शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

रेवदंडा किल्ला संवर्धनासाठी दुर्गप्रेमींची चळवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 00:06 IST

तटबंदी ढासळत चाललेल्या रेवंदडा किल्ल्याच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींनी चळवळ सुरू केली आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : तटबंदी ढासळत चाललेल्या रेवंदडा किल्ल्याच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींनी चळवळ सुरू केली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून नियमित श्रमदान मोहिमांचे आयोजन केले जात असून, तटबंदीवरील झुडपे काढणे व साफसफाई करण्याचे काम सुरू आहे. जंजिऱ्यानंतर सर्वाधिक तोफा रेवदंडावर आढळल्या आहेत. या तोफांची व तटबंदीसह इतर सर्व वास्तूंना संरक्षित स्मारकाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.रायगड जिल्ह्यामधील दुर्गसंपत्तीचे जतन करण्यासाठी दुर्गप्रेमींनी प्रयत्न सुरू केले आहेत. विविध किल्ल्यांवर वर्षभर सातत्याने श्रमदान मोहिमा राबविल्या जात असून, सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने जवळपास तीन वर्षांपासून रेवदंडा किल्ला संवर्धनाचे काम सुरू आहे. जवळपास ४९५ वर्षांची पार्श्वभूमी असलेल्या किल्ल्याच्या तटबंदीचा परीघ पाच किलोमीटर पर्यंत आहे. सद्यस्थितीमध्ये तटबंदी अनेक ठिकाणी ढासळू लागली आहे. तटबंदीमध्ये वृक्ष व झुडपे वाढली आहेत. दुर्गप्रेमी श्रमदान मोहिमा राबवून झुडपे काढून तटबंदीची स्वच्छता करत आहेत. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात तोफा आढळत आहेत. आतापर्यंत ५० तोफांची नोंद झाली आहे. या तोफांवर क्रमांकही टाकले जात आहेत. काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेली तोफ शोधण्यासाठीही दुर्गप्रेमींनी परिश्रम घेतले होते. राज्यातील सर्वाधिक तोफा जंजिºयावर असून, त्यानंतर रेवदंडा किल्ल्यावर आहेत. या परिसरामध्ये अजूनही काही तोफा जमिनीमध्ये काढल्या गेल्या असल्याची शक्यता आहे. किल्ल्याच्या भुयारी मार्गाचीही साफसफाई केली जात आहे. सातखणी मनोरा व इतर काही अवशेष संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहेत. साधारणत: २७ गुंठे परिसरच संरक्षित घोषित केला आहे. रेवदंडा किल्ल्याची तटबंदी, भुयारी मार्ग, तोफा व इतर वास्तूही संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात यावी, यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने पत्रव्यवहार सुरू आहे.>रेवदंडा किल्ल्यावर रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी संवर्धन मोहिमा आयोजित केल्या जात आहेत. जमिनीत गाढलेल्या तोफा बाहेर काढून त्यांना नंबर दिले आहेत. तटबंदीवरील झुडपे काढून साफसफाई केली जात आहे.- सिद्धेश शेणवईकर,अध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान (अलिबाग विभाग)>सहभागी सदस्यरविवारी किल्ल्यावर आयोजित केलेल्या मोहिमेमध्ये सिद्धेश शेणवईकर, मेघा पाटील, अंकिता पाटील, निकिता पाटील, प्रशांत शेणवईकर, राकेश ठाकूर, सुजीत भोनकर, आदित्य कवळे, कैलास कासकर, महेंद्र गावडे, दीप भगत, श्रीकांत भगत, अभिर भोईर, निकेश सांदणकर, उमेश घरत, श्रवण घरत, मयूर पाटील, तेजस कवळे, अमोल तुरे, अल्पेश शेळके, विराज गुंड, सुयोग राऊत, गौरव पाटील, केदार पाटील, भूपेश पाटील, अक्षय पाटील, सौरभ खारकर, अश्विन विरकुट, साहिल चौलकर, सन्मेश नाईक, दिव्येश पाटील, अल्पेश थळे, करण नाईक, राकेश काठे, विशाल ठाकूर, वर्षा ठाकूर, विनिकेत भोईर, जिगर शिंदे, विनीत भोईर व इतरांचा सहभाग होता.>रेवदंडा किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. श्रमदान मोहिमेसह जनजागृतीही करण्यात येत आहे. तटबंदीसह इतर वास्तू संरक्षित स्मारक म्हणून घोषित व्हावी, यासाठी राज्य व केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करत आहोत.- गणेश रघुवीर, अध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान, दुर्गसंवर्धन विभाग