शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

विद्यार्थ्यांनी पेन सोडून शस्त्रे घ्यावीत का?

By admin | Updated: February 16, 2017 02:21 IST

ऐन परीक्षेच्या काळात प्रशासनाकडून अनधिकृत झोपड्यांवर कारवाई होत असल्याचा फटका त्याठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या

नवी मुंबई : ऐन परीक्षेच्या काळात प्रशासनाकडून अनधिकृत झोपड्यांवर कारवाई होत असल्याचा फटका त्याठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पेन सोडून शस्त्रेहाती घ्यावीत का? असा संतप्त सवाल महापौर सुधाकर सोनावणे यांनी महासभेत प्रशासनाला केला, तर यापुढे कारवाई झाल्यास परिणामाची पर्वा न करता आडवा येईन, असा इशाराही त्यांनी दिला.पालिका व एमआयडीसीच्या संयुक्त विद्यमाने यादवनगर, देवीधाम नगर परिसरात अनधिकृत झोपड्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. या अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत त्याठिकाणच्या सन २००० नंतरच्या एक हजारहून अधिक अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. परंतु या कारवायांमध्ये शेकडो कुटुंबे रस्त्यावर आली असून ऐन परीक्षा काळात अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. याला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत झोपडपट्टीधारकांवर होत असलेल्या कारवाईचा नगरसेविका संध्या यादव यांनी निषेध नोंदवला. यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सभागृहात उभे राहून यादव यांना समर्थन दर्शवले. महापौर सुधाकर सोनावणे यांनी देखील झोपड्यांवर होणाऱ्या कारवायांबाबत संताप व्यक्त केला. लोकांना झोपड्यांमध्ये राहावे लागते हे शासनाचे अपयश आहे. गरिबांना परवडणारी घरे उपलब्ध नाहीत म्हणून अनेकांना झोपड्यांचा आसरा घ्यावा लागत आहे, तर गावठाणांमध्ये गरजेपोटी घरे बांधली जात आहेत. अशा बांधकामांना नियमित करण्यासंबंधीचे धोरण राबवण्याऐवजी सरसकट कारवाया होत असल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे यापुढे झोपड्यांवर कारवाई झाल्यास मी आडवा येईन, असा इशारा त्यांनी महासभेत प्रशासनाला दिला. तसेच झोपड्यांवर कारवाई न करण्याचा अशासकीय ठराव देखील महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक नामदेव भगत यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा होईपर्यंत झोपड्यांवरील कारवाई प्रशासनाने थांबवायला हवी होती अशी भावना व्यक्त केली. शिवाय बांधकामांवर कारवाई केल्यानंतर त्याठिकाणी डेब्रिज मात्र प्रशासनाकडून उचलले जात नसल्याचा त्रास सर्वसामान्यांना होत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी महापालिका एमआयडीसीच्या कार्यक्षेत्रात कारवाईवर का खर्च करतेय असा प्रश्न उपस्थित केला. तर महापौर व आयुक्त यांनी मान-सन्मान नाट्य थांबवून जनतेच्या कामांचाही विचार केला जावा असा टोला देखील मारला. नगरसेविका शुभांगी पाटील यांनी एपीएमसी आवारातील अवैध झोपड्यांमध्ये तसेच मॅफ्को मार्केटच्या पडीक इमारतीमध्ये अवैध धंदे होत असतानाही त्याठिकाणी मात्र कारवाई होत नसल्याचा संताप व्यक्त केला. यावेळी नगरसेवक अनंत सुतार यांनी आयुक्तांप्रती आदर राहिला नसून त्यांनीच नागरिक व लोकप्रतिनिधींचा तिरस्कार ओढावून घेतला असल्याचे सांगितले. तर केवळ यादवनगर तोडले म्हणजे शहर स्मार्ट सिटी झाले असे नसल्याचेही त्यांनी फटकारले. (प्रतिनिधी)