शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
4
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
5
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
9
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
10
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
11
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
12
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
13
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
14
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
15
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
16
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
17
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
18
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
19
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा

विद्यार्थ्यांनी पेन सोडून शस्त्रे घ्यावीत का?

By admin | Updated: February 16, 2017 02:21 IST

ऐन परीक्षेच्या काळात प्रशासनाकडून अनधिकृत झोपड्यांवर कारवाई होत असल्याचा फटका त्याठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या

नवी मुंबई : ऐन परीक्षेच्या काळात प्रशासनाकडून अनधिकृत झोपड्यांवर कारवाई होत असल्याचा फटका त्याठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पेन सोडून शस्त्रेहाती घ्यावीत का? असा संतप्त सवाल महापौर सुधाकर सोनावणे यांनी महासभेत प्रशासनाला केला, तर यापुढे कारवाई झाल्यास परिणामाची पर्वा न करता आडवा येईन, असा इशाराही त्यांनी दिला.पालिका व एमआयडीसीच्या संयुक्त विद्यमाने यादवनगर, देवीधाम नगर परिसरात अनधिकृत झोपड्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. या अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत त्याठिकाणच्या सन २००० नंतरच्या एक हजारहून अधिक अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. परंतु या कारवायांमध्ये शेकडो कुटुंबे रस्त्यावर आली असून ऐन परीक्षा काळात अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. याला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत झोपडपट्टीधारकांवर होत असलेल्या कारवाईचा नगरसेविका संध्या यादव यांनी निषेध नोंदवला. यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सभागृहात उभे राहून यादव यांना समर्थन दर्शवले. महापौर सुधाकर सोनावणे यांनी देखील झोपड्यांवर होणाऱ्या कारवायांबाबत संताप व्यक्त केला. लोकांना झोपड्यांमध्ये राहावे लागते हे शासनाचे अपयश आहे. गरिबांना परवडणारी घरे उपलब्ध नाहीत म्हणून अनेकांना झोपड्यांचा आसरा घ्यावा लागत आहे, तर गावठाणांमध्ये गरजेपोटी घरे बांधली जात आहेत. अशा बांधकामांना नियमित करण्यासंबंधीचे धोरण राबवण्याऐवजी सरसकट कारवाया होत असल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे यापुढे झोपड्यांवर कारवाई झाल्यास मी आडवा येईन, असा इशारा त्यांनी महासभेत प्रशासनाला दिला. तसेच झोपड्यांवर कारवाई न करण्याचा अशासकीय ठराव देखील महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक नामदेव भगत यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा होईपर्यंत झोपड्यांवरील कारवाई प्रशासनाने थांबवायला हवी होती अशी भावना व्यक्त केली. शिवाय बांधकामांवर कारवाई केल्यानंतर त्याठिकाणी डेब्रिज मात्र प्रशासनाकडून उचलले जात नसल्याचा त्रास सर्वसामान्यांना होत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी महापालिका एमआयडीसीच्या कार्यक्षेत्रात कारवाईवर का खर्च करतेय असा प्रश्न उपस्थित केला. तर महापौर व आयुक्त यांनी मान-सन्मान नाट्य थांबवून जनतेच्या कामांचाही विचार केला जावा असा टोला देखील मारला. नगरसेविका शुभांगी पाटील यांनी एपीएमसी आवारातील अवैध झोपड्यांमध्ये तसेच मॅफ्को मार्केटच्या पडीक इमारतीमध्ये अवैध धंदे होत असतानाही त्याठिकाणी मात्र कारवाई होत नसल्याचा संताप व्यक्त केला. यावेळी नगरसेवक अनंत सुतार यांनी आयुक्तांप्रती आदर राहिला नसून त्यांनीच नागरिक व लोकप्रतिनिधींचा तिरस्कार ओढावून घेतला असल्याचे सांगितले. तर केवळ यादवनगर तोडले म्हणजे शहर स्मार्ट सिटी झाले असे नसल्याचेही त्यांनी फटकारले. (प्रतिनिधी)