शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गाळमुक्त धरण योजनेला पनवेलमधून अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 07:16 IST

शासनाच्या गाळमुक्त धरण या योजनेला पनवेल परिसरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहे. या योजनेसाठी केवळ २७ शेतकऱ्यांचे अर्ज आले असल्याने या योजनेबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

- मयूर तांबडेपनवेल - शासनाच्या गाळमुक्त धरण या योजनेला पनवेल परिसरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहे. या योजनेसाठी केवळ २७ शेतकऱ्यांचे अर्ज आले असल्याने या योजनेबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.धरणांमधून गाळ काढल्याने धरणांची पाणी साठवण क्षमता वाढणार असून त्या भागातील दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास हातभार लागणार आहे. त्याचबरोबर हा धरणातील गाळ शेतकºयांच्या शेतात टाकल्याने त्यांच्या शेतातील जमीन अधिक सुपीक होऊन शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. ही शेतकºयांच्या हिताची बाब असली तरीदेखील पनवेलमधून या योजनेला केवळ २६ अर्जदारांनी प्रतिसाद दिलेला आहे. तालुक्यातील मोहो, सांगुर्ली, चीरवत, तुरमाळे, ओवे, भाताण, कल्हे, हरीग्राम, मोहोपे, टेमघर, वाजे, चेरवली, मालडूंगे, कोप्रोली, दुन्द्रे, गाढे, नेरे येथील २७ शेतकºयांनी धरणातील गाळ काढण्यास सुरुवातही केली आहे.तालुक्यातील पनवेल महापालिकेच्या मालकीचे असलेले देहरंग धरण २00५मध्ये आलेल्या पुरामुळे गाळाने भरले. त्यामुळे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली. या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असून, तो काढण्यासाठी प्रशासनाकडून याअगोदर प्रयत्नही करण्यात आले.गाढेश्वर धरण क्षेत्रात महानगरपालिकेच्या मालकीची २७७ एकर जमीन असून त्यातील १२५ एकर क्षेत्रावर देहरंग धरण वसलेले आहे. निम्म्याहून अधिक जागेत धरणाचे पाणी साचत नाही. वर्षानुवर्षे साचलेला धरणातील गाळ निघत नसल्यामुळे जास्तीचा पाणीसाठा होत नाही. परिणामी, दरवर्षी महापालिकेला एमजेपी, एमआयडीसी आणि सिडकोच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास धरणांची मूळ साठवण क्षमता पूर्ववत होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात वाढदेखील होणार आहे. जलसाठ्यांतदेखील वाढ होणार आहे. या योजनेमध्ये स्थानिक शेतकºयांनी त्यांच्या शेतामध्ये ते स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयारी असणे गरजेचे आहे.मोहो येथील हसुराम धर्मा म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, कोंडले येथील मनोज महादेव आंग्रे, सांगुर्ली ग्रामपंचायत यांनी मोरबे, सांगुर्ली, चीरवत, तुरमाले, मोहो येथील तलावातील गाळ काढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.मालडूंगे येथील लीला उघडा, सखाराम भुर्बडा, कोप्रोली येथील रमेश पाटील, दुन्द्रे येथील संजय पाटील, गाढे येथील महादू वारगडा, वाजे येथील रुपेश भोईर, बबन पाटील, गजानन पाटील, नेरे येथील संदीप ठाकूर, कल्हे येथील बिपीन मुनोथ, हरिग्राम येथील राधीबाई डांगरकर, रतन पाटील, मोहोपे येथील दिलीप पाटील, गोमा भोईर, बाळाराम भोईर, दत्तात्रेय पवार, अंकुश मुंढे, टेमघर येथील वामन म्हात्रे, चेरवली येथील वसंत पाटील यांना महापालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातून गाळ काढण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. भाताण ग्रामपंचायतने भाताण येथील तलावातील गाळ काढण्यासाठी अर्ज केला आहे. ओवे येथील खतीबाजी अब्दुल रशीद खान यांनी ओवे तलावाचा गाळ काढण्यासाठी अर्ज केला आहे. देहरंग धरणातून लाखो ब्रास गाळ निघणे अपेक्षित आहे. तरच धरणात पाण्याचा साठा वाढू शकतो. मात्र आत्तापर्यंत समाधानकारक गाळ काढण्यात आला नसल्याची माहिती तहसील विभागाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे शासनाच्या गाळमुक्त धरण योजनेला पनवेलमधून जास्तीचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या