शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

इरशाळगडवाडीच्या विकासाला गती, सौरऊर्जेने उजळले गाव, रस्त्याला रेलिंग बसविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 01:51 IST

रायगड जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इरशाळगडवाडीच्या विकासाला आता गती येऊ लागली आहे. ‘लोकमत’ने येथील प्रश्नांवर आवाज उठविल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील गैरसोयी दूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. गावामधील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये सौरऊर्जेचे दिवे देण्यात आले असून, गावापर्यंतच्या पायवाटेला पाइप रेलिंग बसविण्यात येणार आहे.रायगड जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. रायगडपासून ते प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक गड-किल्ले आहेत. दुर्लक्षित राहिलेल्या किल्ल्यांमध्ये इरशाळगडचा समावेश होतो. गडावर कोणतेही पुरातन बांधकाम नसले तरी गडावरील शिखर सर करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येत असतात. पावसाळ्यात प्रत्येक रविवारी दोन ते तीन हजार पर्र्यटक गडाला भेट देतात. ठाकूरवाडीमध्ये गाडी ठेवून पायवाटेने इरशाळगडवाडी व तेथून गडावर जावे लागते. गडावर जाण्यासाठी रस्ता नाही. पायवाटही व्यवस्थित नाही. गावामध्ये अद्याप विजेची सोय नव्हती. सौरऊर्जेच्या माध्यमातून विजेची सुविधा उपलब्ध करून दिली होती; परंतु अनेक घरातील दिवे बंद झाले होते. गावातील शाळाही बंद झाल्याने मुलांना आश्रमशाळेत जावे लागत आहेत. ‘लोकमत’ने १५ आक्टोबरला येथील समस्यांवर लक्ष वेधले होते. गावामध्ये येण्यासाठी रस्ता तयार करण्यात यावा. विजेचे खांब टाकून वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेऊन पनवेलमधील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत रणवरे यांनी आपले सरकार पोर्टलवर ‘लोकमत’ची बातमी टाकून या समस्येकडे लक्ष वेधले होते. शासनाने या तक्रारीची दखल घेऊन येथील प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. चौक ग्रामपंचायतीने या परिसरामध्ये सुरू असलेल्या कामांची माहिती गटविकास अधिकारी खालापूर यांना दिली आहे.ग्रुप ग्रामपंचायत चौक येथील इरशाळगडवाडी (इसाळवाडी) येथील रस्ता हा डोंगराळ भागातील असून तो वनखात्याच्या अखत्यारित येतो. यामुळे ‘आमचा गाव, आमचा विकास’ आराखड्यामध्ये वाडीपर्यंतच्या रस्त्याला पाइप रेलिंग करण्याचे काम हाती घेतले असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी यांच्या मार्फत गेल्या १५ दिवसांपासून सर्व कुटुंबांना घरगुती सोलर दिवे बसविण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे.गावामधील ग्रामस्थ गणपत पारधी यांच्याशी संपर्क साधला असता गावामधील प्रत्येक घरामध्ये शासनाच्या एजन्सीच्या माध्यमातून सौरऊर्जेचे दिवे दिले असल्याचे सांगितले आहे.पर्यटनवाढीला संधीखालापूर तालुक्यामधील इरशाळगड परिसरामध्ये पर्यटनवृद्धीला संधी आहे. पावसाळ्यात प्रत्येक रविवारी दोन ते तीन हजार पर्यटक गडाला भेट देत असतात. गडावरून मोरबे धरणाचा निसर्गरम्य परिसर पाहवयास मिळतो. गडाचा सुळका देशभरातील ट्रेकर्सला आकर्षित करत असतो. या परिसरातील रस्त्याचे काम मार्गी लावले व इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांची संख्या अजून वाढेल, असा विश्वास पर्यटकही व्यक्त करत आहेत.ऐतिहासिक इरशाळगडवाडीमधील नागरिकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी ‘आपले सरकार पोर्टल’वर पाठपुरावा केला होता. या तक्रारीची दखल घेऊन आदिवासीपाड्यामधील प्रत्येक घरात सौरऊर्जेचे दिवे दिले असून रस्त्याला पाइप रेलिंग केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.- प्रशांत रणवरे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Raigadरायगड