शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

घरोघरी पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:35 IST

पत्रके वाटण्यावर भर; रसद कमी झाल्याने कार्यकर्त्यांची संख्या घटली; समन्वयाचा अभाव

नवी मुंबई : प्रचारासाठी शेवटचा रविवार असल्यामुळे युतीसह आघाडीच्या कार्यकर्त्यांची दिवसभर धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. घरोघरी जाऊन पत्रके वाटली जात होती; परंतु बहुतांश पदाधिकाऱ्यांना आवश्यक रसद मिळाली नसल्यामुळे प्रचारामधील कार्यकर्त्यांची संख्या कमी झाल्याचे व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे पाहावयास मिळाले.ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधील एकही प्रमुख उमेदवार नसल्यामुळे आचारसंहिता सुरू झाल्यापासून प्रचारामध्ये उत्साहच दिसला नाही. १३ ते २१ एप्रिल दरम्यान दोन रविवारसह एकूण पाच सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे प्रचारामध्ये गती येईल अशी अपेक्षा होती; परंतु सुरुवातीच्या चारही सुट्टींमध्ये कार्यकर्ते प्रचारामध्ये उतरलेच नाहीत. शेवटची सुटी असल्यामुळे रविवारी सर्वपक्षीय पदाधिकाºयांना घरोघरी जाऊन पत्रके वाटण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे सकाळपासून अनेक प्रभागांमध्ये नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकारी प्रत्येक घरामध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधत असल्याचे पाहावयास मिळत होते. राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार आनंद परांजपे यांनी स्वत: बेलापूर मतदारसंघामधून रॅली काढली. तुर्भे स्टोअरपासून एमआयडीमधील इतर विभागामधील नागरिकांशी संवाद साधला. बेलापूर ते ऐरोलीदरम्यान पदाधिकारी घरोघरी जाऊन पत्रके वाटत होते. शिवसेना व भाजप पदाधिकाºयांनीही पत्रके व खासदारांचा जाहीरनामा मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.यापूर्वी लोकसभा, विधानसभा व महानगरपालिका निवडणुकीच्या तुलनेमध्ये प्रचारामध्ये उत्साह दिसला नाही. पदाधिकाºयांना स्वखर्चाने प्रचार करावा लागत आहे. याशिवाय निवडणूक आयोगाचीही करडी नजर असल्याने प्रचारामधील कार्यकर्त्यांची संख्या कमी झाल्याचे पाहावयास मिळाले. रसदच मिळाली नसल्यामुळे ठरावीक पदाधिकाºयांना घेऊन घरोघरी जाण्यावर भर दिला असल्याची माहिती पदाधिकाºयांनी दिली. पुढील सहा दिवस रोज सकाळी व सायंकाळी नागरिकांची भेट घेण्यावर लक्ष दिले जाणार असल्याचेही अनेक पदाधिकाºयांनी सांगितले.समन्वयाचा अभाव ठरतेय डोकेदुखीअनेक प्रभागांमध्ये युती व आघाडीच्या पदाधिकाºयांमध्ये समन्वय नाही. काही प्रभागामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनी पहिली पत्रके वाटली व नंतर ती काँगे्रसच्या पदाधिकाºयांना दिली. यामुळे आम्ही आता पुन्हा तीच पत्रके वाटायची का, असा प्रश्न उपस्थित झाला. इतर पक्षांमध्येही समन्वयाचा अभाव असून नेते व उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरत आहे.नेत्यांकडून प्रचाराचा आढावानिवडणूक जवळ आल्यानंतरही नवी मुंबईमध्ये अद्याप प्रचार अपेक्षित गतीने होत नाही. अनेक नागरिकांना उमेदवार कोण याचीही माहिती नाही. पत्रके अनेक घरांमध्ये गेली नाहीत, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत नाही, नेत्यांनी प्रत्येक प्रभागाचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून कोण पदाधिकारी काम करत आहे व कोण दुर्लक्ष करतेय याची माहिती घेतली जात आहे.खर्च करायचा कोणी?प्रचारासाठी शेवटचा रविवार असतानाही अनेक प्रभागांमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसला नाही. प्रचार साहित्य पोहोचविले असले तरी कार्यकर्त्यांसाठी चहा, नाष्ट्याची सोयही पदाधिकाºयांना स्वखर्चाने करावी लागत आहे. प्रचारासाठी अपेक्षित रसद पोहोचलीच नसल्यामुळे प्रचारामध्ये कार्यकर्त्यांची संख्या कमी झाली असून खर्च करायचा कोणी, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.निवडणूक विभागाचे लक्षप्रचारावर निवडणूक विभागाने बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे, यामुळे प्रचारासाठी जास्त कार्यकर्ते, झेंडे व इतर साहित्य टाळले जात आहे. जेवणावळ्या व इतर खर्चामध्येही कपात केली जात आहे. आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होण्याची भीती असल्यामुळे पदाधिकारीही सावध राहूनच प्रचार करत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Navi Mumbaiनवी मुंबई