शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

देहरंग धरण परिसरात तीव्र पाणी टंचाई ;पाण्याअभावी आदिवासी बांधवांची परवड 

By वैभव गायकर | Updated: April 24, 2024 17:39 IST

टँकर शिवाय या रहिवाशांना पर्याय उरलेला नाही.

वैभव गायकर,पनवेल:  शहरातील पाणी टंचाईबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होते.मात्र शहरापेक्षा ग्रामीण भाग,वाड्या वस्त्या याठिकाणी पाण्याची समस्या आणखी भीषण बनली आहे.टँकर शिवाय या रहिवाशांना पर्याय उरलेला नाही.देहरंग धरण जवळ असुन देखील येथील पाच ते सहा आदिवासी वाड्या तहानलेल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीला लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव संबोधले जाते.या निवडणुकीच्या प्रचारात राजकारणी गुंतले असल्याचे चित्र पनवेल मध्ये आहे.देहरंग धरण परिसरात मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीत वाघाची वाडी,कोंबल टेकडी,औसाची वाडी,सतीची वाडी,धामणी,कोंड्याची वाडी आदी आदी आदिवासी वाड्या आहेत.गावात पाणीच येत नसल्याने या रहिवाशांना टँकरने अथवा डोक्यावर हंड्याच्या दुरी घेऊन धरणातून पाणी आणावे लागत आहे.एकीकडे प्रचंड उकाड्यात पाण्याची मागणी वाढत असताना या आदिवासी वाड्यामधील रहिवासी पाण्या अभावी त्रस्त झाले आहेत.शहरी भागात एका फोन वर टॅंकरचा पाणी उपलब्ध होतो.याकरिता रहिवाशांची हजारो रुपये मोजायची तयारी असते मात्र हातावर पोट असलेले आदिवासी बांधव पैसे आणणार कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या आदिवासी वाड्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या देहरंग धरणातुन पनवेल शहराला पाणीपुरवठा केला जातो त्याच धरणाच्या पाण्यासाठी या आदिवासी बांधवाना कसरत करावी लागते अशी अवस्था या आदिवासी वाडीतील बांधवांची आहे.

जलजीवनची कामे अर्धवट -

तालुक्यात जलजीवन मिशनची कामे अर्धवट असल्याने आदिवासी बांधवाना अद्याप पिण्याचे पाणी मिळू शकलेले नाही.टँकरच्या पाण्यावर आदिवासी बांधवांची तहान भागवावी लागत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईwater shortageपाणीकपात