शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

किरीट सोमय्यांमुळे राजन विचारे गॅसवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 01:57 IST

दिलजमाई ठरली औटघटकेची । भाजपा नेतृत्वाच्या आदेशावरून नगरसेवकांनी मारली कोलांटउडी

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्यावर नाराज असलेल्या २३ भाजपा नगरसेवकांचे मन वळवण्याकरिता झालेल्या बैठकीतील दिलजमाईच्या निर्णयाची शाई वाळण्यापूर्वी या नगरसेवकांनी पुन्हा बंडाचा झेंडा फडकावण्यामागे शेजारील ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीचे इच्छुक उमेदवार किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेकडून सुरू असलेला विरोध हेच कारण आहे. सेनेने सोमय्या यांना गॅसवर ठेवल्याने भाजपाने विचारे यांना गॅसवर ठेवले. अर्थात, ईशान्य मुंबईतील उमेदवारीवरून सुरू असलेला वाद चिघळला, तर त्याचे पडसाद हे ठाणे व पालघर जिल्ह्णांतील लोकसभा मतदारसंघांत उमटण्याची चिन्हे आहेत.

विचारे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी भाजपाच्या २३ नगरसेवकांनी केली होती. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेऊन खोपट येथील भाजपा पक्ष कार्यालयात समन्वय बैठक घेऊन नगरसेवकांचे आणि विचारे यांचे मनोमिलन घडवून आणले होते. मात्र, त्याचवेळी शेजारील ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे इच्छुक उमेदवार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला ‘मातोश्री’वरून कडाडून विरोध सुरू झाला. सोमय्या यांना भेटीची वेळ दिली जावी, याकरिता भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी दोनवेळा मातोश्रीची पायरी चढली. मात्र, त्यांच्या पदरी निराशा आली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोमय्या व लाड यांची एक बैठक मुंबईत झाली. त्यानंतर, अचानक ठाण्यातील भाजपाचे थंड झालेले नगरसेवक पुन्हा बंडाचे झेंडे घेऊन उभे राहिले. शुक्रवारी त्यापैकी २१ नगरसेवकांनी मनोमिलन बैठकीला हजर राहिलेल्या नारायण पवार यांच्यावर तोंडसुख घेतले. पवार यांनीही पुन्हा आम्ही सर्व नगरसेवक एकत्र असून युतीच्या बैठकीवर बहिष्कार घालत असल्याचे जाहीर केले. सोमय्या यांना शिवसेनेचा विरोध डावलून उमेदवारी दिली, तर आपण त्यांच्याविरोधात निवडणूक लढवू, असा इशारा शिवसेना खा. संजय राऊत यांचे बंधू आ. सुनील राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे सोमय्या यांना समजा भाजपाने उमेदवारी दिली, तरी शिवसैनिक त्यांना साथ देणार नाहीत, हेच राऊत यांनी जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत ठाणे लोकसभा मतदारसंघात आपणच का शिवसेनेला आलिंगन द्यायचे. जर ते सोमय्या यांना पटकणार असतील, तर आपणही विचारे यांना पटकू शकतो, अशा भावनेतून भाजपाच्या उच्चपदस्थ नेत्यांच्या संकेतावरून ठाण्यातील भाजपा नगरसेवकांनी मनोमिलनाच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली आहे, असे समजते.वादाचे दूरगामी परिणाम होणारसोमय्या यांना शिवसेनेचा विरोध कायम राहिला व त्यामुळे उमेदवार बदलला गेला, तर भाजपा व रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांच्या मनातील शिवसेनेवरील राग अधिक घट्ट होईल. ‘चौकीदार चोर है’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेमुळे अगोदरच भाजपाचा कार्यकर्ता दुखावला आहे. त्यात सोमय्या यांना उमेदवारी नाकारली गेली, तर त्या नाराजीचा परिणाम ठाणे व पालघर जिल्ह्णांतील लोकसभा निवडणुकीत दिसण्याची दाट शक्यता आहे. सोमय्या यांनीही शिवसेनेवर टीका करताना मर्यादाभंग केला असून थेट मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. अगोदर टीका करणारी शिवसेना सत्तेकरिता लाचार होऊन भाजपासोबत गेल्याची टीका सतत होत असून सेनेचा कट्टर मतदार उद्धव यांच्या घूमजावावर फारसा खूश नाही. त्या मतदाराला आपण पूर्णपणे झुकलेलो नाही, हे दाखवून देण्याकरिता सोमय्या यांना उमेदवारी न देण्याकरिता शिवसेना दबाव टाकत आहे. यामुळे सेनेचा मतदार कदाचित सुखावला, तरी भाजपाचा दुखावू शकतो व परस्परांमधील विसंवाद वाढला, तर ठाण्यात भाजपा विचारे यांच्याशी असहकार्य करील, तर भिवंडीत कपिल पाटील यांना सेनेच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो. डोंबिवलीतील संघाचे कार्यकर्ते हेही नाराजी व्यक्त करण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोमय्या यांची उमेदवारी ही युतीकरिता ठाण्यात नवी डोकेदुखी झाली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबईKirit Somaiyaकिरीट सोमय्या