शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईकरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 03:20 IST

महावितरणने लादलेले लोडशेडिंग व कळवा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या स्फोटामुळे नवी मुंबईत विजेचा लपंडाव सुरू झाला आहे.

नवी मुंबई : महावितरणने लादलेले लोडशेडिंग व कळवा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या स्फोटामुळे नवी मुंबईत विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. सलग दोन दिवस सुरू असलेल्या समस्येमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वीजपुरवठा तत्काळ सुरळीत झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.नवी मुंबईमधील तापमान ३६ अंशावर गेले आहे. तीव्र उकाड्यामुळे शहरवासी त्रस्त झाले असताना दोन दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. गुरुवारी ३१ मे रोजी घणसोली परिसरात सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांनी महावितरण कार्यालयात फोन करून माहिती घेण्यास सुरवात केली होती, परंतु व्यवस्थित माहिती दिली जात नव्हती. शहरातील इतरही काहीपरिसरामध्ये विजेचा लपंडाव सुरू झाला होता.बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास कळवा येथील उपकेंद्रामध्ये अचानक स्फोट झाल्याने विजेच्या लपंडावामध्ये भर पडली आहे. या परिसरातील वीज मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याचा महावितरणकडून प्रयत्न सुरू असून शहरात अनेक ठिकाणी भारनियमन सुरू केले आहे. महापारेषणला तांत्रिक अडचण दुरुस्त करण्यास अजून एक दिवस विलंब लागणार आहे. यामुळे विजेचा लपंडाव सुरू राहणार असल्याचे महावितरणच्यावतीने स्पष्ट केले आहे.घणसोली परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महावितरणच्यावतीने नागरिकांना वेळेवर माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे अशीच स्थिती राहिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला. वाशी, नेरूळ, सीवूड व सीबीडी बेलापूर परिसरामध्ये दुपारी वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक वीजपुरवठा बंद झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईकरांवर भारनियमन लादले जावू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.शुक्रवारी ऐरोली ते सीबीडीपर्यंत वीजपुरवठा बंद असल्यामुळे अनेक नागरिकांनी शहरातील मॉल्सचा आश्रय घेतल्याचे चित्र पहावयास मिळत होते. विद्युतपुरवठा कधी सुरू होणार याची विचारणा करण्यासाठी महावितरणच्या प्रत्येक कार्यालयात शेकडो नागरिक फोन करुन विचारणा करत होते.एमआयडीसीच्या कामावर परिणामवीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. शुक्रवारमुळे कारखाने बंद झाले असले तरी आयटी पार्क व इतर उद्योगांवर परिणाम झाला होता. शनिवारी वेळेत वीजपुरवठा सुरू झाला नाही तर अनेक कारखाने बंद ठेवावे लागणार असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.गरमीमुळे नागरिकांचे हालऐरोली ते सीबीडीपर्यंत विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. वाढलेल्या तापमानामुळे घरात व कार्यालयांमध्ये थांबणेही अशक्य झाले होते. वीजपुरवठा लवकर पूर्ववत व्हावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.