शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
3
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
4
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
5
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
6
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
7
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
8
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
9
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
10
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
11
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
13
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
14
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
15
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
16
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
17
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
18
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
19
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
20
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनिप्रदूषण धोकादायक पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 02:23 IST

महानगरपालिका क्षेत्रात गतवर्षीपेक्षाही ध्वनिप्रदूषण वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे

नामदेव मोरे ।नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात गतवर्षीपेक्षाही ध्वनिप्रदूषण वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवासी क्षेत्रामध्ये ५५ डेसिबल एवढा निकष असताना ऐरोली व घणसोलीमध्ये ते ७३ डेसिबलपर्यंत गेले आहे. शांतता क्षेत्रामध्येही दिवस-रात्र गोंगाटाची स्थिती असल्याचे यावर्षीच्या पर्यावरण स्थिती अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले असून शहरवासीयांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची स्थिती व्यक्त केली जात आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या २०१६-१७ वर्षाचा वार्षिक पर्यावरण स्थिती अहवाल १८ आॅगस्टला होणाºया सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. या अहवालामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. शहरातील ध्वनिप्रदूषणाच्या वास्तवाविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. निवासी, औद्योगिक रहदारी व शांतता क्षेत्रामध्येही ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. निवासी क्षेत्रामध्ये ५५ डेसिबल हा निकष निश्चित करण्यात आला आहे. परंतु एकाही विभागामध्ये या मर्यादेचे पालन होत नाही. घणसोली विभाग कार्यालय व ऐरोली से. १८ व १९ या जलकुंभ येथे सरासरी ७३ डेसिबलची नोंद झाली आहे. त्यानंतर वाशी हॉस्पिटल से. १० जवळ ६९ डेसिबलची नोंद झाली आहे.वाशी हॉस्पिटलजवळ २०१५-१६ वर्षामध्ये ५८ डेसिबलची नोंद झाली होती. २०१६-१७ या वर्षामध्ये ६ टक्केने वाढ होवून ते प्रमाण ६९ डेसिबल झाले आहे. रहदारी असणाºया क्षेत्रामध्ये आवाजाची पातळी वाढली आहे. दिघा विभाग कार्यालय परिसरामध्ये ७० डेसिबल, रबाळे पंप हाऊस व बेलापूर अग्निशमन केंद्राजवळ ६९ डेसिबलची नोंद झाली आहे.महानगरपालिका व वाहतूक विभागाने शहरातील शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल, धार्मिक स्थळे, वृद्धाश्रम असणारी ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. परंतु प्रत्यक्षात एकाही ठिकाणी शांतता दिसत नाही. प्रचंड गोंगाटामुळे विद्यार्थी, रुग्ण व इतर घटकांना त्रास होवू लागला आहे. शांतता क्षेत्रामध्ये ५० डेसिबलचा निकष आहे. पण प्रत्यक्षात कोपरखैरणे रा. फ. नाईक परिसरामध्ये ६५ डेसिबल, माथाडी हॉस्पिटल से. ५ परिसरामध्ये ६४ डेसिबलची नोंद झाली आहे. सीबीडी से. ४ मधील ज्ञानपुष्प विद्यामंदिर येथे सर्वात कमी ५५ डेसिबलची नोंद झाली असली तरी मूळ निकषांपेक्षा जास्त आहे.ध्वनिप्रदूषण कमी करण्याचे आव्हान पालिका व वाहतूक विभागासमोर उभे राहिले आहे. आवाजाची पातळी अशीच राहिली तर भविष्यात रक्तदाब, बहिरेपणा, चिडचिड होणे व इतर आजार वाढण्याची शक्यता आहे. वृद्ध, विद्यार्थी, रुग्ण यांच्या त्रासामध्येही भर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.>वाहनांमुळे वाढले प्रदूषणशहरामधील वाहनांची वाढती संख्याही ध्वनिप्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. २००९-१० या वर्षामध्ये २ लाख ३ हजार वाहने होती. २०१६-१७ मध्ये ही संख्या ४ लाख २५ हजार एवढी झाली आहे. एपीएमसी, एमआयडीसी, सायन-पनवेल, ठाणे-बेलापूर रोड परिसरात २४ तास हजारो वाहनांची वर्दळ असते. वाहनांच्या आवाजामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्याच्यावर नियंत्रण मिळविणे अशक्य होत आहे.नो हॉर्न मोहीमध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी शहरामध्ये नो हॉर्न मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्याची गरज आहे. निवासी क्षेत्रातही विनाकारण वाहनधारक विशेषत: मोटारसायकल चालविणारे तरुण हॉर्न वाजवत असतात. हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. शहरवासीयांच्या आरोग्य रक्षणासाठी नो हॉर्न मोहीम राबविण्यासाठी वाहतूक पोलीस, महानगरपालिका व सामाजिक संघटनांनी राबविण्याची गरज आहे.आरोग्यावर परिणामध्वनिप्रदूषणाचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर होवू लागला आहे. नागरिकांना रक्तदाब, चिडचिडेपणा, मानसिक संतुलन ढासळणे व बहिरेपणा येण्याची भीती व्यक्त केली जात असून याविषयी गांभीर्याने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.शहरातील ध्वनिप्रदूषणाचे वास्तवऐरोली व घणसोली निवासी क्षेत्रामध्ये ७३ डेसिबलची नोंदवाशी हॉस्पिटलजवळ ६९ डेसिबलची नोंदरहदारी क्षेत्रामध्ये दिघामध्ये ७० डेसिबलची नोंदरबाळे व बेलापूरमध्ये ६९ डेसिबलची नोंदशांतता क्षेत्रामध्ये रा. फ. नाईक विद्यालयजवळ ६५ डेसिबलची नोंद>ध्वनी पातळीचे निकष पुढीलप्रमाणेक्षेत्र डेसिबलनिवासी ५५रहदारी ६५शांतता ५०