शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रोहा - अलिबाग मार्गावरील पूल गेला वाहून

By admin | Updated: September 23, 2016 03:32 IST

रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून रोह्याच्या कुंडलिका नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे

रोहा : रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून रोह्याच्या कुंडलिका नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर रोहा - अलिबाग मार्गावरील भातसई व झोळंबेजवळील कोपरा येथील अंदाजे १५ फूट लांबीचा पूल (मोरी) वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहेत. तर रोह्याकडे येणारी वाहतूक रेवदंडा - चणेरा मार्गे वळवली असून २० गावांचा संपर्कतुटला आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. ही घटना गुरु वारी सकाळी १० च्या सुमारास घडली.सानेगाव येथील जेट्टीवरून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे झोळंबेजवळील छोटा पूल कमकु वत झाल्यानेप्रवाहात वाहून गेला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. १२ टन वाहतूक क्षमता असलेला हा रस्ता येथे असलेल्या इंडो एनर्जी जेट्टीतील कोळशाच्या ४० ते ४५ टनपेक्षा अधिक तसेच अवजड वाहतुकीमुळे उद्ध्वस्त झाला. महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर शासनाने कमकुवत पूल, मोऱ्यांचे स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या. मात्र, या कमकुवत छोट्या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. गुरु वारी सकाळपासून पडलेल्या मुसळधार पावसाने या परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर या थांबलेल्या पाण्याने झोळंबे येथील कमकुवत झालेल्या छोट्या पुलाला जोरदार धडक दिल्याने तो वाहून गेला आहे. या घटनेनंतर मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. घटनास्थळी रोह्याच्या पी. आय. निशा जाधव, तहसीलदार सुरेश कासेकर आदी अधिकारी तत्काळ धाव घेऊन पाहणी के ली. दुपारी १२.३० पर्यंत पावसाचा जोर कमी झाला असून या मार्गावरु न वाहतूक पुन्हा करण्यास किमान तीन दिवस तरी लागतील, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.गुरु वारी दिवसभरात रोहा येथे १२१ मिमी इतका पाऊस पडल्याने कुंडलिका नदीच्या सर्व उपनद्या व नाले पाण्याने दुथडी भरून वाहत होते. भिरा व दोलवाहल धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. धरणातून पाणी सोडले गेल्यास रोह्यातील रोहा अष्टमीला जोडणाऱ्या कुंडलिका नदीवरील पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे. धरणातून पाणी सोडले गेल्यास त्याचा फटका अष्टमी बाजूकडून येणाऱ्या एमआयडीसीतील कामगारांना तसेच पुणे - मुंबईकडे जाणाऱ्या एसटी सेवेला बसणार आहे. सार्वजनिक बांधकाम खाते कार्यालयाच्या आवारात पाणी साचले होते. दामखाडी गावात जाणाऱ्या रस्त्यावरूनही पाणी वाहत होते.तळा तालुक्यात पावसाचा कहरतळा : गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे भात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असून शेतकरी चिंतेत आहे. गेली अनेक वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात सप्टेंबर महिन्यात पाऊस पडलेला पहावयास मिळत आहे. पावसाने जोर धरल्यामुळे शेतात भातशेती आडवी झालेली पहावयास मिळत आहे. आता उत्तम प्रकारे दाणा भरलेली लोंबी वरती येत असतानाच पावसाने कहर केला आहे. २१ सप्टेंबरला ९७ मि.मी. पावसाची तहसील कार्यालयात नोंद झाली, अशी माहिती तहसील कार्यालयातून उपलब्ध होत आहे. गुरु वारी रोहा-तळा रस्त्यावर तांबडी येथील पुलाजवळ पाणी आल्यामुळे या परिसरातील रोहाकडून कॉलेजला येणारे विद्यार्थी आले नाहीत. मुठवली नदीचे तळा-इंदापूर मार्गावर पाणी आले होते. हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडलेवडखळ/पेण : बुधवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून हेटवणे धरण पुनश्च एकदा भरल्यामुळे पहाटेच्या वेळी धरणाचे सहा दरवाजे आपत्कालीन स्थितीत उघडण्यात आले. भोगावती नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने पेण शहराजवळील उत्कर्षनगर, नंदिमाळ नाका, तरणखोप, शंकर नगर परिसरात पुराचे पाणी शिरले, तर नदीवर असणाऱ्या भुंड्या पुलावरून पाणी वाहू लागले. याचबरोबर गडब गावातील १० ते ११ घरांमध्ये पुराचे पाणी रात्रीपासून शिरल्याने ग्रामस्थांची धावपळ उडाली तर काही घरांमध्ये ३ ते ४ फूट पाणी शिरल्याने फर्निचर, कपडे, तांदूळ असे सामान भिजले तर घराबाहेर असणाऱ्या वस्तू वाहून गेल्या. खारेपाट भागातील वाशी, वढाव, कणे, काळेश्री, भाल आदी गावांमध्ये पाणी शिरल्याने तेथे ग्रामस्थांमध्ये घबराट दिसून येत होती. गडब गावातील पूरस्थितीची पाहणी तहसीलदार वंदना मकू, जि.प. सदस्य संजय जांभळे, तलाठी सर्कल अधिकारी, ग्रा.पं. सदस्यांनी के ली. हेटवणे धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून आल्याने धरणाचे सर्व गेट खुले करण्यात आले. त्यामधून १८७ घ.न.मी.पर सेकंद पाणी वाहून जात असल्याने नदी पात्रात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.