शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील नदीकाठची गावे, नागरी वसाहत असुरक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:59 IST

पनवेल परिसरातून वाहणाऱ्या गाढी नदीमुळे लगतच्या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला

- अरूणकुमार मेहत्रे कळंबोली : पनवेल परिसरातून वाहणाऱ्या गाढी नदीमुळे लगतच्या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. रविवारी झालेल्या दमदार पावसाचे पाणी लोकवसाहतीत शिरून अनेक घरांचे नुकसान झाले. या ठिकाणी पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात प्रशासनाला अपयश आल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.पनवेल तालुक्याच्या भौगोलिक अभ्यास करता, येथून गाढी, कासाडी, काळुंद्रे, पाताळगंगा या नद्या वाहतात. या नद्यांपैकी गाढी नदी महत्त्वाची समजली जाते. माथेरानच्या डोंगरांमधून उगम पावणाºया या नदीलगत नेरे, कोप्रोली, चिपळे, केवाळे, हरी ग्राम, आकुर्ली, सुकापूर, पाली-देवद, विचुंबे याबरोबरच, नवीन पनवेल आणि पनवेल शहरांचा समावेश आहे. माथेरानमध्ये पडणारा पाऊस थेट गाढी नदीत वाहून येतो, तसेच देहरंग धरणातील ओवरफ्लो झालेले पाणीही नदीच्या पात्रात येऊन मिळते. अतिवृष्टीमुळे अनेकदा नदी धोक्याची पातळी ओलांडते. मात्र, अशा वेळी पाटबंधारे विभागाकडून दक्षतेचा इशारा दिला जात नाही. त्याचबरोबर, नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात खडक आहेत. त्यामुळे पाण्याला अडथळा येऊन ते आजूबाजूला पसरते. नदीकिनारी अनेक अनधिकृत बांधकामेही झाली आहेत. त्याचाही पावसाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. या अनेक गोष्टी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहेत.नदीपात्रातील पाणी बाहेर येऊ नये, यासाठी पाटबंधारे विभागाकडून कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. या सर्व गोष्टीमुळे रविवारी पनवेल शहर जलमय झाले, तसेच नदी लगतच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शिरवलीच्या डोंगरातून येणारी कासाडी नदी तळोजा, तसेच रोडपाली परिसरातून खाडीला जाऊन मिळते. या नदीलगतसुद्धा गावे आणि नागरी वसाहती आहेत. रविवारी पडघे गावात पाणी शिरल्याने घरांचे नुकसान झाले, तसेच नऊ जण पाण्यात अडकले. स्थानिक युवक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षितरीत्या त्यांना बाहेर काढले. ते वेळेवर पोहोचले नसते, तर अनर्थ घडला असता. याशिवाय रोडपाली येथील कातकरवाडी पाणी शिरल्याने आदिवासी कुटुंबांना कळंबोली येथील कालभैरव मंगल कार्यालय स्थलांतरित करावे लागले. इतर गावांमध्ये पावसाचा फटका बसला. पाताळगंगा नदीलगतचीही परिस्थिती वेगळी नव्हती.संरक्षण भिंतीची गरजगाडी आणि कासाडी नदीलगत ज्या गावांमध्ये, तसेच परिसरात पाणी शिरते, तिथे पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना पाटबंधारे विभागाने करायला हव्यात, तसेच येथे संरक्षण भिंत बांधून संबंधित गावे आणि वसाहती संरक्षित कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भूषण म्हात्रे यांनी केली आहे. पूर आल्यानंतर जागे होण्यापेक्षा तो येऊ नये त्या अनुषंगाने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे यांनी सांगितले.रविवारी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पनवेल तालुक्यातील नद्यांची पातळी वाढली. त्यानुसार, आजूबाजूच्या गावांना सूचना देण्यात आल्या होत्या. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, या दृष्टिकोनातून पाटबंधारे विभाग, महापालिका आणि सिडको या सर्व यंत्रणांना बरोबर घेऊन उपाययोजना केल्या जातील.- अमित सानप,तहसीलदार पनवेल.

टॅग्स :Rainपाऊस