यटनवृद्धीला संधी आहे. पावसाळ्यात प्रत्येक रविवारी दोन ते तीन हजार पर्यटक गडाला भेट देत असतात. गडावरून मोरबे धरणाचा निसर्गरम्य परिसर पाहवयास मिळतो. गडाचा सुळका देशभरातील ट्रेकर्सला आकर्षित करत असतो. या परिसरातील रस्त्याचे काम मार्गी लावले व इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांची संख्या अजून वाढेल, असा विश्वास पर्यटकही व्यक्त करत आहेत.ऐतिहासिक इरशाळगडवाडीमधील नागरिकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी ‘आपले सरकार पोर्टल’वर पाठपुरावा केला होता. या तक्रारीची दखल घेऊन आदिवासीपाड्यामधील प्रत्येक घरात सौरऊर्जेचे दिवे दिले असून रस्त्याला पाइप रेलिंग केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.- प्रशांत रणवरे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Raigadरायगड