शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी एमएमआरडीएच्या प्रकल्पाविरोधात हरकती; शेतकरी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 23:08 IST

तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी एमएमआरडीएच्या प्रकल्पाविरोधात २७ मार्चला ३५००० शेतकरी नोंदविणार हरकती : एमएमआरडीए भूसंपादन विरोधी समितीची माहिती

 मधुकर ठाकूर

उरण : एमएमआरडीएच्या माध्यमातून तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण आदी १२४ महसुली गावातील जमिनी संपादित करण्यासाठी अधिसुचने विरोधात हरकती नोंदविण्यासाठी ३० दिवसांची मुदत वाढवून देण्याच्या मागणीला नगररचना विभागाच्या सहसंचालकांनी अद्यापही कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी २७ मार्च रोजी संबंधित विभागाच्या कार्यालयात जाऊन शेतकरी हरकती नोंदवणार आहेत.शेतकऱ्यांच्यावतीने ३५ हजार शेतकऱ्यांच्या हरकती नोंदविण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीए भूसंपादन विरोधी समितीचे समन्वयक रूपेश पाटील यांनी दिली. 

तिसऱ्या मुंबईसाठी रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण आदी १२४ महसुली गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्यात येणार आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील उरण-२९, पनवेल-७ , पेण -८८ गावे  याशिवाय मुंबई महानगर प्रादेशिक योजना क्षेत्रातील २ आणि रायगड प्रादेशिक योजना क्षेत्रातील ९ गावांचा समाविष्ट करण्यात आलेल्या अशा एकूण १२४ महसूल गावांचा समावेश आहे. १२४ महसूली गावातील परिसर अंदाजे ३२३.४४ चौ. कि.मी. क्षेत्रात पसरला आहे.या तिसऱ्या नवीमुंबई निर्मितीची जबाबदारी सिडकोकडून काढून घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्ष असलेल्या एमआरडीएकडे सोपविण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या जमीनी संपादन करण्यासाठी शासनाने ४ मार्च २०२४ रोजी अधिसूचनाही प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी २ एप्रिलपर्यंत म्हणजे ३० दिवसात हरकती नोंदविण्यासाठी मुदतही देण्यात आली आहे.

तिसऱ्या मुंबईच्या या एमएमआरडीएच्या प्रकल्पामुळे येथील शेतकरी संपूर्ण उध्वस्त होणार आहेत.त्यांचे उदरनिर्वाहीचे साधनही नष्ट होणार आहे.कवडीमोल भावाने शेतकऱ्यांकडून जमीनी संपादन करुन भांडवलदारांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे.त्यामुळे तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीलाच विरोध करुन एक इंचही जमीन न देण्याचा निर्णय येथील हजारो शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी झालेल्या बैठकीतुन एकमुखाने घेतला आहे.मुदतीत शेतकऱ्यांच्या हरकती नोंदविण्यासाठी एमएमआरडीए भूसंपादन विरोधी समितीच्या नेतृत्वाखाली गावोगावी शेतकऱ्यांच्या सभा,बैठका घेऊन जनजागृती करण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान हरकती नोंदविण्याची मुदत संपुष्टात येण्याआधीच लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत.यामुळे आचारसंहिताही लागु झाली आहे. त्यामुळे हरकती नोंदविण्यासाठी एकत्रित येणाऱ्या हजारोंच्या संख्येने उपस्थित राहाणाऱ्या शेतकऱ्यांमुळे आचारसंहितेच्या तरतूदींचा भंग होण्याची शक्यता आहे.ही बाब शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता असल्याने हरकती नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना आचारसंहिता संपुष्टात येण्याच्या तारखेपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी एमएमआरडीए भूसंपादन विरोधी समितीच्यावतीने शासनाकडे पत्राद्वारे करण्यात आली होती.मात्र नगररचना विभागाच्या सहसंचालक, जिल्हाधिकारी यांनी हरकती नोंदविण्याची मुदत संपत आली असतानाही मुदतवाढ देण्याबाबत अद्यापही कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.त्यामुळे मुदतवाढीची वाट न पाहता २७ मार्चला शेतकऱ्यांच्या हरकती नोंदविण्यासाठी कोकण भवन येथील नगररचना विभागाच्या सहसंचालकांच्या कार्यालयावर धडक देणार आहेत.यावेळी एमएमआरडीए भूसंपादन विरोधी समितीच्या माध्यमातून १२४ महसूली गावातील ३५००० शेतकऱ्यांच्या हरकती नोंदविण्यात येणार आहेत.या दरम्यान होणाऱ्या परिणामांची जबाबदारी पुर्णपणे नगररचना विभागाच्या सहसंचालकांच्या यांच्यावर असणार असल्याची माहिती एमएमआरडीए भूसंपादन विरोधी समितीचे समन्वयक रुपेश पाटील यांनी दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईuran-acउरण