शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

सामाजिक संदेश देणारे चित्ररथ ठरले आकर्षण

By admin | Updated: March 29, 2017 05:08 IST

नेरळ येथील नववर्ष शोभायात्रेचे उत्सव समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी

 कर्जत : नेरळ येथील नववर्ष शोभायात्रेचे उत्सव समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काढलेल्या या मिरवणुकीत सामाजिक आशय असणारे चित्ररथ नेरळकरांचे लक्ष वेधून घेत होते.नेरळमधील हेटकरआळीतील श्री गणेश मंदिरातून नववर्ष स्वागत यात्रेला सुरु वात झाली. त्याचवेळी पूर्व भागातून जयदीप क्र ीडा मंडळाने नववर्ष स्वागत यात्रा एसटी स्टॅन्ड येथून काढली. नेरळ गणेश मंदिर येथून निघालेली शोभायात्रा हेटकरआळी, टेपआळी, महेश चित्रमंदिर अशी आली. त्या वेळी पूर्व भागातून निघालेली शोभायात्रा देखील तेथे पोहचली. त्यानंतर भव्य शोभायात्रा हुतात्मा हिराजी पाटील चौकातून माथेरान-नेरळ रस्त्याने शिवाजी महाराज चौकात पोहचली. शोभायात्रेत पालखी, बैलगाडी रथ आदींसह अश्वारूढ झालेले बाल मावळे देखील होते. अखंड हरिनामाचा जयघोष करणारे वारकरी आणि लेझीमच्या तालावर फेर घेणाऱ्या महिला, तरु णी लक्ष वेधून घेत होत्या.महापुरु षांच्या वेशभूषानेरळ : कर्जत तालुक्यातील पोशीरमध्ये गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोशीरमधील सत्यमेव जयते ग्रुप, वारकरी सांप्रदाय आणि ग्रामस्थांच्या पुढाकाराने संपूर्ण गावात शोभायात्रा काढण्यात आली. च्शोभायात्रेत महापुरु षांच्या वेशभूषा साकारून जुन्या परंपरा, आठवणींना उजाळा, महिलांसाठी होममिनिस्टर कार्यक्र म आदी कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.च्पोशीरमध्ये सकाळी १० वाजता शोभायात्रा काढण्यात आली होती. लेझीम, ढोल- ताशे, भजन, हरिपाठ आणि महापुरु षांच्या वेशभूषा साकारु न जुन्या परंपरा, आठवणींना उजाळा दिला.च्या वेळी सत्यमेव जयते ग्रुपचे सर्व सदस्य, वारकरी सांप्रदाय, ग्रामस्थ सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमात साजरा केला गुढीपाडवाकार्लेखिंड : झेविअर इन्स्टिट्यूट आॅफ कम्युनिकेशन, मुंबईच्या विद्यार्थ्यांनी श्री समर्थ वृद्धाश्रम, परहुर येथे भेट देऊन गुढीपाडवा साजरा केला. अलिबाग तालुक्यातील परहुर या गावातील जयेंद्र गुंजाळ यांनी श्री समर्थ वृध्दाश्रम २००० साली चालू केला. सुरुवातीला त्यांनी घरातच वृध्दाश्रम चालू केला. आजमितीला ते निराधार वयोवृध्दांची सेवा करत आहेत. या आश्रमात रायगड, पुणे, ठाणे, मुंबई, तसेच महाराष्ट्राबाहेरचे वृध्द आहेत. २९ लोक या आश्रमात आपले उरलेले आयुष्य आनंदात जगत आहेत. ग्रामीण भागात असलेल्या आणि मोलाची सेवा करणाऱ्या वृध्दाश्रमाकडे मुंबई येथील झेविअर इन्स्टिट्यूड आॅफ कम्युनिकेशन या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना माहिती मिळाली या हेतूने वृध्दाश्रमास भेट दिली. नेरळमध्ये महिला सक्षमीकरण कार्यक्र मनेरळ : कर्जत तालुक्यात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करून अनेकांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. नेरळमधील साईमंदिर परिसरातील परिवार रहिवासी महासंघाने नववर्षाचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले. परिसरात महिला सक्षमीकरण कार्यक्र म आणि हळदीकुंकू कार्यक्र म राबवून गुढीपाडवा साजरा केला.नेरळमधील रहिवासी महासंघ वर्षभर अनेक कार्यक्र म राबवत असतात. रहिवासी महासंघ हा सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात विशेष काम करत आहे. त्यांच्यावतीने गुढीपाडव्यानिमित्त सकाळी १० वाजता शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर ११ वाजता महिला सक्षमीकरण कार्यक्र म पार पडला. ‘बेटी बचाओ’चा संदेशब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या पथकाने स्त्री भ्रूणहत्या या सामाजिक जाणिवेचे वास्तव प्रदर्शन करणारी चलचित्रे शोभायात्रेत सहभागी झाली होती. जयदीप मंडळाने मुलगी जगली पाहिजे, स्त्रियांचे कुटुंबासाठी योगदान आणि त्यांचे स्थान यावर कटाक्ष टाकणारे फलक नेरळकरांचे लक्ष वेधून घेत होते. नेरळमधील विविध राजकीय पक्षांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते यांची आणि प्रामुख्याने तरु णांची मोठी उपस्थिती शोभायात्रेत होती. कर्जतमध्ये नवववर्ष स्वागत यात्राकर्जत : मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त श्री कपालेश्वर देवस्थानच्या वतीने कर्जतमध्ये मराठी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्री कपालेश्वर मंदिराच्या येथून या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत देवस्थान समितीचे पद्माकर गांगल, ज्ञानेश्वर तिवाटणे, लीला चंदन, संदीप भोईर, अभिजित मराठे आदींसह कल्पना दास्ताने, नगरसेविका सुवर्णा जोशी, मालती साने, भारती म्हसे, शर्वरी कांबळे, वैदेही पुरोहित आदी उपस्थित होते.शिशुमंदिरात नववर्षाचे स्वागतकर्जत : गुढी उभारू मांगल्याची, चैतन्याची, यश, कीर्ती आणि समृद्धीची असा संदेश देत मंगळवारी कर्जतमधील अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या शिशुमंदिर शाळेतील सर्व शिक्षिकांनी मिळून शाळेत गुढ्या उभ्या करून हा सण साजरा केला. आपल्या भारतीय सौर वर्षाचे स्वागत अनोख्या पध्दतीने केले.मुख्याध्यापिका उमा डोंगरे यांनी सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगूत यातूनच आपल्या संस्कृतीचे जतन होईल असे सांगितले.