शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

रेवदंडा किल्ला संवर्धनासाठी दुर्गप्रेमींची चळवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 00:06 IST

तटबंदी ढासळत चाललेल्या रेवंदडा किल्ल्याच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींनी चळवळ सुरू केली आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : तटबंदी ढासळत चाललेल्या रेवंदडा किल्ल्याच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींनी चळवळ सुरू केली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून नियमित श्रमदान मोहिमांचे आयोजन केले जात असून, तटबंदीवरील झुडपे काढणे व साफसफाई करण्याचे काम सुरू आहे. जंजिऱ्यानंतर सर्वाधिक तोफा रेवदंडावर आढळल्या आहेत. या तोफांची व तटबंदीसह इतर सर्व वास्तूंना संरक्षित स्मारकाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.रायगड जिल्ह्यामधील दुर्गसंपत्तीचे जतन करण्यासाठी दुर्गप्रेमींनी प्रयत्न सुरू केले आहेत. विविध किल्ल्यांवर वर्षभर सातत्याने श्रमदान मोहिमा राबविल्या जात असून, सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने जवळपास तीन वर्षांपासून रेवदंडा किल्ला संवर्धनाचे काम सुरू आहे. जवळपास ४९५ वर्षांची पार्श्वभूमी असलेल्या किल्ल्याच्या तटबंदीचा परीघ पाच किलोमीटर पर्यंत आहे. सद्यस्थितीमध्ये तटबंदी अनेक ठिकाणी ढासळू लागली आहे. तटबंदीमध्ये वृक्ष व झुडपे वाढली आहेत. दुर्गप्रेमी श्रमदान मोहिमा राबवून झुडपे काढून तटबंदीची स्वच्छता करत आहेत. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात तोफा आढळत आहेत. आतापर्यंत ५० तोफांची नोंद झाली आहे. या तोफांवर क्रमांकही टाकले जात आहेत. काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेली तोफ शोधण्यासाठीही दुर्गप्रेमींनी परिश्रम घेतले होते. राज्यातील सर्वाधिक तोफा जंजिºयावर असून, त्यानंतर रेवदंडा किल्ल्यावर आहेत. या परिसरामध्ये अजूनही काही तोफा जमिनीमध्ये काढल्या गेल्या असल्याची शक्यता आहे. किल्ल्याच्या भुयारी मार्गाचीही साफसफाई केली जात आहे. सातखणी मनोरा व इतर काही अवशेष संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहेत. साधारणत: २७ गुंठे परिसरच संरक्षित घोषित केला आहे. रेवदंडा किल्ल्याची तटबंदी, भुयारी मार्ग, तोफा व इतर वास्तूही संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात यावी, यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने पत्रव्यवहार सुरू आहे.>रेवदंडा किल्ल्यावर रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी संवर्धन मोहिमा आयोजित केल्या जात आहेत. जमिनीत गाढलेल्या तोफा बाहेर काढून त्यांना नंबर दिले आहेत. तटबंदीवरील झुडपे काढून साफसफाई केली जात आहे.- सिद्धेश शेणवईकर,अध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान (अलिबाग विभाग)>सहभागी सदस्यरविवारी किल्ल्यावर आयोजित केलेल्या मोहिमेमध्ये सिद्धेश शेणवईकर, मेघा पाटील, अंकिता पाटील, निकिता पाटील, प्रशांत शेणवईकर, राकेश ठाकूर, सुजीत भोनकर, आदित्य कवळे, कैलास कासकर, महेंद्र गावडे, दीप भगत, श्रीकांत भगत, अभिर भोईर, निकेश सांदणकर, उमेश घरत, श्रवण घरत, मयूर पाटील, तेजस कवळे, अमोल तुरे, अल्पेश शेळके, विराज गुंड, सुयोग राऊत, गौरव पाटील, केदार पाटील, भूपेश पाटील, अक्षय पाटील, सौरभ खारकर, अश्विन विरकुट, साहिल चौलकर, सन्मेश नाईक, दिव्येश पाटील, अल्पेश थळे, करण नाईक, राकेश काठे, विशाल ठाकूर, वर्षा ठाकूर, विनिकेत भोईर, जिगर शिंदे, विनीत भोईर व इतरांचा सहभाग होता.>रेवदंडा किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. श्रमदान मोहिमेसह जनजागृतीही करण्यात येत आहे. तटबंदीसह इतर वास्तू संरक्षित स्मारक म्हणून घोषित व्हावी, यासाठी राज्य व केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करत आहोत.- गणेश रघुवीर, अध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान, दुर्गसंवर्धन विभाग