शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

जेएनपीटी ते उलवादरम्यान लवकरच सागरी मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 04:57 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीच्या अधिकाधिक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जेएनपीटी (बेलपाडा) ते उलवे या दरम्यान १0.१0६ मीटर लांबीचा सागरी मार्ग बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीच्या अधिकाधिक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जेएनपीटी (बेलपाडा) ते उलवे या दरम्यान १0.१0६ मीटर लांबीचा सागरी मार्ग बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याच्या ५.८ कि.मी. लांबीच्या मार्गासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. त्याचा एकूण खर्च ७११ कोटी रुपये इतका आहे.आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. डिसेंबर २०१९ मध्ये या विमानतळावरून विमानाचे पहिले उड्डाण होईल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. विमानतळाचे काम प्रगतिपथावर असतानाच विमानतळाला जोडणाऱ्या रस्ते वाहतुकीवरही सिडकोने भर दिला आहे. शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान २२ किमी लांबीच्या मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) रोडचे कामाला अलीकडेच सुरुवात करण्यात आली आहे. हा मार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी सिडकोने जेएनपीटी-उलवे दरम्यान १0.१0६ किलोमीटर लांबीचा नवीन सागरी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा मार्ग जेएनपीटी (बेलपाडा) येथून सुरू होणार असून पुढे जासई टेकड्यांच्या पायथ्याशी शिवाजीनगर येथील प्रस्तावित एमटीएचएलला जोडला जाणार आहे. येथून हा मार्ग उलवे किनारपट्टीवरून पुढे जाणार आहे. पनवेल खाडीवरील आम्रमार्ग हा या मार्गाचा शेवटचा टप्पा असणार आहे. त्यामुळे जेएनपीटीला जोडणारा दुसरा जोडमार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग-४बी आणि राज्य महामार्ग -५४ वरून आम्रमार्गावर येणाºया वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.दोन टप्प्यात हा सागरी मार्ग बांधण्याचे सिडकोने निश्चित केले आहे. पहिला टप्पा आम्रमार्ग जंक्शन ते शिवाजीनगर तर दुसरा टप्पा शिवाजीनगर ते जेएनपीटी (बेलपाडा) असा असणार आहे. पहिल्या टप्प्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा १.२ कि.मी. लांबीचा जोड रस्तादेखील विकसित करण्यात येणार आहे.या मार्गातही तीन खाडीपूल असून एक खाडीपूल १.२ किलोमीटर अंतराचा आहे, तर अन्य दोन खाडीपूल ६६० मीटर लांबीचे आहेत. या मार्गात खारफुटींचा अडथळा आहे. त्यासाठी बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी सिडकोने संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे.दरम्यान, या सागरी मार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या आर्थिक निविदा मागविण्यात आल्या आहेत. आॅगस्ट महिन्यात या निविदा उघडण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. साधारण आॅक्टोबर २०२१पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचा सिडकोचा निर्धार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई