शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

नवी मुंबईकरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 03:20 IST

महावितरणने लादलेले लोडशेडिंग व कळवा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या स्फोटामुळे नवी मुंबईत विजेचा लपंडाव सुरू झाला आहे.

नवी मुंबई : महावितरणने लादलेले लोडशेडिंग व कळवा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या स्फोटामुळे नवी मुंबईत विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. सलग दोन दिवस सुरू असलेल्या समस्येमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वीजपुरवठा तत्काळ सुरळीत झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.नवी मुंबईमधील तापमान ३६ अंशावर गेले आहे. तीव्र उकाड्यामुळे शहरवासी त्रस्त झाले असताना दोन दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. गुरुवारी ३१ मे रोजी घणसोली परिसरात सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांनी महावितरण कार्यालयात फोन करून माहिती घेण्यास सुरवात केली होती, परंतु व्यवस्थित माहिती दिली जात नव्हती. शहरातील इतरही काहीपरिसरामध्ये विजेचा लपंडाव सुरू झाला होता.बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास कळवा येथील उपकेंद्रामध्ये अचानक स्फोट झाल्याने विजेच्या लपंडावामध्ये भर पडली आहे. या परिसरातील वीज मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याचा महावितरणकडून प्रयत्न सुरू असून शहरात अनेक ठिकाणी भारनियमन सुरू केले आहे. महापारेषणला तांत्रिक अडचण दुरुस्त करण्यास अजून एक दिवस विलंब लागणार आहे. यामुळे विजेचा लपंडाव सुरू राहणार असल्याचे महावितरणच्यावतीने स्पष्ट केले आहे.घणसोली परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महावितरणच्यावतीने नागरिकांना वेळेवर माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे अशीच स्थिती राहिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला. वाशी, नेरूळ, सीवूड व सीबीडी बेलापूर परिसरामध्ये दुपारी वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक वीजपुरवठा बंद झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईकरांवर भारनियमन लादले जावू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.शुक्रवारी ऐरोली ते सीबीडीपर्यंत वीजपुरवठा बंद असल्यामुळे अनेक नागरिकांनी शहरातील मॉल्सचा आश्रय घेतल्याचे चित्र पहावयास मिळत होते. विद्युतपुरवठा कधी सुरू होणार याची विचारणा करण्यासाठी महावितरणच्या प्रत्येक कार्यालयात शेकडो नागरिक फोन करुन विचारणा करत होते.एमआयडीसीच्या कामावर परिणामवीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. शुक्रवारमुळे कारखाने बंद झाले असले तरी आयटी पार्क व इतर उद्योगांवर परिणाम झाला होता. शनिवारी वेळेत वीजपुरवठा सुरू झाला नाही तर अनेक कारखाने बंद ठेवावे लागणार असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.गरमीमुळे नागरिकांचे हालऐरोली ते सीबीडीपर्यंत विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. वाढलेल्या तापमानामुळे घरात व कार्यालयांमध्ये थांबणेही अशक्य झाले होते. वीजपुरवठा लवकर पूर्ववत व्हावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.