शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघात वाढताहेत

By admin | Updated: July 25, 2016 02:57 IST

अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कितीही उपाय केले, तरीही अपघातांची संख्या थांबत नसल्याचे दिसते. मागील साडेतीन वर्षांत ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत झालेल्या प्राणांकित अपघातांत

पंकज रोडेकर,  ठाणेअपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कितीही उपाय केले, तरीही अपघातांची संख्या थांबत नसल्याचे दिसते. मागील साडेतीन वर्षांत ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत झालेल्या प्राणांकित अपघातांत १,२०९ जणांना आपले प्राण गमावावे लागले असून १ हजार ११९ जण जखमी झाले आहेत. तर, २०१३ या वर्षी मयत ३३३ होते. तो आकडा २०१५ मध्ये ३५७ वर तर २०१६ या वर्षातील जानेवारी ते जूनदरम्यान, १७१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. याचदरम्यान मृत बेवारसांची ओळख पटण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन ठाणे लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे स्थानकात बॅनरचा आधार घेतला आहे. ठाणे लोहमार्ग पोलिसांची हद्द कोपरी पुलापासून दिवा रेल्वे स्थानक ते दिव्यापासून निळजेपर्यंत आहे. ऐतिहासिक रेल्वे स्थानक असलेल्या ठाण्यातून रेल्वेतून दररोज ६ लाख प्रवासी ये-जा करतात. तसेच सकाळी आणि सायंकाळी अक्षरश: असणाऱ्या गर्दीमुळे प्रवासी लोकलला लटकून ये-जा करतात. त्यामुळे लोकलमधून पडण्याचे प्रमाण तसेच घाईगडबडीत रूळ ओलांडताना अपघात वाढले आहेत. ते रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या तरीसुद्धा गेल्या साडेतीन वर्षांत १ हजार २०९ जणांचा रेल्वे अपघातांत मृत्यू झाला असून १ हजार ११९ जखमी झाले. या अपघाती मृत्यू झालेल्यांमध्ये २५ ते ५० वयोगटांतील लोकांचा समावेश आहे. तसेच अपघातांत पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.