शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

Coronavirus: लोकल बंद असल्याने रिक्षा व्यवसायात मंदी; कोरोनाच्या भीतीने टाळला जातोय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 23:32 IST

Lockdown Effect on Auto Service News: शाळा, महाविद्यालये बंद असल्याने, रिक्षाच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अनेक नागरिक कमी अंतरासाठी पायी चालत जाणे पसंत करीत आहेत.

नवी मुंबई : लॉकडाऊननंतर हळूहळू विविध गोष्टी खुल्या केल्या जात असून, राज्यात अनलॉक पाचची घोषणाही करण्यात आली आहे. गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने अद्याप लोकल सेवा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. कोरोनाच्या भीतीनेहूी अनेक प्रवासी रिक्षा प्रवास टाळत असून, रिक्षा व्यवसायात मंदी आली असून, रिक्षाचालक चिंतेत आहेत.

लॉकडाऊनमुळे हातावर पोट अवलंबून असलेल्या नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नवी मुंबई शहरात रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामधील अनेक रिक्षाचालक भाड्याच्या घरांमध्ये वास्तव्य करीत असून, भाड्याच्या रिक्षा चालवितात. सध्या व्यवसाय बंद असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकरीचे झाले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकल सेवा अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक खासगी वाहने, तसेच बसने प्रवास करत आहेत. लोकल सेवा बंद असल्याने रेल्वे स्थानकांपर्यंत रिक्षाने प्रवास करणारे प्रवासी नसल्याने, तसेच बस स्टॉप सोसायट्यांपासून काही अंतरावर असल्याने रिक्षाचा प्रवास टाळला जात आहे.

शाळा, महाविद्यालये बंद असल्याने, रिक्षाच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अनेक नागरिक कमी अंतरासाठी पायी चालत जाणे पसंत करीत आहेत. रिक्षा स्टँडवर तासन्तास प्रतीक्षा करूनही प्रवासी मिळत नसल्याने रिक्षाचालक चिंतेत आहेत. विविध कारणांमुळे रिक्षाच्या व्यवसाय मंदी असून, व्यवसाय सुरू होऊनही रिक्षाचालकांना उदरनिर्वाह करणे जिकरीचे झाले आहे.स्थानकांजवळील रिक्षा स्टँड ओसकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकल सेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय रेल्वे स्थानकात ये-जा करणारे इतर प्रवासी नाहीत. त्यामुळे शहरातील रेल्वे स्थानकाबाहेरील अनेक रिक्षा स्टँड ओस पडले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbai Localमुंबई लोकलauto rickshawऑटो रिक्षा