शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

एपीएमसीत भाजीपाला फळांची विक्रमी आवक, ग्राहकांची पाठ, २५० ट्रक भाजीपाला शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 03:21 IST

कोरोनाचा परिणाम मुंबई बाजार समितीच्या व्यवहारावरही होऊ लागला आहे. गुरुवारी स्वच्छतेसाठी भाजी व फळ मार्केट बंद करण्यात आले होते.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी विक्रमी ८४३ ट्रक व टेम्पोंमधून आवक झाली आहे. परंतु ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे संपूर्ण मालाची विक्री होऊ शकली नाही. जवळपास २५० ट्रक माल विक्रीविना पडून होता. मुंबई, नवी मुंबईमधील फेरीवाल्यांचा व्यवसाय बंद असल्याचा परिणामही विक्रीवर झाला आहे.कोरोनाचा परिणाम मुंबई बाजार समितीच्या व्यवहारावरही होऊ लागला आहे. गुरुवारी स्वच्छतेसाठी भाजी व फळ मार्केट बंद करण्यात आले होते. यामुळे शुक्रवारसाठी व्यापाऱ्यांनीही जादा माल मागविला होता. राज्यातील अनेक मार्केटमध्ये व्यवहार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनीही मुंबईमध्ये माल विक्रीसाठी पाठविला होता. पहाटेपर्यंत तब्बल ८४३ ट्रक व टेम्पोंमधून भाजीपाला विक्रीसाठी आला. परंतु ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे विक्रीवर परिणाम झाला. मुंबई व नवी मुंबईमधील फेरीवाल्यांवर महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामुळेही किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाला खरेदीच केला नाही. जवळपास २५० ट्रक मालाची विक्रीच झाली नाही. विक्री न झालेल्या मालाची शनिवारी विक्री केली जाणार आहे. शिल्लक माल ग्राहकांनी घेतला नाही तर शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्राहक कमी असल्यामुळे काही वस्तूंचे दर कमी झाले आहेत.कांदा, फळे, धान्य व मसाला मार्केटमध्येही दिवसभर चांगली आवक झाली होती. परंतु येथेही ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत होते. पाच मार्केटमध्ये सायंकाळी चार वाजेपर्यंत २२११ ट्रक व टेम्पोंची आवक झाली व ७६२ वाहनांमधून माल मुंबई व नवी मुंबईमधील किरकोळ मंडईमध्ये पाठविण्यात आला.देशभरातून आला मालमुंबई बाजार समितीमध्ये पुणे, नाशिक, सातारासह दक्षिणेकडील राज्ये, गुजरात परिसरातून भाजीपाल्याची आवक होत आहे. देशभरातून फळे विक्रीसाठी येत आहेत. अचानक मालाची जास्त आवक वाढल्यामुळे मार्केटमध्ये सकाळी वाहतूककोंडीही झाली होती.गुरुवारी भाजीपाला मार्केट बंद असल्यामुळे शुक्रवारी आवक वाढली आहे. मोठ्या प्रमाणात आवक वाढली व ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे जवळपास २५० ट्रक भाजीपाल्याची विक्री झालेली नाही. पुढील आठवड्यात तीन दिवस मार्केट बंद राहणार असल्यामुळे शनिवारी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला लाभेल.- शंकर पिंगळे,संचालक, भाजीपाला मार्केटतीन दिवस मार्केट बंदमुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पुढील आठवड्यामध्ये तीन दिवस बंद राहणार आहे. २२ मार्चला रविवार असल्यामुळे मार्केट बंद राहणार आहे. २३ तारखेला माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीमुळे सुट्टी असून २५ मार्चला गुढीपाडव्यामुळे मार्केट बंद राहणार आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई