शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

एपीएमसीत भाजीपाला फळांची विक्रमी आवक, ग्राहकांची पाठ, २५० ट्रक भाजीपाला शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 03:21 IST

कोरोनाचा परिणाम मुंबई बाजार समितीच्या व्यवहारावरही होऊ लागला आहे. गुरुवारी स्वच्छतेसाठी भाजी व फळ मार्केट बंद करण्यात आले होते.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी विक्रमी ८४३ ट्रक व टेम्पोंमधून आवक झाली आहे. परंतु ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे संपूर्ण मालाची विक्री होऊ शकली नाही. जवळपास २५० ट्रक माल विक्रीविना पडून होता. मुंबई, नवी मुंबईमधील फेरीवाल्यांचा व्यवसाय बंद असल्याचा परिणामही विक्रीवर झाला आहे.कोरोनाचा परिणाम मुंबई बाजार समितीच्या व्यवहारावरही होऊ लागला आहे. गुरुवारी स्वच्छतेसाठी भाजी व फळ मार्केट बंद करण्यात आले होते. यामुळे शुक्रवारसाठी व्यापाऱ्यांनीही जादा माल मागविला होता. राज्यातील अनेक मार्केटमध्ये व्यवहार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनीही मुंबईमध्ये माल विक्रीसाठी पाठविला होता. पहाटेपर्यंत तब्बल ८४३ ट्रक व टेम्पोंमधून भाजीपाला विक्रीसाठी आला. परंतु ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे विक्रीवर परिणाम झाला. मुंबई व नवी मुंबईमधील फेरीवाल्यांवर महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामुळेही किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाला खरेदीच केला नाही. जवळपास २५० ट्रक मालाची विक्रीच झाली नाही. विक्री न झालेल्या मालाची शनिवारी विक्री केली जाणार आहे. शिल्लक माल ग्राहकांनी घेतला नाही तर शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्राहक कमी असल्यामुळे काही वस्तूंचे दर कमी झाले आहेत.कांदा, फळे, धान्य व मसाला मार्केटमध्येही दिवसभर चांगली आवक झाली होती. परंतु येथेही ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत होते. पाच मार्केटमध्ये सायंकाळी चार वाजेपर्यंत २२११ ट्रक व टेम्पोंची आवक झाली व ७६२ वाहनांमधून माल मुंबई व नवी मुंबईमधील किरकोळ मंडईमध्ये पाठविण्यात आला.देशभरातून आला मालमुंबई बाजार समितीमध्ये पुणे, नाशिक, सातारासह दक्षिणेकडील राज्ये, गुजरात परिसरातून भाजीपाल्याची आवक होत आहे. देशभरातून फळे विक्रीसाठी येत आहेत. अचानक मालाची जास्त आवक वाढल्यामुळे मार्केटमध्ये सकाळी वाहतूककोंडीही झाली होती.गुरुवारी भाजीपाला मार्केट बंद असल्यामुळे शुक्रवारी आवक वाढली आहे. मोठ्या प्रमाणात आवक वाढली व ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे जवळपास २५० ट्रक भाजीपाल्याची विक्री झालेली नाही. पुढील आठवड्यात तीन दिवस मार्केट बंद राहणार असल्यामुळे शनिवारी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला लाभेल.- शंकर पिंगळे,संचालक, भाजीपाला मार्केटतीन दिवस मार्केट बंदमुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पुढील आठवड्यामध्ये तीन दिवस बंद राहणार आहे. २२ मार्चला रविवार असल्यामुळे मार्केट बंद राहणार आहे. २३ तारखेला माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीमुळे सुट्टी असून २५ मार्चला गुढीपाडव्यामुळे मार्केट बंद राहणार आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई