शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

रोहा - अलिबाग मार्गावरील पूल गेला वाहून

By admin | Updated: September 23, 2016 03:32 IST

रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून रोह्याच्या कुंडलिका नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे

रोहा : रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून रोह्याच्या कुंडलिका नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर रोहा - अलिबाग मार्गावरील भातसई व झोळंबेजवळील कोपरा येथील अंदाजे १५ फूट लांबीचा पूल (मोरी) वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहेत. तर रोह्याकडे येणारी वाहतूक रेवदंडा - चणेरा मार्गे वळवली असून २० गावांचा संपर्कतुटला आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. ही घटना गुरु वारी सकाळी १० च्या सुमारास घडली.सानेगाव येथील जेट्टीवरून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे झोळंबेजवळील छोटा पूल कमकु वत झाल्यानेप्रवाहात वाहून गेला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. १२ टन वाहतूक क्षमता असलेला हा रस्ता येथे असलेल्या इंडो एनर्जी जेट्टीतील कोळशाच्या ४० ते ४५ टनपेक्षा अधिक तसेच अवजड वाहतुकीमुळे उद्ध्वस्त झाला. महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर शासनाने कमकुवत पूल, मोऱ्यांचे स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या. मात्र, या कमकुवत छोट्या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. गुरु वारी सकाळपासून पडलेल्या मुसळधार पावसाने या परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर या थांबलेल्या पाण्याने झोळंबे येथील कमकुवत झालेल्या छोट्या पुलाला जोरदार धडक दिल्याने तो वाहून गेला आहे. या घटनेनंतर मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. घटनास्थळी रोह्याच्या पी. आय. निशा जाधव, तहसीलदार सुरेश कासेकर आदी अधिकारी तत्काळ धाव घेऊन पाहणी के ली. दुपारी १२.३० पर्यंत पावसाचा जोर कमी झाला असून या मार्गावरु न वाहतूक पुन्हा करण्यास किमान तीन दिवस तरी लागतील, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.गुरु वारी दिवसभरात रोहा येथे १२१ मिमी इतका पाऊस पडल्याने कुंडलिका नदीच्या सर्व उपनद्या व नाले पाण्याने दुथडी भरून वाहत होते. भिरा व दोलवाहल धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. धरणातून पाणी सोडले गेल्यास रोह्यातील रोहा अष्टमीला जोडणाऱ्या कुंडलिका नदीवरील पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे. धरणातून पाणी सोडले गेल्यास त्याचा फटका अष्टमी बाजूकडून येणाऱ्या एमआयडीसीतील कामगारांना तसेच पुणे - मुंबईकडे जाणाऱ्या एसटी सेवेला बसणार आहे. सार्वजनिक बांधकाम खाते कार्यालयाच्या आवारात पाणी साचले होते. दामखाडी गावात जाणाऱ्या रस्त्यावरूनही पाणी वाहत होते.तळा तालुक्यात पावसाचा कहरतळा : गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे भात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असून शेतकरी चिंतेत आहे. गेली अनेक वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात सप्टेंबर महिन्यात पाऊस पडलेला पहावयास मिळत आहे. पावसाने जोर धरल्यामुळे शेतात भातशेती आडवी झालेली पहावयास मिळत आहे. आता उत्तम प्रकारे दाणा भरलेली लोंबी वरती येत असतानाच पावसाने कहर केला आहे. २१ सप्टेंबरला ९७ मि.मी. पावसाची तहसील कार्यालयात नोंद झाली, अशी माहिती तहसील कार्यालयातून उपलब्ध होत आहे. गुरु वारी रोहा-तळा रस्त्यावर तांबडी येथील पुलाजवळ पाणी आल्यामुळे या परिसरातील रोहाकडून कॉलेजला येणारे विद्यार्थी आले नाहीत. मुठवली नदीचे तळा-इंदापूर मार्गावर पाणी आले होते. हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडलेवडखळ/पेण : बुधवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून हेटवणे धरण पुनश्च एकदा भरल्यामुळे पहाटेच्या वेळी धरणाचे सहा दरवाजे आपत्कालीन स्थितीत उघडण्यात आले. भोगावती नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने पेण शहराजवळील उत्कर्षनगर, नंदिमाळ नाका, तरणखोप, शंकर नगर परिसरात पुराचे पाणी शिरले, तर नदीवर असणाऱ्या भुंड्या पुलावरून पाणी वाहू लागले. याचबरोबर गडब गावातील १० ते ११ घरांमध्ये पुराचे पाणी रात्रीपासून शिरल्याने ग्रामस्थांची धावपळ उडाली तर काही घरांमध्ये ३ ते ४ फूट पाणी शिरल्याने फर्निचर, कपडे, तांदूळ असे सामान भिजले तर घराबाहेर असणाऱ्या वस्तू वाहून गेल्या. खारेपाट भागातील वाशी, वढाव, कणे, काळेश्री, भाल आदी गावांमध्ये पाणी शिरल्याने तेथे ग्रामस्थांमध्ये घबराट दिसून येत होती. गडब गावातील पूरस्थितीची पाहणी तहसीलदार वंदना मकू, जि.प. सदस्य संजय जांभळे, तलाठी सर्कल अधिकारी, ग्रा.पं. सदस्यांनी के ली. हेटवणे धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून आल्याने धरणाचे सर्व गेट खुले करण्यात आले. त्यामधून १८७ घ.न.मी.पर सेकंद पाणी वाहून जात असल्याने नदी पात्रात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.