शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बंद कारखान्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; इमारती बनल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:44 IST

अवैध व्यवसायाला चालना, एमआयडीसीसह महापालिकेचेही दुर्लक्ष

नामदेव मोरे नवी मुंबई : ठाणे - बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील बंद कारखान्यांमुळे अवैध व्यवसायाला चालना मिळू लागली आहे. खंडरात रूपांतर झालेल्या इमारतींमध्ये मद्यपी व अमली पदार्थ ओढणाऱ्यांचे अड्डे तयार झाले आहेत. मद्य तस्करी करणारे, भंगार विक्रेते व गुन्हेगारांनी या इमारतींमध्ये आश्रय घेतल्याचे उघड झाले असून, बंद कारखान्यांमुळे या परिसरातील सुरक्षेला धोका निर्माण होऊ लागला आहे.

औद्योगिक वसाहतीमध्ये बोनसरीमधील बंद कंपनीमध्ये १३ जुलैला तिहेरी हत्याकांड झाले. याठिकाणी अनधिकृतपणे सुरू असलेल्या भंगार गोडावूनमध्ये ही घटना घडली. याच परिसरातील १० जुलैला भूखंड क्रमांक डी ८५ व ८६ वरील बंद कंपनीमध्ये १ कोटी १४ लाख रुपयांचा मद्यसाठा आढळला. सुरक्षारक्षकाच्या मदतीने कंपनीत साठा करण्यात आला होता. तुर्भे एमआयडीसीमध्ये २४ मार्चला साईनाथ ग्रेनाईड या कंपनीमध्ये गुन्हे शाखेने छापा टाकून तब्बल ७३ लाख रुपयांचा मद्यसाठा हस्तगत केला. पाच महिन्यामध्ये तीन गंभीर गुन्हे घडल्यामुळे बंद कारखान्यांमधील अवैध व्यवसायाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिघा ते बेलापूर दरम्यानच्या बंद कारखान्यांची व त्यामध्ये सुरू असलेल्या अवैध व्यवसायाची माहितीही पोलीस, एमआयडीसी व महापालिका प्रशासनालाही नाही. तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या जवळच कांचन इलेक्ट्रिकल कंपनी आहे. १९८३ मध्ये सुरू झालेली कंपनी काही वर्षांपूर्वी बंद झाली आहे. या कंपनीच्या सुरक्षेसाठी काहीही यंत्रणा उपलब्ध नाही. याठिकाणी अमली पदार्थ ओढणारे तरुण दिवसरात्र बसलेले असतात. सोमवारी याठिकाणी जावून पाहणी केली असता एक तरुण अमली पदार्थ ओढत असताना आढळून आला. कंपनीच्या बाहेर पदपथावर भंगार साहित्य ठेवण्यात आले असून भंगार विक्रीचा व्यवसाय सुरू आहे.

इंदिरानगर गणपतीपाडाकडे जाणाºया रोडवर दूध डेरीच्या समोर डी ५२ भूखंडावरील कंपनीही बंद झाली आहे. इमारतीचे बांधकाम अतिधोकादायक स्थितीमध्ये असून तेथे मसाल्याच्या पदार्थांचे पॅकिंग करण्याचा व्यवसाय सुरू आहे. इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. बीमलाही तडे गेले आहेत. बोनसरीमधील तिहेरी हत्याकांड झालेल्या कारखान्यामधील भंगार गोडावून बंद करण्यात आले असले तरी अद्याप तेथील सर्व भंगार साहित्य उचलण्यात आलेले नाही. याच परिसरामध्ये डी ५/२ भूखंडावर अग्रवाल ग्रुपने गॅरेज सुरू केले आहे. परंतु कारखान्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साठले असून स्वच्छता ठेवली जात नसल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. अनेक कंपन्यांमध्ये फक्त नावापुरतेच सुरक्षारक्षक ठेवले आहेत. अनेक सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचे आढळून आले. काही सुरक्षारक्षकांना कंपनीचे नाव, भूखंड क्रमांक व मालकाचे नावही माहिती नाही. बंद कारखान्यांविषयी ठोस भूमिका घेतली नाही तर भविष्यात पुन्हा गंभीर घटना घडल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमली पदार्थ ओढणाऱ्यांची दहशतइंदिरानगरमधील एव्हरेस्ट इलेक्ट्रिकल कंपनी बंद असून तेथे सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे. पण बंद इमारतीमध्ये व समोरील भूखंडावर अमली पदार्थ ओढणारे तरुण बसलेले असतात. त्यांची दहशत असून सुरक्षारक्षकालाही जुमानत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

अनधिकृतपणे गोडाऊन सुरूअनेक बंद कारखान्यांमध्ये अवैधपणे गोडाऊन सुरू आहे. काही ठिकाणी मसाल्याचे पदार्थ ठेवले आहेत. काही कारखान्यांमध्ये भंगाराची दुकाने सुरू केली आहेत. एमआयडीसी प्रशासनाची परवानगी न घेता हे सर्व व्यवसाय सुरू असून त्याकडे कोणीही लक्ष देत नाही.धोकादायक इमारतींची यादी नाही

महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. परंतु एमआयडीसी परिसरातील बंद कारखान्यांच्या वास्तूही धोकादायक असून त्यांची यादी प्रसिद्ध केलेली नाही. यामुळे अनेकांनी धोकादायक बंद कंपन्यांचा गोडावूनमधून वापर सुरू केला असून त्या इमारती कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.