शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गाळमुक्त धरण योजनेला पनवेलमधून अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 07:16 IST

शासनाच्या गाळमुक्त धरण या योजनेला पनवेल परिसरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहे. या योजनेसाठी केवळ २७ शेतकऱ्यांचे अर्ज आले असल्याने या योजनेबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

- मयूर तांबडेपनवेल - शासनाच्या गाळमुक्त धरण या योजनेला पनवेल परिसरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहे. या योजनेसाठी केवळ २७ शेतकऱ्यांचे अर्ज आले असल्याने या योजनेबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.धरणांमधून गाळ काढल्याने धरणांची पाणी साठवण क्षमता वाढणार असून त्या भागातील दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास हातभार लागणार आहे. त्याचबरोबर हा धरणातील गाळ शेतकºयांच्या शेतात टाकल्याने त्यांच्या शेतातील जमीन अधिक सुपीक होऊन शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. ही शेतकºयांच्या हिताची बाब असली तरीदेखील पनवेलमधून या योजनेला केवळ २६ अर्जदारांनी प्रतिसाद दिलेला आहे. तालुक्यातील मोहो, सांगुर्ली, चीरवत, तुरमाळे, ओवे, भाताण, कल्हे, हरीग्राम, मोहोपे, टेमघर, वाजे, चेरवली, मालडूंगे, कोप्रोली, दुन्द्रे, गाढे, नेरे येथील २७ शेतकºयांनी धरणातील गाळ काढण्यास सुरुवातही केली आहे.तालुक्यातील पनवेल महापालिकेच्या मालकीचे असलेले देहरंग धरण २00५मध्ये आलेल्या पुरामुळे गाळाने भरले. त्यामुळे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली. या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असून, तो काढण्यासाठी प्रशासनाकडून याअगोदर प्रयत्नही करण्यात आले.गाढेश्वर धरण क्षेत्रात महानगरपालिकेच्या मालकीची २७७ एकर जमीन असून त्यातील १२५ एकर क्षेत्रावर देहरंग धरण वसलेले आहे. निम्म्याहून अधिक जागेत धरणाचे पाणी साचत नाही. वर्षानुवर्षे साचलेला धरणातील गाळ निघत नसल्यामुळे जास्तीचा पाणीसाठा होत नाही. परिणामी, दरवर्षी महापालिकेला एमजेपी, एमआयडीसी आणि सिडकोच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास धरणांची मूळ साठवण क्षमता पूर्ववत होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात वाढदेखील होणार आहे. जलसाठ्यांतदेखील वाढ होणार आहे. या योजनेमध्ये स्थानिक शेतकºयांनी त्यांच्या शेतामध्ये ते स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयारी असणे गरजेचे आहे.मोहो येथील हसुराम धर्मा म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, कोंडले येथील मनोज महादेव आंग्रे, सांगुर्ली ग्रामपंचायत यांनी मोरबे, सांगुर्ली, चीरवत, तुरमाले, मोहो येथील तलावातील गाळ काढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.मालडूंगे येथील लीला उघडा, सखाराम भुर्बडा, कोप्रोली येथील रमेश पाटील, दुन्द्रे येथील संजय पाटील, गाढे येथील महादू वारगडा, वाजे येथील रुपेश भोईर, बबन पाटील, गजानन पाटील, नेरे येथील संदीप ठाकूर, कल्हे येथील बिपीन मुनोथ, हरिग्राम येथील राधीबाई डांगरकर, रतन पाटील, मोहोपे येथील दिलीप पाटील, गोमा भोईर, बाळाराम भोईर, दत्तात्रेय पवार, अंकुश मुंढे, टेमघर येथील वामन म्हात्रे, चेरवली येथील वसंत पाटील यांना महापालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातून गाळ काढण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. भाताण ग्रामपंचायतने भाताण येथील तलावातील गाळ काढण्यासाठी अर्ज केला आहे. ओवे येथील खतीबाजी अब्दुल रशीद खान यांनी ओवे तलावाचा गाळ काढण्यासाठी अर्ज केला आहे. देहरंग धरणातून लाखो ब्रास गाळ निघणे अपेक्षित आहे. तरच धरणात पाण्याचा साठा वाढू शकतो. मात्र आत्तापर्यंत समाधानकारक गाळ काढण्यात आला नसल्याची माहिती तहसील विभागाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे शासनाच्या गाळमुक्त धरण योजनेला पनवेलमधून जास्तीचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या