शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याला रेल्वे पोलिसांचे अभय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 05:00 IST

खोट्या सह्या घेवून जमिनीच्या व्यवहारात झालेल्या फसवणुकीत नेरुळच्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. परंतु आत्महत्येच्या घटनेला महिना होवून शिवाय सबळ पुरावे देवूनही रेल्वे पोलीस संबंधितावर कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मयत व्यक्तीच्या बहिणीने केला आहे.

नवी मुंबई - खोट्या सह्या घेवून जमिनीच्या व्यवहारात झालेल्या फसवणुकीत नेरुळच्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. परंतु आत्महत्येच्या घटनेला महिना होवून शिवाय सबळ पुरावे देवूनही रेल्वे पोलीस संबंधितावर कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मयत व्यक्तीच्या बहिणीने केला आहे. यामुळे मयत भावाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी वृद्धापकाळात पोलिसांविरोधात लढा उभारला आहे.आनंद भिलारे (५०) असे मयत व्यक्तीचे नाव असून, नात्यातील व्यक्तीनेच त्यांची फसवणूक केली आहे. काही कारणास्तव भिलारे यांना पैशाची गरज होती. यावेळी सदर नातेवाईकाने त्यांच्या सह्यांचा गैरवापर करून त्यांची फसवणूक केली आहे. हा प्रकार निदर्शनात आल्यानंतर भिलारे यांनी आपली जमीन परत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही त्यामुळे त्यांनी अमित इथापे या नातेवाइकाच्या नावे चिठ्ठी लिहून ५ मे रोजी नेरुळ रेल्वेस्थानकालगत रुळावर आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी व इथापे सोबत मेसेजवर झालेल्या चर्चेचे पुरावे रेल्वे पोलिसांकडे सोपवले. त्यानुसार आनंद भिलारे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाºयावर कारवाईची मागणी केली. याकरिता त्यांची वृद्ध बहीण पुष्पा गायकवाड या सातत्याने रेल्वे पोलिसांकडे प्रयत्न करत आहेत. मात्र वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक सुरेश पाटील यांनी ‘तपास सुरू आहे’ एवढेच उत्तर देवून आजवर निराशा केल्याचाही त्यांचा आरोप आहे.भिलारे यांनी आत्महत्येपूर्वी दिलेले पुरावे पुरेसे असतानाही नेमके कोणत्या कारणावरून पोलीस आरोपीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत याबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपास यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीसाठी धाव घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे पुष्पा गायकवाड म्हणाल्या.

टॅग्स :Suicideआत्महत्याrailwayरेल्वेPoliceपोलिस