शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

नवी मुंबईकरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 03:20 IST

महावितरणने लादलेले लोडशेडिंग व कळवा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या स्फोटामुळे नवी मुंबईत विजेचा लपंडाव सुरू झाला आहे.

नवी मुंबई : महावितरणने लादलेले लोडशेडिंग व कळवा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या स्फोटामुळे नवी मुंबईत विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. सलग दोन दिवस सुरू असलेल्या समस्येमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वीजपुरवठा तत्काळ सुरळीत झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.नवी मुंबईमधील तापमान ३६ अंशावर गेले आहे. तीव्र उकाड्यामुळे शहरवासी त्रस्त झाले असताना दोन दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. गुरुवारी ३१ मे रोजी घणसोली परिसरात सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांनी महावितरण कार्यालयात फोन करून माहिती घेण्यास सुरवात केली होती, परंतु व्यवस्थित माहिती दिली जात नव्हती. शहरातील इतरही काहीपरिसरामध्ये विजेचा लपंडाव सुरू झाला होता.बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास कळवा येथील उपकेंद्रामध्ये अचानक स्फोट झाल्याने विजेच्या लपंडावामध्ये भर पडली आहे. या परिसरातील वीज मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याचा महावितरणकडून प्रयत्न सुरू असून शहरात अनेक ठिकाणी भारनियमन सुरू केले आहे. महापारेषणला तांत्रिक अडचण दुरुस्त करण्यास अजून एक दिवस विलंब लागणार आहे. यामुळे विजेचा लपंडाव सुरू राहणार असल्याचे महावितरणच्यावतीने स्पष्ट केले आहे.घणसोली परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महावितरणच्यावतीने नागरिकांना वेळेवर माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे अशीच स्थिती राहिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला. वाशी, नेरूळ, सीवूड व सीबीडी बेलापूर परिसरामध्ये दुपारी वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक वीजपुरवठा बंद झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईकरांवर भारनियमन लादले जावू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.शुक्रवारी ऐरोली ते सीबीडीपर्यंत वीजपुरवठा बंद असल्यामुळे अनेक नागरिकांनी शहरातील मॉल्सचा आश्रय घेतल्याचे चित्र पहावयास मिळत होते. विद्युतपुरवठा कधी सुरू होणार याची विचारणा करण्यासाठी महावितरणच्या प्रत्येक कार्यालयात शेकडो नागरिक फोन करुन विचारणा करत होते.एमआयडीसीच्या कामावर परिणामवीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. शुक्रवारमुळे कारखाने बंद झाले असले तरी आयटी पार्क व इतर उद्योगांवर परिणाम झाला होता. शनिवारी वेळेत वीजपुरवठा सुरू झाला नाही तर अनेक कारखाने बंद ठेवावे लागणार असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.गरमीमुळे नागरिकांचे हालऐरोली ते सीबीडीपर्यंत विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. वाढलेल्या तापमानामुळे घरात व कार्यालयांमध्ये थांबणेही अशक्य झाले होते. वीजपुरवठा लवकर पूर्ववत व्हावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.