शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

सानपाडा पूल बनला मृत्यूचा सापळा; टोलवेज कंपनीसह पी.डब्ल्यू.डी.चा हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 03:10 IST

सायन-पनवेल मार्गावरील वाशी-सानपाडा दरम्यानचा जुई पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. पुलाच्या दोन सांध्यांमध्ये मोठी फट असल्याने त्याठिकाणी सातत्याने अपघात होत असून, आजवर पाच जणांचा बळी गेला आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावरील वाशी-सानपाडा दरम्यानचा जुई पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. पुलाच्या दोन सांध्यांमध्ये मोठी फट असल्याने त्याठिकाणी सातत्याने अपघात होत असून, आजवर पाच जणांचा बळी गेला आहे. यानंतरही पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संतप्त प्रवाशांकडून होत आहे.सायन-पनवेल मार्गाच्या रुंदीकरणावेळी वाशी- सानपाडा दरम्यानच्या जुई पुलाचीही रुंदी वाढवण्यात आलेली आहे. या वेळी पुलाचा जुना व नवा भाग जोडण्यासाठी सांध्याच्या ठिकाणी रेल्वे रुळासारखा लोखंडी रॉड वापरण्यात आलेला आहे. सुमारे ७० ते ८० मीटर लांबीचा हा रॉड आहे, परंतु दोन रॉडमध्ये मोठी फट शिल्लक राहिल्याने त्याठिकाणी अपघात घडत आहेत. दोन रॉडमध्ये सुमारे ७ सेंमीची फट असून, उंचीतही सुमारे ५ ते ६ सेंमीचा फरक आहे. यामुळे पुलाच्या या भागावर दुचाकीचे चाक गेल्यास सांध्यातील उंचीच्या फरकामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. या प्रकारामुळे त्याठिकाणी दररोज किमान तीन ते चार अपघात होत आहेत. या अपघातांमध्ये मागील तीन वर्षांत पाच जणांचा बळी देखील गेलेला आहे. प्रतिवर्षी किमान दोघांचा त्याठिकाणी अपघाती मृत्यू होत आहे. आजवर शंभरहून अधिक किरकोळ अपघातांमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. त्यापैकी मोजक्याच गंभीर अपघातांची नोंद वाशी पोलीस ठाण्यात झालेली आहे. उर्वरित अपघातांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींनी पोलिसांकडे तक्रारीऐवजी परस्पर उपचार करून घेतलेले आहेत. त्यांना वेळीच प्रत्यक्षदर्शींकडून मदत मिळाल्याने त्यांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत.पुलाच्या दोन सांध्यातील फट रात्रीच्या वेळी सहज दिसत नसल्याने त्यावरून दुचाकीचे चाक घसरून बहुतांश अपघात घडत आहेत. अशावेळी पाठीमागून येणाºया भरधाव ट्रक अथवा कारची धडक बसल्यास त्यांना मृत्यूच्या दाढेत जावे लागत आहे. तिथली अपघातांची मालिका थांबवण्याकरिता पुलाच्या सांध्यामधील अंतर कमी करणे आवश्यक आहे. याकरिता वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे व वाशी वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार केलेला आहे. त्यानुसार अवघ्या चार दिवसांत दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांनी गतवर्षी पोलिसांना दिले होते. त्यानंतरही अद्याप कामाला सुरुवात न झाल्याने तिथली अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी रात्री त्याठिकाणी काही मिनिटाच्या अंतराने चार दुचाकीस्वारांचा अपघात झाला असता थोडक्यात त्यांचे प्राण वाचले. पुलाच्या दोन सांध्यामधील अंतर कमी करून अपघात टाळण्यासाठी साधारण लाखभर रुपये खर्चाची शक्यता आहे. परंतु या खर्चावरून पीडब्ल्यूडी व टोलवेज कंपनी हात झटकत असल्याने त्यांच्यातील वाद सर्वसामान्यांच्या जिवावर बेतत आहे.गुन्हा दाखल करण्याची मागणीसायन-पनवेल मार्गावरील उरण फाटा येथील पुलावर प्रमाणापेक्षा अधिक डांबर टाकल्याने रस्ता गुळगुळीत झाला होता. यामुळे त्याठिकाणी अपघात होऊन एका टेंपो चालकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात सायन-पनवेल टोलवेज कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला. त्यानुसार जुई पुलावर आजवर घडलेल्या अपघातामध्ये पाच जणांचा बळी घेतल्याप्रकरणी देखील ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.जुई पूल मृत्यूचा सापळा बनला असून, त्याठिकाणी दररोज चार ते पाच दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. अनेक जण थोडक्यात मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले असून, काहींचा बळी देखील गेलेला आहे. परंतु तक्रार करून देखील पीडब्ल्यूडी विभाग पुलावरील सांध्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. यावरून अपघातांमधील जखमींवर उपचाराच्या माध्यमातून खासगी रुग्णालयांची दुकानदारी सुरू ठेवण्यात आलेली आहे.- नागेश पवार,चेंबूर- प्रवासी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई