शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

देहरंग धरण परिसरात तीव्र पाणी टंचाई ;पाण्याअभावी आदिवासी बांधवांची परवड 

By वैभव गायकर | Updated: April 24, 2024 17:39 IST

टँकर शिवाय या रहिवाशांना पर्याय उरलेला नाही.

वैभव गायकर,पनवेल:  शहरातील पाणी टंचाईबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होते.मात्र शहरापेक्षा ग्रामीण भाग,वाड्या वस्त्या याठिकाणी पाण्याची समस्या आणखी भीषण बनली आहे.टँकर शिवाय या रहिवाशांना पर्याय उरलेला नाही.देहरंग धरण जवळ असुन देखील येथील पाच ते सहा आदिवासी वाड्या तहानलेल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीला लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव संबोधले जाते.या निवडणुकीच्या प्रचारात राजकारणी गुंतले असल्याचे चित्र पनवेल मध्ये आहे.देहरंग धरण परिसरात मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीत वाघाची वाडी,कोंबल टेकडी,औसाची वाडी,सतीची वाडी,धामणी,कोंड्याची वाडी आदी आदी आदिवासी वाड्या आहेत.गावात पाणीच येत नसल्याने या रहिवाशांना टँकरने अथवा डोक्यावर हंड्याच्या दुरी घेऊन धरणातून पाणी आणावे लागत आहे.एकीकडे प्रचंड उकाड्यात पाण्याची मागणी वाढत असताना या आदिवासी वाड्यामधील रहिवासी पाण्या अभावी त्रस्त झाले आहेत.शहरी भागात एका फोन वर टॅंकरचा पाणी उपलब्ध होतो.याकरिता रहिवाशांची हजारो रुपये मोजायची तयारी असते मात्र हातावर पोट असलेले आदिवासी बांधव पैसे आणणार कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या आदिवासी वाड्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या देहरंग धरणातुन पनवेल शहराला पाणीपुरवठा केला जातो त्याच धरणाच्या पाण्यासाठी या आदिवासी बांधवाना कसरत करावी लागते अशी अवस्था या आदिवासी वाडीतील बांधवांची आहे.

जलजीवनची कामे अर्धवट -

तालुक्यात जलजीवन मिशनची कामे अर्धवट असल्याने आदिवासी बांधवाना अद्याप पिण्याचे पाणी मिळू शकलेले नाही.टँकरच्या पाण्यावर आदिवासी बांधवांची तहान भागवावी लागत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईwater shortageपाणीकपात