शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नवी मुंबईसह तळोजा एमआयडीसीत कोरोनामुळे मंदावले उद्योगांचे चाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 10:50 IST

मनुष्यबळाची कमतरता; कच्चा माल मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम

नामदेव माेरे -

नवी मुंबई : शासनाने एमआयडीसीमधील सर्व उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु मनुष्यबळाची कमतरता व कच्चा माल मिळत नसल्याॐए उत्पादनक्षमता ५० टक्क्यांवर आहे. उद्योग टिकविताना तारेवरची कसरत होत आहे. राज्यातील सर्वात प्रमुख औद्योगिक वसाहतीमध्ये ठाणे- बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहतीचा समावेश आहे. नवी मुंबईमध्ये जवळपास ५ हजार छोटे-मोठे व तळोजामध्ये जवळपास १६२२ कारखाने आहेत. तीन लाखपेक्षा जास्त नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका उद्योगांना बसला आहे. दुसरी लाट सुरू झाल्यानंतरही शासनाने उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु इतर समस्यांमुळे उद्योगांचे चाक गाळातच रुतत चालले आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने इंजिनिअरिंग उद्योग जवळपास ठप्प झाला आहे. कोरोनाच्या भीतीने कामगार गावाकडे गेल्यामुळे पुरेसे मनुष्यबळ नाही. कच्चा माल मिळत नाही. उद्योगांना माल पोहोचविणारे व्यवसाय बंद आहेत. या सर्वांचा परिणाम उद्योगांवर होत आहे. लहान उद्योजकांचे कंबरडे मोडत असून, आर्थिक स्थिती खालावत आहे. पूर्णक्षमतेने व्यवसाय सुरू झाले, तरच उद्योग टिकविणे शक्य होणार आहे.

ऑक्सिजनचा परिणामकारखान्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा जवळपास बंद आहे. ऑक्सिजनच मिळत नसल्यामुळे फॅब्रिकेशन व इतर इंजिनिअरिंगची कामे बंद आहेत. जोपर्यंत ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत होणार नाही, तोपर्यंत कारखानेही सुरू होणार नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

वाहतुकीचा प्रश्नऔद्योगिक वसाहतीमध्ये मुुंबई, ठाणे व इतर परिसरातून अनेक कामगार येतात. या कामगारांना रेल्वे व बसने प्रवास करता येत नाही. यामुळे कामगारांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला असून, त्याचा परिणामही उद्योगांवर होत आहे.

ठाणे- बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये कारखाने सुरू आहेत. परंतु कच्चा माल मिळत नाही. मनुष्यबळाची कमतरता आहे. यामुळे उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.- एम. एम. ब्रम्हे    सचिव, टीबीआयए

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये ऑक्सिजन गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे उत्पादनक्षमतेवर परिणाम झाला आहे. उद्योग सुरू आहेत. परंतु गॅस, मनुष्यबळ व इतर साहित्याचा पुरवठा होत नसल्यामुळे अपेक्षित उत्पादन होत नाही.- के. आर. गोपी    अध्यक्ष - टीएमआयए

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील व्यवसाय सुरू आहेत. परंतु उद्योगांना कच्चा माल व इतर साहित्य पुरविणारे व्यवसाय बंद असल्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. वाहतूक, गॅसपुरवठा व इतर अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे.- सतीश शेट्टी, अध्यक्ष, तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन

कच्चा माल कोठून आणायचा?एमआयडीसीमधील कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु कारखान्यांना कच्चा माल पुरविणारे व्यवसाय बंद ठेवले आहेत. यामुळे कच्चा माल आणायचा कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्यांसाठी लागणारे हार्डवेअर व इतर साहित्यही मिळत नाही. यामुळे उत्पादनक्षमतेवर परिणाम होऊ लागला आहे. 

टॅग्स :businessव्यवसायNavi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस