शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

साडेबारा टक्के योजनेतील शुक्राचार्य: प्रकल्पग्रस्तांना दुय्यम वागणूक; एजंट, बिल्डर्सना पायघड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:57 IST

भूमिहीन झालेल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा एक भाग म्हणून सिडकोने साडेबारा टक्के भूखंड योजना सुरू केली; परंतु विविध कारणांमुळे या योेजनेला म्हणावे तसे यश आलेले नाही. यातील प्रमुख कारण भ्रष्टाचार हे असले तरी भ्रष्टाचाराचा भस्मासुर पोसणारे सिडकोचेच अधिकारी असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. आता तर ही योजना शेवटच्या टप्प्यात आली आहे, किंबहुना सिडकोकडून तसा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र अद्यापि अनेक लाभधारक भूखंड मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या या दीर्घकालीन प्रतीक्षेला सिडकोच्या या विभागातील काही शुक्राचार्यांचा अडथळा ठरताना दिसत आहे.

कमलाकर कांबळे नवी मुंबई : भूमिहीन झालेल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा एक भाग म्हणून सिडकोने साडेबारा टक्के भूखंड योजना सुरू केली; परंतु विविध कारणांमुळे या योेजनेला म्हणावे तसे यश आलेले नाही. यातील प्रमुख कारण भ्रष्टाचार हे असले तरी भ्रष्टाचाराचा भस्मासुर पोसणारे सिडकोचेच अधिकारी असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. आता तर ही योजना शेवटच्या टप्प्यात आली आहे, किंबहुना सिडकोकडून तसा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र अद्यापि अनेक लाभधारक भूखंड मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या या दीर्घकालीन प्रतीक्षेला सिडकोच्या या विभागातील काही शुक्राचार्यांचा अडथळा ठरताना दिसत आहे.सिडकोच्या म्हणण्यानुसार साडेबारा टक्के योजनेची केवळ ८ टक्के प्रकरणे शिल्लक आहेत. ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी प्रकरणांचा निपटारा होत आला आहे. त्यामुळे या विभागातून ही योजना बंद करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. शिल्लक राहिलेली प्रकरणे न्यायालयीन वाद, वारसा हक्क तसेच अतिरिक्त बांधकाम आदींमुळे रखडल्याचा दावा सिडकोकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या रायगड जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. मात्र, या विभागात पोसलेल्या भ्रष्ट मनोवृत्तीमुळे या प्रक्रियेला खीळ बसताना दिसत आहे. आजही प्रकल्पग्रस्तांना या विभागात स्थान मिळत नाही. उलट एजंट व बिल्डर्ससाठी पायघड्या घातल्या जात आहेत. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सिडकोत मागील चार वर्षांपासून स्वतंत्र दक्षता विभाग कार्यरत आहे. भ्रष्टाचाराविषयीच्या तक्रारीची शहानिशा करून तसा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जातो. विशेष म्हणजे मागील दोन अडीच वर्षांत साडेबारा टक्के विभागातील भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण उघडकीस आले नाही. याचा अर्थ या विभागात सर्व काही आलबेल आहे, असेही नसल्याचे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. कारण या विभागात आजही अर्थपूर्ण गोष्टींनाच प्राधान्य दिले जाते. सर्वसामान्यांना केवळ सातव्या मजल्याच्या फेºया माराव्या लागतात. काही कर्मचाºयांनी तर या विभागाचा कारभार आपल्याशिवाय चालणारच नाही, असा समज करून घेतल्याचे जाणवते.साडेबारा टक्के विभागाचे क्षेत्र अधिकारी म्हणून काम पाहणारे सुनील तांबे यांच्याविषयी अनेक तक्रारी आहेत. या तक्रारीची दखल घेत दक्षता विभागाने काही दिवसांपूर्वी त्यांची व त्यांच्या चालकाची चौकशीही केली होती. त्यानुसार सोमवारी त्यांची या विभागातून उचलबांगडी करण्यात आल्याचे समजते.याच विभागात क्लार्क म्हणून कार्यरत असणाºया दीपक भोपी यांचा किस्सा तर मजेदार आहे. काही वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून त्यांची साडेबारा टक्के विभागातून बदली करण्यात आली होती, परंतु अलीकडेच त्यांना पुन्हा साडेबारा टक्के विभागात पाठविण्यात आले. त्यांच्याकडे केवळ द्रोणागिरी विभागातील संचिका हाताळण्याची जबाबदारी देण्यात आली, परंतु त्यांनी ठाणे विभागातील प्रकरणांत सुद्धा हस्तक्षेप करायला सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर या कामासाठी त्यांनी एका बाह्य कर्मचाºयाची बेकायदेशीररीत्या नेमणूक केल्याचा आरोप होत आहे. याबाबत तक्रार प्राप्त होताच दक्षता विभागाने त्या बाह्य कर्मचाºयाची चौकशी केली. दक्षता विभागाच्या अहवालानंतर व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी भोपी यांची या विभागातून उचलबांगडी केली. तथापि मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (रायगड) किसन जावळे यांच्या विनंतीनुसार भोपी यांना ३0 नोव्हेंबरपर्यंत या विभागात काम करण्याची मुभा देण्यात आली. आता डिसेंबरचा अर्धा महिना झाला तरी भोपी याच विभागात कार्यरत असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे, तर जावळे यांनी विशेष प्रस्तावाद्वारे भोपी यांना याच विभागात ठेवण्याची विनंती केल्याचे समजते. या प्रस्तावावर सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनीही स्वाक्षरी केल्याची अधिकृत माहिती आहे. सध्या हा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्याकडे पाठविल्याचे समजते. वर्षानुवर्षे साडेबारा टक्केचा संगणकीय विभाग हाताळणारे किरण चिटणीस यांच्याविषयीच्या वाढत्या तक्रारीची दखल घेत सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी त्यांची चौकशी लावली होती. या चौकशीच्या अहवालानंतर गगराणी यांनी चिटणीस यांची बदली केली. परंतु चिटणीस यांच्या बदलीचा साडेबारा टक्के भूखंडाच्या सोडतीवर परिणाम होईल, अशी सबब सांगून जावळे यांनी त्यांची बदली रद्द करून घेतल्याचे सांगितले जाते.एकूणच साडेबारा टक्केच नव्हे, तर सिडकोच्या विविध विभागात पोसल्या गेलेल्या शुक्राचार्यामुळेच सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाºया सिडकोची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे यासंदर्भात ठोस कार्यवाही करण्याची गरज असल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे.कामगारसंघटनेचा दबाव?मर्जीतल्या कर्मचाºयांची लाभाच्या अर्थात साडेबारा टक्के विभागात वर्णी लागावी, यासाठी कर्मचारी संघटनेकडून प्रशासनावर दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. भोपी यांची बदली रद्द करून याच विभागात कायम ठेवावे, यासाठी काही बाह्य यंत्रणासुद्धा प्रयत्नशील असल्याचे समजते.मंत्र्यांच्या कथित नातलगांचा वावरपारंपरिक एजंट आणि बिल्डर्स यांच्याबरोबरच सिडकोत आजी-माजी मंत्र्यांच्या कथित नातलगांचा वावर वाढला आहे. आपण अमुक मंत्र्यांचे, तमुक आमदारांचे स्नेही असल्याच्या बाता मारून अधिकाºयांवर दबाव आणला जात आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी आजी-माजी मंत्र्यांच्या या कथित बगलबच्च्यासमोर काहीसे दबकूनच काम करीत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे हे महाभाग सिडकोच्या कोणत्याही विभागात अगदी बिनरोकपणे वावरताना दिसतात. खिशात एखाद्या मंत्र्याबरोबरचा फोटो घेऊन अधिकारी व कर्मचाºयांसमोर आपल्या कामाचा प्रस्ताव घेऊन येत आहेत. या प्रकाराला आळा घालण्याचे आव्हान सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्यासमोर उभे ठाकले आहे.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई