शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पूरस्थिती निवारण्यासाठी नदी नियामक क्षेत्र पुन्हा लागू करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र 

By नारायण जाधव | Updated: July 8, 2024 18:28 IST

तुम्ही निसर्गावर आक्रमण करतात तेव्हा त्यापेक्षा अधिक वेगाने निसर्ग त्याची परतफेड करतो, असे नॅट कनेक्ट फाउंडेशनचे बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

नवी मुंबई : गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे शहापूर, कल्याण, बदलापूर, पनवेल, कळंबोली परिसरात नद्यांना आलेल्या पुरामुळे पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते व रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

महाराष्ट्र सरकारने मूठभर उद्योजक आणि बिल्डरांच्या हितासाठी नदी नियामक क्षेत्राचे बंधन २०१५ मध्ये मोडीत काढल्यानेच हे नुकसान झाले आहे. यामुळे नदी नियामक क्षेत्र पुन्हा लागू करावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

पनेवल, कळंबोली आणि शहापूर, बदलापूर परिसरात नद्यांच्या पुराचे पाणी शहरांमध्ये शिरल्यानंतर नवी मुंबईतील नॅट कनेक्ट फाउंडेशनने तातडीने पत्र लिहून नदी नियामक क्षेत्र पुन्हा लागू करावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केली आहे.

नदी नियामक क्षेत्र रद्द केल्यानंतर बदलापूर, शीळ फाटा आणि चिपळूणमधील पूरस्थितीनंतर नदीकाठावरील विकास निर्बंध सौम्य करण्याबाबत आम्ही सरकारला इशारा दिला आहे, तरीही अधिकारी धडा शिकताना दिसत नाहीत. तुम्ही निसर्गावर आक्रमण करतात तेव्हा त्यापेक्षा अधिक वेगाने निसर्ग त्याची परतफेड करतो, असे नॅट कनेक्ट फाउंडेशनचे बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे