शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक संदेश देणारे चित्ररथ ठरले आकर्षण

By admin | Updated: March 29, 2017 05:08 IST

नेरळ येथील नववर्ष शोभायात्रेचे उत्सव समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी

 कर्जत : नेरळ येथील नववर्ष शोभायात्रेचे उत्सव समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काढलेल्या या मिरवणुकीत सामाजिक आशय असणारे चित्ररथ नेरळकरांचे लक्ष वेधून घेत होते.नेरळमधील हेटकरआळीतील श्री गणेश मंदिरातून नववर्ष स्वागत यात्रेला सुरु वात झाली. त्याचवेळी पूर्व भागातून जयदीप क्र ीडा मंडळाने नववर्ष स्वागत यात्रा एसटी स्टॅन्ड येथून काढली. नेरळ गणेश मंदिर येथून निघालेली शोभायात्रा हेटकरआळी, टेपआळी, महेश चित्रमंदिर अशी आली. त्या वेळी पूर्व भागातून निघालेली शोभायात्रा देखील तेथे पोहचली. त्यानंतर भव्य शोभायात्रा हुतात्मा हिराजी पाटील चौकातून माथेरान-नेरळ रस्त्याने शिवाजी महाराज चौकात पोहचली. शोभायात्रेत पालखी, बैलगाडी रथ आदींसह अश्वारूढ झालेले बाल मावळे देखील होते. अखंड हरिनामाचा जयघोष करणारे वारकरी आणि लेझीमच्या तालावर फेर घेणाऱ्या महिला, तरु णी लक्ष वेधून घेत होत्या.महापुरु षांच्या वेशभूषानेरळ : कर्जत तालुक्यातील पोशीरमध्ये गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोशीरमधील सत्यमेव जयते ग्रुप, वारकरी सांप्रदाय आणि ग्रामस्थांच्या पुढाकाराने संपूर्ण गावात शोभायात्रा काढण्यात आली. च्शोभायात्रेत महापुरु षांच्या वेशभूषा साकारून जुन्या परंपरा, आठवणींना उजाळा, महिलांसाठी होममिनिस्टर कार्यक्र म आदी कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.च्पोशीरमध्ये सकाळी १० वाजता शोभायात्रा काढण्यात आली होती. लेझीम, ढोल- ताशे, भजन, हरिपाठ आणि महापुरु षांच्या वेशभूषा साकारु न जुन्या परंपरा, आठवणींना उजाळा दिला.च्या वेळी सत्यमेव जयते ग्रुपचे सर्व सदस्य, वारकरी सांप्रदाय, ग्रामस्थ सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमात साजरा केला गुढीपाडवाकार्लेखिंड : झेविअर इन्स्टिट्यूट आॅफ कम्युनिकेशन, मुंबईच्या विद्यार्थ्यांनी श्री समर्थ वृद्धाश्रम, परहुर येथे भेट देऊन गुढीपाडवा साजरा केला. अलिबाग तालुक्यातील परहुर या गावातील जयेंद्र गुंजाळ यांनी श्री समर्थ वृध्दाश्रम २००० साली चालू केला. सुरुवातीला त्यांनी घरातच वृध्दाश्रम चालू केला. आजमितीला ते निराधार वयोवृध्दांची सेवा करत आहेत. या आश्रमात रायगड, पुणे, ठाणे, मुंबई, तसेच महाराष्ट्राबाहेरचे वृध्द आहेत. २९ लोक या आश्रमात आपले उरलेले आयुष्य आनंदात जगत आहेत. ग्रामीण भागात असलेल्या आणि मोलाची सेवा करणाऱ्या वृध्दाश्रमाकडे मुंबई येथील झेविअर इन्स्टिट्यूड आॅफ कम्युनिकेशन या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना माहिती मिळाली या हेतूने वृध्दाश्रमास भेट दिली. नेरळमध्ये महिला सक्षमीकरण कार्यक्र मनेरळ : कर्जत तालुक्यात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करून अनेकांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. नेरळमधील साईमंदिर परिसरातील परिवार रहिवासी महासंघाने नववर्षाचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले. परिसरात महिला सक्षमीकरण कार्यक्र म आणि हळदीकुंकू कार्यक्र म राबवून गुढीपाडवा साजरा केला.नेरळमधील रहिवासी महासंघ वर्षभर अनेक कार्यक्र म राबवत असतात. रहिवासी महासंघ हा सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात विशेष काम करत आहे. त्यांच्यावतीने गुढीपाडव्यानिमित्त सकाळी १० वाजता शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर ११ वाजता महिला सक्षमीकरण कार्यक्र म पार पडला. ‘बेटी बचाओ’चा संदेशब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या पथकाने स्त्री भ्रूणहत्या या सामाजिक जाणिवेचे वास्तव प्रदर्शन करणारी चलचित्रे शोभायात्रेत सहभागी झाली होती. जयदीप मंडळाने मुलगी जगली पाहिजे, स्त्रियांचे कुटुंबासाठी योगदान आणि त्यांचे स्थान यावर कटाक्ष टाकणारे फलक नेरळकरांचे लक्ष वेधून घेत होते. नेरळमधील विविध राजकीय पक्षांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते यांची आणि प्रामुख्याने तरु णांची मोठी उपस्थिती शोभायात्रेत होती. कर्जतमध्ये नवववर्ष स्वागत यात्राकर्जत : मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त श्री कपालेश्वर देवस्थानच्या वतीने कर्जतमध्ये मराठी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्री कपालेश्वर मंदिराच्या येथून या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत देवस्थान समितीचे पद्माकर गांगल, ज्ञानेश्वर तिवाटणे, लीला चंदन, संदीप भोईर, अभिजित मराठे आदींसह कल्पना दास्ताने, नगरसेविका सुवर्णा जोशी, मालती साने, भारती म्हसे, शर्वरी कांबळे, वैदेही पुरोहित आदी उपस्थित होते.शिशुमंदिरात नववर्षाचे स्वागतकर्जत : गुढी उभारू मांगल्याची, चैतन्याची, यश, कीर्ती आणि समृद्धीची असा संदेश देत मंगळवारी कर्जतमधील अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या शिशुमंदिर शाळेतील सर्व शिक्षिकांनी मिळून शाळेत गुढ्या उभ्या करून हा सण साजरा केला. आपल्या भारतीय सौर वर्षाचे स्वागत अनोख्या पध्दतीने केले.मुख्याध्यापिका उमा डोंगरे यांनी सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगूत यातूनच आपल्या संस्कृतीचे जतन होईल असे सांगितले.