शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

रिलायन्सला बजावणार कारणे दाखवा नोटीस; नवी मुंबईतील कार्पोरेट पार्कमधील गंभीर प्रकार

By नारायण जाधव | Updated: August 11, 2023 17:13 IST

एमपीसीबीच्या संमतीविनाच सुरू होते रिलायन्सच्या डिजिटल सीम कार्डचे उत्पादन; पेट्रोलियम पदार्थांचे संशोधन अन् विकास.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मुकेश अंबानी यांच्या नवी मुंबईतीलरिलायन्स काॅर्पोरेट पार्कमध्ये एमपीसीबीच्या अर्थात महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीविनाच डिजिटल सीम कार्डचे उत्पादन, पेट्रोलियम पदार्थांवर संशोधन आणि विकासकामांसह अंतर्गत कर्मचारी प्रशिक्षण सुरू असल्याचे आणि उत्पादित वस्तू ठेवण्यासाठी गोदामाचे बांधकाम केल्याचे निर्दशनास आले आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीस कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे.

रिलायन्स समूहाने त्यांच्या नवी मुंबईतील रिलायन्स काॅर्पोरेट पार्कमध्ये कंपनी सीम कार्डचे उत्पादन, पेट्रोलियम पदार्थांवर संशोधन आणि विकासकामांसह अंतर्गत कर्मचारी प्रशिक्षण सुरू करण्यासाठी आणि उत्पादित वस्तू ठेवण्यासाठी गोदामाच्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीपत्रासाठी अर्ज केला होता. यावर कंपनी २८६ कोटी ७६ लाख रुपये खर्च करणार आहे. यासाठी कंपनीने ३ जानेवारी २०१२ रोजी घेतलेले एक संमतीपत्र जोडले होते.

याबाबतचा प्रस्ताव प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जुलै महिन्यातील संमती समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला असता समितीतील तज्ज्ञांच्या नजरेतून रिलायन्सने केलेला बनाव उघड झाला. विशेष म्हणजे अर्जासोबत आधी घेतलेल्या ३ जानेवारी २०१२ च्या संमतीपत्राची मुदत कधीच संपली असून त्यात पेट्रोलियम पदार्थांवरील रिसर्च अँड डेव्हलपमेंट अर्थात संशोधन आणि विकासकामांचा उल्लेखच नव्हता. असे असतानाही कंपनीने पेट्रोलियम पदार्थांवरील संशोधन आणि विकास कामांसाठी युनिटचे बांधकाम केले आहे. डिजिटल सीम कार्ड उत्पादनासाठी औद्योगिक शेड बांधून उत्पादन घेतले. उत्पादित माल ठेवण्यासाठी गोदामाचेही बांधकाम केले आहे. हा गंभीर बनाव उघड झाल्यानंतर या बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळाने रिलायन्स कंपनीस कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. . याबाबतचे इतिवृत्त ‘लोकमत’कडे उपलब्ध आहे.रासायनिक पदार्थांच्या विल्हेवाटीवर प्रश्नचिन्ह

जर संमतीपत्राविनाच पेट्रोलियम पदार्थांवरील संशोधन विकास सुरू होता, तर मग त्यातून बाहेर पडणाऱ्या रासायनिक, पेट्रोलियम पदार्थांची विल्हेवाट कशी आणि कोठे लावण्यात येत होती, त्यावर प्रक्रिया केली होती की नाही, यामुळे होणाऱ्या पर्यावरण ऱ्हासाला जबाबदार कोण, याचा शोध घेण्याची मागणी होत आहे, तसेच कंपनीस शेड आणि उत्पादित साहित्य ठेवण्यासाठी गोदाम बांधकामास कोणी परवानगी दिली, त्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याने कोणकोणती कागदपत्रे तपासली, असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित करण्यात येत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRelianceरिलायन्स