शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

रेवदंडा किल्ला संवर्धनासाठी दुर्गप्रेमींची चळवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 00:06 IST

तटबंदी ढासळत चाललेल्या रेवंदडा किल्ल्याच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींनी चळवळ सुरू केली आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : तटबंदी ढासळत चाललेल्या रेवंदडा किल्ल्याच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींनी चळवळ सुरू केली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून नियमित श्रमदान मोहिमांचे आयोजन केले जात असून, तटबंदीवरील झुडपे काढणे व साफसफाई करण्याचे काम सुरू आहे. जंजिऱ्यानंतर सर्वाधिक तोफा रेवदंडावर आढळल्या आहेत. या तोफांची व तटबंदीसह इतर सर्व वास्तूंना संरक्षित स्मारकाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.रायगड जिल्ह्यामधील दुर्गसंपत्तीचे जतन करण्यासाठी दुर्गप्रेमींनी प्रयत्न सुरू केले आहेत. विविध किल्ल्यांवर वर्षभर सातत्याने श्रमदान मोहिमा राबविल्या जात असून, सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने जवळपास तीन वर्षांपासून रेवदंडा किल्ला संवर्धनाचे काम सुरू आहे. जवळपास ४९५ वर्षांची पार्श्वभूमी असलेल्या किल्ल्याच्या तटबंदीचा परीघ पाच किलोमीटर पर्यंत आहे. सद्यस्थितीमध्ये तटबंदी अनेक ठिकाणी ढासळू लागली आहे. तटबंदीमध्ये वृक्ष व झुडपे वाढली आहेत. दुर्गप्रेमी श्रमदान मोहिमा राबवून झुडपे काढून तटबंदीची स्वच्छता करत आहेत. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात तोफा आढळत आहेत. आतापर्यंत ५० तोफांची नोंद झाली आहे. या तोफांवर क्रमांकही टाकले जात आहेत. काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेली तोफ शोधण्यासाठीही दुर्गप्रेमींनी परिश्रम घेतले होते. राज्यातील सर्वाधिक तोफा जंजिºयावर असून, त्यानंतर रेवदंडा किल्ल्यावर आहेत. या परिसरामध्ये अजूनही काही तोफा जमिनीमध्ये काढल्या गेल्या असल्याची शक्यता आहे. किल्ल्याच्या भुयारी मार्गाचीही साफसफाई केली जात आहे. सातखणी मनोरा व इतर काही अवशेष संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहेत. साधारणत: २७ गुंठे परिसरच संरक्षित घोषित केला आहे. रेवदंडा किल्ल्याची तटबंदी, भुयारी मार्ग, तोफा व इतर वास्तूही संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात यावी, यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने पत्रव्यवहार सुरू आहे.>रेवदंडा किल्ल्यावर रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी संवर्धन मोहिमा आयोजित केल्या जात आहेत. जमिनीत गाढलेल्या तोफा बाहेर काढून त्यांना नंबर दिले आहेत. तटबंदीवरील झुडपे काढून साफसफाई केली जात आहे.- सिद्धेश शेणवईकर,अध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान (अलिबाग विभाग)>सहभागी सदस्यरविवारी किल्ल्यावर आयोजित केलेल्या मोहिमेमध्ये सिद्धेश शेणवईकर, मेघा पाटील, अंकिता पाटील, निकिता पाटील, प्रशांत शेणवईकर, राकेश ठाकूर, सुजीत भोनकर, आदित्य कवळे, कैलास कासकर, महेंद्र गावडे, दीप भगत, श्रीकांत भगत, अभिर भोईर, निकेश सांदणकर, उमेश घरत, श्रवण घरत, मयूर पाटील, तेजस कवळे, अमोल तुरे, अल्पेश शेळके, विराज गुंड, सुयोग राऊत, गौरव पाटील, केदार पाटील, भूपेश पाटील, अक्षय पाटील, सौरभ खारकर, अश्विन विरकुट, साहिल चौलकर, सन्मेश नाईक, दिव्येश पाटील, अल्पेश थळे, करण नाईक, राकेश काठे, विशाल ठाकूर, वर्षा ठाकूर, विनिकेत भोईर, जिगर शिंदे, विनीत भोईर व इतरांचा सहभाग होता.>रेवदंडा किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. श्रमदान मोहिमेसह जनजागृतीही करण्यात येत आहे. तटबंदीसह इतर वास्तू संरक्षित स्मारक म्हणून घोषित व्हावी, यासाठी राज्य व केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करत आहोत.- गणेश रघुवीर, अध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान, दुर्गसंवर्धन विभाग