शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

ध्वनिप्रदूषण धोकादायक पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 02:23 IST

महानगरपालिका क्षेत्रात गतवर्षीपेक्षाही ध्वनिप्रदूषण वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे

नामदेव मोरे ।नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात गतवर्षीपेक्षाही ध्वनिप्रदूषण वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवासी क्षेत्रामध्ये ५५ डेसिबल एवढा निकष असताना ऐरोली व घणसोलीमध्ये ते ७३ डेसिबलपर्यंत गेले आहे. शांतता क्षेत्रामध्येही दिवस-रात्र गोंगाटाची स्थिती असल्याचे यावर्षीच्या पर्यावरण स्थिती अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले असून शहरवासीयांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची स्थिती व्यक्त केली जात आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या २०१६-१७ वर्षाचा वार्षिक पर्यावरण स्थिती अहवाल १८ आॅगस्टला होणाºया सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. या अहवालामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. शहरातील ध्वनिप्रदूषणाच्या वास्तवाविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. निवासी, औद्योगिक रहदारी व शांतता क्षेत्रामध्येही ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. निवासी क्षेत्रामध्ये ५५ डेसिबल हा निकष निश्चित करण्यात आला आहे. परंतु एकाही विभागामध्ये या मर्यादेचे पालन होत नाही. घणसोली विभाग कार्यालय व ऐरोली से. १८ व १९ या जलकुंभ येथे सरासरी ७३ डेसिबलची नोंद झाली आहे. त्यानंतर वाशी हॉस्पिटल से. १० जवळ ६९ डेसिबलची नोंद झाली आहे.वाशी हॉस्पिटलजवळ २०१५-१६ वर्षामध्ये ५८ डेसिबलची नोंद झाली होती. २०१६-१७ या वर्षामध्ये ६ टक्केने वाढ होवून ते प्रमाण ६९ डेसिबल झाले आहे. रहदारी असणाºया क्षेत्रामध्ये आवाजाची पातळी वाढली आहे. दिघा विभाग कार्यालय परिसरामध्ये ७० डेसिबल, रबाळे पंप हाऊस व बेलापूर अग्निशमन केंद्राजवळ ६९ डेसिबलची नोंद झाली आहे.महानगरपालिका व वाहतूक विभागाने शहरातील शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल, धार्मिक स्थळे, वृद्धाश्रम असणारी ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. परंतु प्रत्यक्षात एकाही ठिकाणी शांतता दिसत नाही. प्रचंड गोंगाटामुळे विद्यार्थी, रुग्ण व इतर घटकांना त्रास होवू लागला आहे. शांतता क्षेत्रामध्ये ५० डेसिबलचा निकष आहे. पण प्रत्यक्षात कोपरखैरणे रा. फ. नाईक परिसरामध्ये ६५ डेसिबल, माथाडी हॉस्पिटल से. ५ परिसरामध्ये ६४ डेसिबलची नोंद झाली आहे. सीबीडी से. ४ मधील ज्ञानपुष्प विद्यामंदिर येथे सर्वात कमी ५५ डेसिबलची नोंद झाली असली तरी मूळ निकषांपेक्षा जास्त आहे.ध्वनिप्रदूषण कमी करण्याचे आव्हान पालिका व वाहतूक विभागासमोर उभे राहिले आहे. आवाजाची पातळी अशीच राहिली तर भविष्यात रक्तदाब, बहिरेपणा, चिडचिड होणे व इतर आजार वाढण्याची शक्यता आहे. वृद्ध, विद्यार्थी, रुग्ण यांच्या त्रासामध्येही भर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.>वाहनांमुळे वाढले प्रदूषणशहरामधील वाहनांची वाढती संख्याही ध्वनिप्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. २००९-१० या वर्षामध्ये २ लाख ३ हजार वाहने होती. २०१६-१७ मध्ये ही संख्या ४ लाख २५ हजार एवढी झाली आहे. एपीएमसी, एमआयडीसी, सायन-पनवेल, ठाणे-बेलापूर रोड परिसरात २४ तास हजारो वाहनांची वर्दळ असते. वाहनांच्या आवाजामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्याच्यावर नियंत्रण मिळविणे अशक्य होत आहे.नो हॉर्न मोहीमध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी शहरामध्ये नो हॉर्न मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्याची गरज आहे. निवासी क्षेत्रातही विनाकारण वाहनधारक विशेषत: मोटारसायकल चालविणारे तरुण हॉर्न वाजवत असतात. हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. शहरवासीयांच्या आरोग्य रक्षणासाठी नो हॉर्न मोहीम राबविण्यासाठी वाहतूक पोलीस, महानगरपालिका व सामाजिक संघटनांनी राबविण्याची गरज आहे.आरोग्यावर परिणामध्वनिप्रदूषणाचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर होवू लागला आहे. नागरिकांना रक्तदाब, चिडचिडेपणा, मानसिक संतुलन ढासळणे व बहिरेपणा येण्याची भीती व्यक्त केली जात असून याविषयी गांभीर्याने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.शहरातील ध्वनिप्रदूषणाचे वास्तवऐरोली व घणसोली निवासी क्षेत्रामध्ये ७३ डेसिबलची नोंदवाशी हॉस्पिटलजवळ ६९ डेसिबलची नोंदरहदारी क्षेत्रामध्ये दिघामध्ये ७० डेसिबलची नोंदरबाळे व बेलापूरमध्ये ६९ डेसिबलची नोंदशांतता क्षेत्रामध्ये रा. फ. नाईक विद्यालयजवळ ६५ डेसिबलची नोंद>ध्वनी पातळीचे निकष पुढीलप्रमाणेक्षेत्र डेसिबलनिवासी ५५रहदारी ६५शांतता ५०