शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

#VidhanSabha2019 : अडचणीच्या वेळी साथ सोडणारे पळपुटे; शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 07:42 IST

अडचणीच्या वेळी केवळ सत्तेसाठी पक्ष सोडून जाणारे पळपुटे आहेत. त्यांना जनता माफ करणार नाही.

नवी मुंबई : अडचणीच्या वेळी केवळ सत्तेसाठी पक्ष सोडून जाणारे पळपुटे आहेत. त्यांना जनता माफ करणार नाही. मागील निवडणुकीत मंदा म्हात्रे जिंकल्या होत्या. नाईक यांना त्यांच्याच चुकीमुळे पराभव पत्करावा लागला. त्यानंतर कुठे तरी सुधारणा होईल, असे वाटत होते. मात्र पक्ष बदलून त्यांनी पुन्हा मोठी चूक केली आहे. चुकीला जनता कधीच माफ करीत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गणेश नाईक यांच्या पक्षांतराचा समाचार घेतला. तर दिल्लीश्वरांकडून अपमानास्पद वागणूक मिळूनही तह केला, अशा शब्दांत नाव न घेता त्यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली.नवी मुंबईतील नेरूळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.सत्ता नाही म्हणून विकास करता येत नाही. त्यामुळे पक्षांतर केले, ही सबब संधिसाधूपणाची आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. पक्षांतर करणारे देशाच्या या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्यांच्या बाजूला जाऊन बसत आहेत, ही खेदाची बाब आहे. मुळात विरोधात राहून अधिक विकासकामे करता येतात, असे पवार म्हणाले.>नवी मुंबईचे शिल्पकारनवी मुंबईचे शरद पवार हेच शिल्पकार आहेत. गेल्या पाच वर्षांत नवी मुंबईचा काहीच विकास झाला नाही. अशा परिस्थितीत विकासाच्या वल्गना करीत काही लोक पक्षांतर करीत आहेत, असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांचे नाव न घेता लगावला. नवी मुंबईकरांत आजही स्वाभिमान जिवंत आहे. कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नाही,असे ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारElectionनिवडणूकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019