शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

धोकादायक इमारतीतील रहिवासी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 04:19 IST

सिडकोपाठोपाठ महापालिकेनेही मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीची जबाबदारी झटकून लावली आहे, त्यामुळे सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या आठ हजार इमारतींतील सुमारे ५२ हजार रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.

नवी मुंबई - सिडकोपाठोपाठ महापालिकेनेही मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीची जबाबदारी झटकून लावली आहे, त्यामुळे सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या आठ हजार इमारतींतील सुमारे ५२ हजार रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. दोन्ही प्राधिकरणांनी पुनर्बांधणीच्या प्रश्नाला बगल दिल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत, त्यामुळे पुनर्बांधणीचा हा प्रश्न रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सिडकोने बांधलेल्या इमारतीची अल्पावधीतच पडझड सुरू झाली आहे. दिवसाआड लहान-मोठे अपघात घडत आहेत. या इमारतीच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून चर्चिला जात आहे. विशेष म्हणजे, केवळ राजकीय पटलावर या विषयावर चर्चा होत आहे. निवडणुकीतील प्रचाराचा हाच प्रमुख मुद्दा राहिला आहे. महापालिकेतील सत्ताधाºयांनी याच मुद्द्यावर अनेक निवडणुका लढविल्या आणि जिंकल्याही; परंतु पुनर्बांधणीचा प्रश्न मात्र जैसे थेच राहिला. सध्या पुनर्बांधणीच्या मार्गातील तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत; परंतु शहरात संक्रमण शिबिराचे नियोजन नसल्याने पुनर्बांधणीला खो बसला आहे. संक्रमण शिबिर उभारण्याचा महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव सत्ताधाºयांनी फेटाळून लावला आहे, त्यामुळे पुनर्बांधणीच्या वेळी रहिवाशांच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पुनर्बांधणीची प्रक्रिया रखडली आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महापालिकेने धोकादायक इमारतींची जबाबदारी झटकून लावली आहे. शासनाच्या नियमानुसार जागेचे मालक व ज्यांनी इमारतीची निर्मिती केली त्यांनीच येथील रहिवाशांचे पुनर्वसन करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करून महापालिकेने पुनर्वसनाचा चेंडू सिडकोच्या कोर्टात ढकलला आहे. इतकेच नव्हे, धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतीत काही दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी येथील रहिवासी आणि असोसिएशनची असेल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. तर महापालिकेच्या या भूमिकेवर सिडकोने प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शविला आहे, त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून पुनर्बांधणीचे स्वप्न पाहणाºया सुमारे ५२ हजार रहिवाशांची निराशा झाली आहे. महापालिकेत सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुनर्बांधणीच्या नावाखाली येथील रहिवाशांना १५ वर्षे झुलवत ठेवले. अडीच एफएसआयचे कागदी घोडे नाचविले. २०१४ मध्ये राज्यात सत्तेत आलेल्या भाजपा-शिवसेना सरकारने अडीच एफएसआयचा प्रश्न मार्गी लावला. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी या प्रश्नावर वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली, शासनदरबारी विविध स्तरावर चर्चा घडवून आणली. पुनर्बांधणीसाठी लादण्यात आलेली सहमतीची अट ५१ टक्क्यांपर्यंत शिथिल करून ती ५१ टक्के इतकी करण्यात आली, त्यामुळे पुनर्बांधणीच्या मार्गातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत; परंतु पुनर्बांधणीदरम्यान, रहिवाशांनी कुठे स्थलांतरित व्हायचे, हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. संक्रमण शिबिराबाबत महापालिकेने अगोदरच आखडता हात घेतला आहे. त्यामुळे पुनर्बांधणीचा प्रश्न आणखी जटील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाºयांच्या भूमिकेकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.महापालिकेची नकारात्मक भूमिकामहापालिकेने या वर्षी ३७८ धोकादायक इमारती जाहीर केल्या आहेत. यात ५८ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या इमारती तातडीने रिकाम्या करण्याच्या नोटिसा रहिवाशांना बजावण्यात आल्या आहेत. तर नेरुळ येथील दत्तगुरू सोसायटीतील घरे रिकामी करण्यासाठी महापालिकेने येथील वीजपुरवठाही खंडित केला आहे.विशेष म्हणजे, निर्वासित होणाºया या रहिवाशांनी जायचे कुठे, याचे कोणतेही नियोजन महापालिकेने केलेले नाही. आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडणारी संक्रमण शिबिरे उपयुक्त ठरतात. मागील २५ वर्षांत महापालिकेला त्याचे कधीही स्मरण झाले नाही. महापालिकेच्या या नकारात्मक भूमिकेचा फटका रहिवाशांना सहन करावा लागत आहे.५२ हजार रहिवाशांचा जीव टांगणीलाशहरात सिडको निर्मित जवळपास आठ हजार इमारती आहेत, यात सुमारे ५२ हजार रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. या इमारती राहण्यास धोकादाक ठरल्या आहेत, त्यामुळे त्यांची पुनर्बांधणी करणे आवश्यक ठरले आहे. मात्र, पुनर्बांधणीच्या आड लपलेल्या अर्थकारणामुळे या प्रक्रियेला खीळ बसली आहे. विशेष म्हणजे, प्रश्न मार्गी लावण्याऐवजी राजकीय पक्षात श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू आहे. याचा मनस्ताप येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या