शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

#VidhanSabha2019 : अडचणीच्या वेळी साथ सोडणारे पळपुटे; शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 07:42 IST

अडचणीच्या वेळी केवळ सत्तेसाठी पक्ष सोडून जाणारे पळपुटे आहेत. त्यांना जनता माफ करणार नाही.

नवी मुंबई : अडचणीच्या वेळी केवळ सत्तेसाठी पक्ष सोडून जाणारे पळपुटे आहेत. त्यांना जनता माफ करणार नाही. मागील निवडणुकीत मंदा म्हात्रे जिंकल्या होत्या. नाईक यांना त्यांच्याच चुकीमुळे पराभव पत्करावा लागला. त्यानंतर कुठे तरी सुधारणा होईल, असे वाटत होते. मात्र पक्ष बदलून त्यांनी पुन्हा मोठी चूक केली आहे. चुकीला जनता कधीच माफ करीत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गणेश नाईक यांच्या पक्षांतराचा समाचार घेतला. तर दिल्लीश्वरांकडून अपमानास्पद वागणूक मिळूनही तह केला, अशा शब्दांत नाव न घेता त्यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली.नवी मुंबईतील नेरूळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.सत्ता नाही म्हणून विकास करता येत नाही. त्यामुळे पक्षांतर केले, ही सबब संधिसाधूपणाची आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. पक्षांतर करणारे देशाच्या या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्यांच्या बाजूला जाऊन बसत आहेत, ही खेदाची बाब आहे. मुळात विरोधात राहून अधिक विकासकामे करता येतात, असे पवार म्हणाले.>नवी मुंबईचे शिल्पकारनवी मुंबईचे शरद पवार हेच शिल्पकार आहेत. गेल्या पाच वर्षांत नवी मुंबईचा काहीच विकास झाला नाही. अशा परिस्थितीत विकासाच्या वल्गना करीत काही लोक पक्षांतर करीत आहेत, असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांचे नाव न घेता लगावला. नवी मुंबईकरांत आजही स्वाभिमान जिवंत आहे. कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नाही,असे ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारElectionनिवडणूकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019