शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

राष्ट्रीय हरित लवादाचा फटकार

By admin | Updated: September 25, 2015 02:27 IST

पीएनपी जेटी विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर लवादाने दट्ट्या दिल्याने सरकारसह रायगड जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे

आविष्कार देसाई, अलिबागपीएनपी जेटी विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर लवादाने दट्ट्या दिल्याने सरकारसह रायगड जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नुकतीच पीएनपी जेटीची पाहणी केली. समितीचा अहवाल सरकारला लवकरच सादर करण्यासाठी प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. याबाबतची अंतिम सुनावणी ३० नोव्हेंबरला होणार आहे.सरकारने सुमारे ८० च्या दशकामध्ये मेरीटाईम बोर्डाला मोठ्या संख्येने जमीन भाडेपट्ट्याने दिली होती. जिल्ह्यात नव्याने बंदरांचा विकास व्हावा यासाठी मेरीटाईम बोर्डाने त्यांच्या वाटेला आलेल्या जमिनीपैकी सुमारे ७० गुंठे जमीन पीएनपी जेटीला विकासाकरिता दिली होती. मात्र पीएनपीने जेटीचा विकास करताना दिलेल्या पेक्षा जास्त जमिनीचा वापर करणे, सीआरझेड कायद्याचा भंग, पर्यावरण कायद्याला पायदळी तुडविणे, अनधिकृत बांधकाम करणे, खारफुटीचा ऱ्हास करणे अन्य कायदे धाब्यावर बसविल्याबाबत सुरेंद्र ढवळे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे सप्टेंबर २०१४ मध्ये तक्रार दाखल केली होती. २३ सप्टेंबर २०१५ ला सुनावणी झाली. सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.राज्य सरकारला यामध्ये पार्टी करण्यात आल्याने खरी परिस्थिती काय आहे याची विचारणा सरकारने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना केली. त्यावर अपर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने १० सप्टेंबर २०१५ ला धरमतर परिसरात पीएनपी जेटीची पाहणी केली. शिंदे हेच त्यावेळी गैरहजर होते. मेरीटाईम बोर्डाचे अधिकाऱ्यांनी दांडी मारली होती. अलिबाग तहसीलदार, पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संबंधित विभागाचा अहवाल समितीचे अध्यक्ष प्रवीण शिंदे यांना लवकरच देण्यात येईल त्यानंतर जिल्हाधिकारी उगले अहवाल सादर करतील, असेही तहसीलदार सकपाळ यांनी सांगितले.