शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

सुधागड संवर्धनासाठी शिवप्रेमी एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 02:13 IST

गड घेतला दत्तक : श्रमदानातून ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी; बा रायगड परिवारचा पुढाकार

नामदेव मोरे 

नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील सुधागड किल्ला संवर्धनासाठी शिवप्रेमींनी दत्तक घेतला आहे. बा रायगड परिवार संस्थेच्या शिलेदारांनी दोन वर्षांपासून ग्रामस्थ, वनविभाग व भोराईदेवी संस्था यांच्यासह सर्वांना विश्वासात घेऊन विकासकामे सुरू केली आहेत. महादरवाजासह ऐतिहासिक वास्तूंची साफसफाई करण्यात आली आहे. पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता केली आहे. सर्वत्र माहिती फलक लावण्यात आले असून कोसळलेले महादेव मंदिर उभारण्याचे कामही सुरू केले आहे.

गड, किल्ले हे महाराष्ट्राचे खरे वैभव आहे. परंतु पुरातत्व विभाग व शासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक किल्यांचे खंडरात रूपांतर झाले आहे. सरकार ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी काहीच करत नाही अशी ओरड सर्वत्र होताना दिसत असते. बा रायगड परिवार संस्थेमधील शिवप्रेमींनी कोणालाही दोष न देता दोन वर्षांपासून सुधागड किल्ला संवर्धनासाठी दत्तक घेतला आहे. संस्थेचे शिलेदार प्रत्येक शनिवारी रात्री गडावर पोहचतात. रविवारी दिवसभर श्रमदान करून ऐतिहासिक वास्तूंची साफसफाई व डागडुजी करत आहेत. गडावर पोहचण्याच्या दोन्ही मार्गावर सूचना फलक प्रसिद्ध केले आहेत. गडावरील तलाव, पाण्याच्या टाक्या, टकमक टोक, भोरेश्वर, महादेव , हनुमान व इतर मंदिरे, पंतसचिवांचा वाडा व सर्व ठिकाणे कोणत्या दिशेला आहेत याचे फलक लावण्यात आले आहेत. पाच्छापूर गावातून गडावर गेल्यानंतर पहिल्याच बुरुजामध्ये एक मोठी खोली तयार करण्यात आली होती. त्यामध्ये दगड, माती जावून बुजली होती. तरुणांनी सर्व घाण काढून ती मोकळी केली आहे. महादरवाजामध्येही दगड व मातीचा खच पडला होता. दरवाजामधून आत येण्यासही अडथळा निर्माण होत होता. श्रमदानातून येथील माती व दगडांचा भराव काढण्यात आला आहे. गडावर शिवजयंतीला मोठा उत्सव आयोजित करण्यात येतो. यावेळी मशाल महोत्सवामध्ये शेकडो तरुण सहभागी होत असतात.

गडावरील महादेव मंदिराची दुरवस्था झाली होती. मंदिर पडले असून उघड्यावर महादेवाची पिंड होती. बा रायगड परिवार संस्थेमधील तरुणांनी पाच्छापूर ग्रामस्थ, भोराईदेवी संस्थान व वनविभागाची परवानगी घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केला आहे. मंदिर उभारणीसाठी गडावरील माती व दगडांचा वापर केला जात आहे. काही प्रमाणात सिमेंट व वाळू लागत असून ती ठाकूरवाडी गावातून दोन तासांचा गड चडून वर आणावे लागत आहे. यासाठी स्थानिक नागरिकांची मदत घेतली जात आहे. मंदिर आकारास येऊ लागले आहे. दोन वर्षे सातत्याने गड संवर्धनाचे काम सुरू असून या अभियानामध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. संस्थेच्यावतीने परिसरातील शाळांमध्ये सायकल वाटपही करण्यात आले आहे. शिवप्रेमींच्या प्रयत्नामुळे गडाला भेट देणाºयांची संख्याही वाढली आहे.सुधागडचे ऐतिहासिक महत्त्वसुधागड हा देशातील प्राचीन किल्ल्यांमधील एक आहे. या परिसरातील ठाणाळे लेणी २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यामुळे सुधागडही तेव्हापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. १६४८ मध्ये हा किल्ला स्वराज्यात आला. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर गावामध्ये छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबचा मुलगा अकबर यांची भेट झाली होती. हा किल्ला म्हणजे भोर संस्थानचे वैभव समजले जाते. याला पूर्वी भोरपगड असेही म्हणत. गडावर शेकडो वर्षांपासून भोराई देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सव साजरा केला जातो.साहित्य गडावर नेण्याची कसोटीगडावरील मंदिराचे व इतर दुरुस्तीचे काम करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य ठाकूरवाडी गावातून दोन तासांचा डोंगर चढावा लागत आहे. मंदिरावरील छतासाठी पत्रे व लोखंडही गडावर घेऊन जावे लागणार आहे. यासाठी जास्तीत जास्त शिवप्रेमींना श्रमदानासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन वर्षे सर्व संकटावर मात करून तरुण संवर्धनाचे काम करत आहेत. बा रायगड परिवार संस्थेच्या फेसबुक पेजवरून संपर्क नंबर घेऊन अनेक तरुण या मोहिमेमध्ये सहभागी होऊन संवर्धनाच्या कामात योगदान देत आहेत.बा रायगड परिवार संस्था महाराष्ट्रभर दुर्गसंवर्धनाचे काम करत आहे. दोन वर्षांपासून सुधागड किल्ला विकासासाठी दत्तक घेतला आहे. स्थानिक ग्रामस्थ, वनविभाग, भोराईदेवी संस्था व किल्ल्याशी संबंधित सर्वांचे चांगले सहकार्य लाभत आहे. सर्वांना सोबत घेवून वास्तूंची देखभाल व मंदिर उभारणीपासून सूचना फलकापर्यंत सर्व कामे केली जात आहेत.- चैतन्य भालेराव,उपाध्यक्ष,बा रायगड परिवारशिवप्रेमी तरुण व नागरिकांच्या मदतीने दोन वर्षांपासून सुधागड संवर्धन मोहीम सुरू आहे. या मोहिमेमध्ये अनेक तरुण सहभागी होऊन श्रमदान करत आहेत. याठिकाणी शिवजयंती उत्सव सुरू केला असून त्यावेळीही शेकडो तरुण उपस्थित रहात असतात. या अभियानामध्ये जास्तीत जास्त शिवप्रेमींनी सहभागी व्हावे.- रूपेश शेळके,मुख्य कार्यकारिणी सदस्य,बा रायगड परिवार

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई