शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

Coronavirus: लोकल बंद असल्याने रिक्षा व्यवसायात मंदी; कोरोनाच्या भीतीने टाळला जातोय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 23:32 IST

Lockdown Effect on Auto Service News: शाळा, महाविद्यालये बंद असल्याने, रिक्षाच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अनेक नागरिक कमी अंतरासाठी पायी चालत जाणे पसंत करीत आहेत.

नवी मुंबई : लॉकडाऊननंतर हळूहळू विविध गोष्टी खुल्या केल्या जात असून, राज्यात अनलॉक पाचची घोषणाही करण्यात आली आहे. गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने अद्याप लोकल सेवा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. कोरोनाच्या भीतीनेहूी अनेक प्रवासी रिक्षा प्रवास टाळत असून, रिक्षा व्यवसायात मंदी आली असून, रिक्षाचालक चिंतेत आहेत.

लॉकडाऊनमुळे हातावर पोट अवलंबून असलेल्या नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नवी मुंबई शहरात रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामधील अनेक रिक्षाचालक भाड्याच्या घरांमध्ये वास्तव्य करीत असून, भाड्याच्या रिक्षा चालवितात. सध्या व्यवसाय बंद असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकरीचे झाले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकल सेवा अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक खासगी वाहने, तसेच बसने प्रवास करत आहेत. लोकल सेवा बंद असल्याने रेल्वे स्थानकांपर्यंत रिक्षाने प्रवास करणारे प्रवासी नसल्याने, तसेच बस स्टॉप सोसायट्यांपासून काही अंतरावर असल्याने रिक्षाचा प्रवास टाळला जात आहे.

शाळा, महाविद्यालये बंद असल्याने, रिक्षाच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अनेक नागरिक कमी अंतरासाठी पायी चालत जाणे पसंत करीत आहेत. रिक्षा स्टँडवर तासन्तास प्रतीक्षा करूनही प्रवासी मिळत नसल्याने रिक्षाचालक चिंतेत आहेत. विविध कारणांमुळे रिक्षाच्या व्यवसाय मंदी असून, व्यवसाय सुरू होऊनही रिक्षाचालकांना उदरनिर्वाह करणे जिकरीचे झाले आहे.स्थानकांजवळील रिक्षा स्टँड ओसकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकल सेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय रेल्वे स्थानकात ये-जा करणारे इतर प्रवासी नाहीत. त्यामुळे शहरातील रेल्वे स्थानकाबाहेरील अनेक रिक्षा स्टँड ओस पडले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbai Localमुंबई लोकलauto rickshawऑटो रिक्षा