शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

गाळमुक्त धरण योजनेला पनवेलमधून अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 07:16 IST

शासनाच्या गाळमुक्त धरण या योजनेला पनवेल परिसरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहे. या योजनेसाठी केवळ २७ शेतकऱ्यांचे अर्ज आले असल्याने या योजनेबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

- मयूर तांबडेपनवेल - शासनाच्या गाळमुक्त धरण या योजनेला पनवेल परिसरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहे. या योजनेसाठी केवळ २७ शेतकऱ्यांचे अर्ज आले असल्याने या योजनेबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.धरणांमधून गाळ काढल्याने धरणांची पाणी साठवण क्षमता वाढणार असून त्या भागातील दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास हातभार लागणार आहे. त्याचबरोबर हा धरणातील गाळ शेतकºयांच्या शेतात टाकल्याने त्यांच्या शेतातील जमीन अधिक सुपीक होऊन शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. ही शेतकºयांच्या हिताची बाब असली तरीदेखील पनवेलमधून या योजनेला केवळ २६ अर्जदारांनी प्रतिसाद दिलेला आहे. तालुक्यातील मोहो, सांगुर्ली, चीरवत, तुरमाळे, ओवे, भाताण, कल्हे, हरीग्राम, मोहोपे, टेमघर, वाजे, चेरवली, मालडूंगे, कोप्रोली, दुन्द्रे, गाढे, नेरे येथील २७ शेतकºयांनी धरणातील गाळ काढण्यास सुरुवातही केली आहे.तालुक्यातील पनवेल महापालिकेच्या मालकीचे असलेले देहरंग धरण २00५मध्ये आलेल्या पुरामुळे गाळाने भरले. त्यामुळे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली. या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असून, तो काढण्यासाठी प्रशासनाकडून याअगोदर प्रयत्नही करण्यात आले.गाढेश्वर धरण क्षेत्रात महानगरपालिकेच्या मालकीची २७७ एकर जमीन असून त्यातील १२५ एकर क्षेत्रावर देहरंग धरण वसलेले आहे. निम्म्याहून अधिक जागेत धरणाचे पाणी साचत नाही. वर्षानुवर्षे साचलेला धरणातील गाळ निघत नसल्यामुळे जास्तीचा पाणीसाठा होत नाही. परिणामी, दरवर्षी महापालिकेला एमजेपी, एमआयडीसी आणि सिडकोच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास धरणांची मूळ साठवण क्षमता पूर्ववत होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात वाढदेखील होणार आहे. जलसाठ्यांतदेखील वाढ होणार आहे. या योजनेमध्ये स्थानिक शेतकºयांनी त्यांच्या शेतामध्ये ते स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयारी असणे गरजेचे आहे.मोहो येथील हसुराम धर्मा म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, कोंडले येथील मनोज महादेव आंग्रे, सांगुर्ली ग्रामपंचायत यांनी मोरबे, सांगुर्ली, चीरवत, तुरमाले, मोहो येथील तलावातील गाळ काढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.मालडूंगे येथील लीला उघडा, सखाराम भुर्बडा, कोप्रोली येथील रमेश पाटील, दुन्द्रे येथील संजय पाटील, गाढे येथील महादू वारगडा, वाजे येथील रुपेश भोईर, बबन पाटील, गजानन पाटील, नेरे येथील संदीप ठाकूर, कल्हे येथील बिपीन मुनोथ, हरिग्राम येथील राधीबाई डांगरकर, रतन पाटील, मोहोपे येथील दिलीप पाटील, गोमा भोईर, बाळाराम भोईर, दत्तात्रेय पवार, अंकुश मुंढे, टेमघर येथील वामन म्हात्रे, चेरवली येथील वसंत पाटील यांना महापालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातून गाळ काढण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. भाताण ग्रामपंचायतने भाताण येथील तलावातील गाळ काढण्यासाठी अर्ज केला आहे. ओवे येथील खतीबाजी अब्दुल रशीद खान यांनी ओवे तलावाचा गाळ काढण्यासाठी अर्ज केला आहे. देहरंग धरणातून लाखो ब्रास गाळ निघणे अपेक्षित आहे. तरच धरणात पाण्याचा साठा वाढू शकतो. मात्र आत्तापर्यंत समाधानकारक गाळ काढण्यात आला नसल्याची माहिती तहसील विभागाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे शासनाच्या गाळमुक्त धरण योजनेला पनवेलमधून जास्तीचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या