शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

कायदा धाब्यावर बसवून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 01:55 IST

कारवाईसाठी अपुरी यंत्रणा : गुजरातवरून होतो गुटख्याचा पुरवठा

नामदेव मोरे नवी मुंबई : पनवेलसह नवी मुंबई परिसरामध्ये गुजरातवरून रोज दोन टन गुटखा विक्रीसाठी येऊ लागला आहे. बंदी असूनही शहरातील ९० टक्के पानटपरीवर गुटख्याची बिनधास्तपणे विक्री होत आहे. कारवाईसाठी अपुरी यंत्रणा असल्याचा गैरफायदा माफिया घेऊ लागले आहेत. प्रत्येक हॉटेलबाहेर अनधिकृतपणे पानटपरी सुरू करण्यात आली असून, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान सुरू असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.

शासनाने गुटखाबंदी व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु हे दोन्हीही निर्णय नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामध्ये धाब्यावर बसविले जात आहेत. एपीएमसी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी गुटखा विक्रेत्याकडून लाच घेताना अटक झाल्यामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये रोज २०० किलो गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती येथील जाणकार देऊ लागले आहेत. दोन्ही महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये रोज किमान दोन टन गुटखा विक्री होत आहे. शासनाने बंदी केल्यामुळे पाच रुपये किमतीचा गुटखा १५ रुपयाला एक पुडी या दराने विकला जात आहे. आरएमडी गुटख्याची एक पुडी ५० रुपयांना विकली जात आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्यामुळे अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी गुटख्याची तस्करी सुरू केली आहे. राज्यात बंदी असल्यामुळे गुजरातमधून गुटखा राज्यात आणला जात आहे. या ठिकाणी प्रत्येक विभागामधील पानटपऱ्यांना गुटखा पुरविणारे होलसेल विक्रेते तयार झाले आहेत. यामधील अनेक विक्रेत्यांनी स्वत:च पानटपºयाही सुरू करण्यास सुरुवात केली आहे. बाजार समितीमध्ये एका माफियाने २० पानटपऱ्या भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत.

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे; परंतु शहरातील बहुतांश सर्व हॉटेलच्या प्रवेशद्वारावर अनधिकृतपणे पानटपºया सुरू केल्या आहेत. नागरिकांची नेहमी वर्दळ असलेल्या ठिकाणी पानटपऱ्या सुरू केल्या असून, रोडवरच सिगारेटचा धूर काढत अनेक जण उभे असतात. सिगारेटच्या धुराचा त्रास पादचाऱ्यांना होऊ लागला आहे; परंतु कारवाई करायची कोणी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचा फक्त एक निरीक्षक नवी मुंबईवर लक्ष ठेवण्याचे काम करत आहे. सदर अधिकारीही ठाणे कार्यालयामध्ये बसत आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळेच गुटखा विक्रीचे रॅकेट वाढत आहे. पोलीस प्रशासनाकडूनही ठोस कारवाई होत नाही, यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.शाळेसमोर पानटपरीनेरुळ गावामधील महानगरपालिकेच्या शाळेच्या समोर पानटपरी सुरू करण्यात आली आहे. शाळेपासून १०० मीटर अंतरावर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास मनाई आहे. परंतु याठिकाणी काही फुटाच्या अंतरावरच बिनधास्तपणे विक्री होऊनही अद्याप एकदाही कारवाई झाली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नागरिकांनीही कुठेही मोठ्या प्रमाणात साठा केल्याचे आढळल्यास १८००२२२३६५ या हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.पाच जिल्ह्यात ८ कोटींचा माल जप्तगुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाकडे आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीमध्ये १७५ ठिकाणी जप्तीची कारवाई केली आहे. ३१ गुन्हे दाखल केले असून तब्बल ८ कोटी ८० लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. ज्या वाहनांमधून या मालाची वाहतूक केली त्यांचा व्यवसाय परवाना व वाहन चालकाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओ विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :Policeपोलिस