शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

नवी मुंबईत उभारणार विज्ञान केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 02:14 IST

नेरूळमधील वंडर्स पार्कमध्ये उपलब्ध असलेल्या ३५ हजार चौरस मीटर भूखंडावर भव्य विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : नेरूळमधील वंडर्स पार्कमध्ये उपलब्ध असलेल्या ३५ हजार चौरस मीटर भूखंडावर भव्य विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णयपालिकेने घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जवळपास १०० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभा केला जाणार आहे.देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरामध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. स्वच्छ भारत अभियानामध्येही देशपातळीवर महापालिकेने ठसाउमटविला आहे. पाणीपुरवठ्यासह चांगल्या पायाभूत सुविधा शहरात उपलब्ध असून महापालिकेने शहराच्या नावलौकिकामध्ये भर टाकणारे प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे.ऐरोलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व घणसोलीमधील सेंट्रल पार्क उभारण्यात आले आहे. नेरूळ सेक्टर १९ ए मधील जवळपास १ लाख ४ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ परिसरामध्ये वंडर्स पार्क उभारण्यात आले आहे. उद्यानामधील जवळपास ३५ हजार चौरस मीटरचा भूखंड विज्ञान केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आला असून तेथे राज्यातील सर्वोत्तम केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.केंद्राचा पहिला टप्पा २० हजार चौरस मीटरवर सुरू केला जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी व सर्व वयोगटामधील नागरिकांना व मुलांना विज्ञान क्षेत्राबद्दल कुतूहल निर्माण होऊन माहिती मिळेल अशाप्रकारे नियोजन करण्यात येणार आहे. प्रस्तावित वास्तुसंकुल व पायाभूत सोयी, सुविधा या जागतिक दर्जाच्या राहतील याकडे लक्ष दिले जाणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान मनुष्याच्या भावी आयुष्याला कशाप्रकारे प्रभावित करतील या संकल्पनेवर आधारित हे केंद्र असणार आहे.नवी मुंबई हे देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांची केंद्रे या ठिकाणी आहेत. देशभरातून विद्यार्थी शिक्षणघेण्यासाठी येत आहेत. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यासाठी व त्यांच्यामधून भविष्यात विज्ञानप्रेमी तयार करता यावे याउद्देशाने महापालिकेने विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ८७ कोटी २७ लाख रुपये अंदाजित रक्कम दिली आहे. या प्रकल्पासाठी १०० कोटींपेक्षा जास्तखर्च होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये याचा समावेश होत आहे. राज्यातून व देशातूनही विद्यार्थी व नागरिक या केंद्रास भेट देतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.विज्ञान केंद्रातील महत्त्वाचे पैलू जीवन - मानवी जीवनावर सद्यस्थितीतील वातावरणाचा प्रभाव काय असणार याची माहिती ऊर्जा - भविष्यातील उर्जेचे स्त्रोत कोणते असतील याविषयी माहितीपर्यावरण - पर्यावरण पूरक राहणीमान म्हणजे नक्की काय याविषयी माहिती उपलब्ध करून दिली जाणारअंतराळ - अंतराळविषयी माहिती, पृथ्वी व्यतिरिक्त कुठे निवास होवू शकतो व इतर सर्व माहितीयंत्र व रोबोट - मानवी जीवनावर यंत्र व रोबोट यांचा परिणाम व भविष्यातील स्थिती.लौकिकामध्ये भर पडणारनवी मुंबई सुनियोजीत शहर असले तरी याठिकाणी अवर्जुन भेट द्यावी असे प्रकल्प नसल्यामुळे शहरवासीयांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली होती. येथील नागरिकांना मुंबईतील सायन्स सेंटर, वस्तूसंग्रहालय, प्राणीसंग्रहालय पाहण्यासाठी जावे लागत होते.महापालिकेने चांगली उद्याने उभारली आहेत. शासनाने ऐरोलीमध्ये जैवविविधता केंद्र सुरू केले आहे. बेलापूर किल्याचेही सिडकोकडूनसुशोभीकरण केले जाणार आहे. या प्रकल्पामध्ये आता विज्ञात केंद्राची भर पडणार असून त्यामुळे शहराचा नावलौकीक वाढणार आहे. वंडर्सपार्कमध्ये उपलब्ध असलेल्या भूखंडावर जागतीक दर्जाचे विज्ञात केंद्र उभारण्यात येणार आहे. वैज्ञानीक दृष्टीकोण वाढीस लावण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यासाठी निवीदा प्रक्रिया सुरू केली आहे.- सुरेंद्र पाटील, शहर अभियंता

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईscienceविज्ञान