शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

नवी मुंबईत उभारणार विज्ञान केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 02:14 IST

नेरूळमधील वंडर्स पार्कमध्ये उपलब्ध असलेल्या ३५ हजार चौरस मीटर भूखंडावर भव्य विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : नेरूळमधील वंडर्स पार्कमध्ये उपलब्ध असलेल्या ३५ हजार चौरस मीटर भूखंडावर भव्य विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णयपालिकेने घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जवळपास १०० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभा केला जाणार आहे.देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरामध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. स्वच्छ भारत अभियानामध्येही देशपातळीवर महापालिकेने ठसाउमटविला आहे. पाणीपुरवठ्यासह चांगल्या पायाभूत सुविधा शहरात उपलब्ध असून महापालिकेने शहराच्या नावलौकिकामध्ये भर टाकणारे प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे.ऐरोलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व घणसोलीमधील सेंट्रल पार्क उभारण्यात आले आहे. नेरूळ सेक्टर १९ ए मधील जवळपास १ लाख ४ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ परिसरामध्ये वंडर्स पार्क उभारण्यात आले आहे. उद्यानामधील जवळपास ३५ हजार चौरस मीटरचा भूखंड विज्ञान केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आला असून तेथे राज्यातील सर्वोत्तम केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.केंद्राचा पहिला टप्पा २० हजार चौरस मीटरवर सुरू केला जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी व सर्व वयोगटामधील नागरिकांना व मुलांना विज्ञान क्षेत्राबद्दल कुतूहल निर्माण होऊन माहिती मिळेल अशाप्रकारे नियोजन करण्यात येणार आहे. प्रस्तावित वास्तुसंकुल व पायाभूत सोयी, सुविधा या जागतिक दर्जाच्या राहतील याकडे लक्ष दिले जाणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान मनुष्याच्या भावी आयुष्याला कशाप्रकारे प्रभावित करतील या संकल्पनेवर आधारित हे केंद्र असणार आहे.नवी मुंबई हे देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांची केंद्रे या ठिकाणी आहेत. देशभरातून विद्यार्थी शिक्षणघेण्यासाठी येत आहेत. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यासाठी व त्यांच्यामधून भविष्यात विज्ञानप्रेमी तयार करता यावे याउद्देशाने महापालिकेने विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ८७ कोटी २७ लाख रुपये अंदाजित रक्कम दिली आहे. या प्रकल्पासाठी १०० कोटींपेक्षा जास्तखर्च होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये याचा समावेश होत आहे. राज्यातून व देशातूनही विद्यार्थी व नागरिक या केंद्रास भेट देतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.विज्ञान केंद्रातील महत्त्वाचे पैलू जीवन - मानवी जीवनावर सद्यस्थितीतील वातावरणाचा प्रभाव काय असणार याची माहिती ऊर्जा - भविष्यातील उर्जेचे स्त्रोत कोणते असतील याविषयी माहितीपर्यावरण - पर्यावरण पूरक राहणीमान म्हणजे नक्की काय याविषयी माहिती उपलब्ध करून दिली जाणारअंतराळ - अंतराळविषयी माहिती, पृथ्वी व्यतिरिक्त कुठे निवास होवू शकतो व इतर सर्व माहितीयंत्र व रोबोट - मानवी जीवनावर यंत्र व रोबोट यांचा परिणाम व भविष्यातील स्थिती.लौकिकामध्ये भर पडणारनवी मुंबई सुनियोजीत शहर असले तरी याठिकाणी अवर्जुन भेट द्यावी असे प्रकल्प नसल्यामुळे शहरवासीयांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली होती. येथील नागरिकांना मुंबईतील सायन्स सेंटर, वस्तूसंग्रहालय, प्राणीसंग्रहालय पाहण्यासाठी जावे लागत होते.महापालिकेने चांगली उद्याने उभारली आहेत. शासनाने ऐरोलीमध्ये जैवविविधता केंद्र सुरू केले आहे. बेलापूर किल्याचेही सिडकोकडूनसुशोभीकरण केले जाणार आहे. या प्रकल्पामध्ये आता विज्ञात केंद्राची भर पडणार असून त्यामुळे शहराचा नावलौकीक वाढणार आहे. वंडर्सपार्कमध्ये उपलब्ध असलेल्या भूखंडावर जागतीक दर्जाचे विज्ञात केंद्र उभारण्यात येणार आहे. वैज्ञानीक दृष्टीकोण वाढीस लावण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यासाठी निवीदा प्रक्रिया सुरू केली आहे.- सुरेंद्र पाटील, शहर अभियंता

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईscienceविज्ञान