शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बंद कारखान्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; इमारती बनल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:44 IST

अवैध व्यवसायाला चालना, एमआयडीसीसह महापालिकेचेही दुर्लक्ष

नामदेव मोरे नवी मुंबई : ठाणे - बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील बंद कारखान्यांमुळे अवैध व्यवसायाला चालना मिळू लागली आहे. खंडरात रूपांतर झालेल्या इमारतींमध्ये मद्यपी व अमली पदार्थ ओढणाऱ्यांचे अड्डे तयार झाले आहेत. मद्य तस्करी करणारे, भंगार विक्रेते व गुन्हेगारांनी या इमारतींमध्ये आश्रय घेतल्याचे उघड झाले असून, बंद कारखान्यांमुळे या परिसरातील सुरक्षेला धोका निर्माण होऊ लागला आहे.

औद्योगिक वसाहतीमध्ये बोनसरीमधील बंद कंपनीमध्ये १३ जुलैला तिहेरी हत्याकांड झाले. याठिकाणी अनधिकृतपणे सुरू असलेल्या भंगार गोडावूनमध्ये ही घटना घडली. याच परिसरातील १० जुलैला भूखंड क्रमांक डी ८५ व ८६ वरील बंद कंपनीमध्ये १ कोटी १४ लाख रुपयांचा मद्यसाठा आढळला. सुरक्षारक्षकाच्या मदतीने कंपनीत साठा करण्यात आला होता. तुर्भे एमआयडीसीमध्ये २४ मार्चला साईनाथ ग्रेनाईड या कंपनीमध्ये गुन्हे शाखेने छापा टाकून तब्बल ७३ लाख रुपयांचा मद्यसाठा हस्तगत केला. पाच महिन्यामध्ये तीन गंभीर गुन्हे घडल्यामुळे बंद कारखान्यांमधील अवैध व्यवसायाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिघा ते बेलापूर दरम्यानच्या बंद कारखान्यांची व त्यामध्ये सुरू असलेल्या अवैध व्यवसायाची माहितीही पोलीस, एमआयडीसी व महापालिका प्रशासनालाही नाही. तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या जवळच कांचन इलेक्ट्रिकल कंपनी आहे. १९८३ मध्ये सुरू झालेली कंपनी काही वर्षांपूर्वी बंद झाली आहे. या कंपनीच्या सुरक्षेसाठी काहीही यंत्रणा उपलब्ध नाही. याठिकाणी अमली पदार्थ ओढणारे तरुण दिवसरात्र बसलेले असतात. सोमवारी याठिकाणी जावून पाहणी केली असता एक तरुण अमली पदार्थ ओढत असताना आढळून आला. कंपनीच्या बाहेर पदपथावर भंगार साहित्य ठेवण्यात आले असून भंगार विक्रीचा व्यवसाय सुरू आहे.

इंदिरानगर गणपतीपाडाकडे जाणाºया रोडवर दूध डेरीच्या समोर डी ५२ भूखंडावरील कंपनीही बंद झाली आहे. इमारतीचे बांधकाम अतिधोकादायक स्थितीमध्ये असून तेथे मसाल्याच्या पदार्थांचे पॅकिंग करण्याचा व्यवसाय सुरू आहे. इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. बीमलाही तडे गेले आहेत. बोनसरीमधील तिहेरी हत्याकांड झालेल्या कारखान्यामधील भंगार गोडावून बंद करण्यात आले असले तरी अद्याप तेथील सर्व भंगार साहित्य उचलण्यात आलेले नाही. याच परिसरामध्ये डी ५/२ भूखंडावर अग्रवाल ग्रुपने गॅरेज सुरू केले आहे. परंतु कारखान्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साठले असून स्वच्छता ठेवली जात नसल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. अनेक कंपन्यांमध्ये फक्त नावापुरतेच सुरक्षारक्षक ठेवले आहेत. अनेक सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचे आढळून आले. काही सुरक्षारक्षकांना कंपनीचे नाव, भूखंड क्रमांक व मालकाचे नावही माहिती नाही. बंद कारखान्यांविषयी ठोस भूमिका घेतली नाही तर भविष्यात पुन्हा गंभीर घटना घडल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमली पदार्थ ओढणाऱ्यांची दहशतइंदिरानगरमधील एव्हरेस्ट इलेक्ट्रिकल कंपनी बंद असून तेथे सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे. पण बंद इमारतीमध्ये व समोरील भूखंडावर अमली पदार्थ ओढणारे तरुण बसलेले असतात. त्यांची दहशत असून सुरक्षारक्षकालाही जुमानत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

अनधिकृतपणे गोडाऊन सुरूअनेक बंद कारखान्यांमध्ये अवैधपणे गोडाऊन सुरू आहे. काही ठिकाणी मसाल्याचे पदार्थ ठेवले आहेत. काही कारखान्यांमध्ये भंगाराची दुकाने सुरू केली आहेत. एमआयडीसी प्रशासनाची परवानगी न घेता हे सर्व व्यवसाय सुरू असून त्याकडे कोणीही लक्ष देत नाही.धोकादायक इमारतींची यादी नाही

महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. परंतु एमआयडीसी परिसरातील बंद कारखान्यांच्या वास्तूही धोकादायक असून त्यांची यादी प्रसिद्ध केलेली नाही. यामुळे अनेकांनी धोकादायक बंद कंपन्यांचा गोडावूनमधून वापर सुरू केला असून त्या इमारती कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.