शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

शहरातील रेल्वे स्थानकांसह प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 04:24 IST

नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानकांमध्ये अग्निरोधक यंत्रणा, तपासणी आदी सुरक्षा यंत्रणांचा अभाव असून रेल्वे स्थानकाच्या आवारात देखील फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे.

नवी मुंबईनवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानकांमध्ये अग्निरोधक यंत्रणा, तपासणी आदी सुरक्षा यंत्रणांचा अभाव असून रेल्वे स्थानकाच्या आवारात देखील फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. यामुळे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची आणि रेल्वे स्थानकांची सुरक्षा रामभरोसे आहे.नवी मुंबई शहर सिडकोने निर्माण करताना नागरिकांना दळणवळणासाठी रेल्वे सुरू केली. भविष्यात मुंबईप्रमाणे नवी मुंबई शहरात देखील लोकसंख्या वाढणार असल्याची दखल घेत अत्याधुनिक आणि सोयी-सुविधायुक्त रेल्वे स्थानकांची निर्मिती केली आहे. परंतु रेल्वे स्थानकांमधील सुरक्षा यंत्रणा अपुरी पडू लागली असून अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आगीसारख्या घटना घडल्यास कोणतीही प्राथमिक उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. स्थानकातील सुरक्षेच्या दृष्टीने अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आली होती, परंतु या यंत्रणेची देखभाल दुरु स्ती होत नसल्याने सदरची यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात आग लागण्यासारखी दुर्घटना घडल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक रेल्वे स्थानकांमध्ये सिडकोने व्यावसायिक गाळे, कार्यालये बांधली आहेत. यामध्ये विविध आयटी कंपन्यांची कार्यालये, खासगी व्यावसायिक कार्यालये, सिनेमा गृह, मॉल, शॉपिंग सेंटर, बँका, एटीएम, हॉटेल, फास्ट फूडचे स्टॉल आदी थाटण्यात आले आहेत. यामधील बºयाच ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. परंतु रेल्वे स्थानकामधील अनेक ठिकाणी फास्ट फूडचा व्यवसाय करणारे व्यावसायिक कोणतीही परवानगी न घेताच सर्रास घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करीत आहेत. त्यामुळे देखील एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. रेल्वे स्थानकात विविध विद्युत केबलचे जाळे पसरले असून त्याकडे देखील सिडकोचे दुर्लक्ष झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे स्थानकांमध्ये ठेवण्यात आलेल्या बंकरची देखील दुरवस्था झाली असून बंकरच्या आतील बाजूस कचºयाचे साम्राज्य पसरले आहे.रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेसाठी सिडकोने सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे, परंतु या सुरक्षा रक्षकांना न जुमानता स्थानकांच्या आवारात फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या तपासणीसाठी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.अग्निरोधक यंत्र चालविण्याचे अज्ञाननेरु ळ रेल्वे स्थानकातील द्वारका हॉटेलमध्ये काही महिन्यांपूर्वी आग लागली होती. यावेळी हॉटेलमधील कर्मचाºयांना अग्निरोधक यंत्रणा हाताळण्याची माहिती नसल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. तसाच प्रकार मागील आठवड्यात नेरु ळ रेल्वे स्थानकातील युनियन बँकेत लागलेल्या आगीवर देखील अग्निरोधक यंत्र हाताळण्याचे ज्ञान नसल्याने अग्निरोधक यंत्र असतानाही आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई