शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नवी मुंबईतील आरोग्य केंद्रात रेबीज लसीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 03:44 IST

 दिवसेंदिवस रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून श्वानदंशानंतर महापालिकेच्या वतीने विनाशुल्क रेबीज लसीकरण केले जाते.

नवी मुंबई - दिवसेंदिवस रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून श्वानदंशानंतर महापालिकेच्या वतीने विनाशुल्क रेबीज लसीकरण केले जाते. मात्र महापालिकेच्या दिघा, ऐरोली,घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरूळ आणि बेलापूर या आठ विभागातील प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात लसीकरणाची सुविधा नसल्यामुळे शेकडो श्वानदंश झालेल्या रु ग्णांची गैरसोय होत आहे.एप्रिल २०१७- ते मार्च २०१८ या अकरा महिन्यांच्या कालावधीत नवी मुंबईतून एकूण ४१६३ भटकी कुत्री पकडण्यात आली. त्यापैकी ३२२४ कुत्र्यांवर निर्बीजीकरण करण्यात आले. तर उर्वरित जखमी, चावरी आणि रोगी कुत्र्यांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. शहरात श्वानदंश होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. श्वानदंश झालेल्या रूग्णांवर महापालिकेच्या रूग्णालयात उपचार केले जातात. परंतु अनेक नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सद्यस्थितीमध्ये लस उपलब्ध होत नाही. महापालिकेच्या रूग्णालयाव्यतिरिक्त नागरी आरोग्य केंद्रात रेबीजची लस मिळत नसल्यामुळे श्वानदंश झालेल्या रुग्णाची परवड होत आहे. प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करण्याची मागणी घणसोली येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक दीपक दगडू पाटील यांनी महापालिका आयुक्त रामास्वामी एन.यांच्याकडे केली आहे.सद्यस्थितीमध्ये महापालिकेच्या बेलापूर, वाशी, ऐरोली आणि नेरूळ येथील रु ग्णालयात जावून रेबीजची लस टोचून घेण्यासाठी जावे लागत आहे. यासाठी पालिकेने श्वानदंश झालेल्या रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात ही सुविधा उपलब्ध करावी, असे पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या लेखी तक्र ारीत म्हटले आहे.नागरिकांचीही नाराजीश्वानदंश झालेल्या रुग्णांवर वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. तुटवड्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीमध्येही औषध खरेदी व आरोग्य विभागाच्या प्रत्येक कामाला तत्काळ मंजुरी दिली जाते. प्रशासनानेही दक्षता ठेवून औषधांची कमतरता भासू देवू नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.रेबीज लसीकरणाचा डोस एका वेळी आठ तासांच्या आत पाच रु ग्णांना द्यायचा असतो. नागरी आरोग्य केंद्रात श्वानदंश झालेले रु ग्ण कमी येत असल्यामुळे महापालिकेच्या हे रेबीज इंजेक्शनची सुविधा सर्व नागरी आरोग्य केंद्रात ठेवता येत नाही. त्यासाठी महापालिकेच्या वाशी, नेरूळ, बेलापूर आणि ऐरोली या चार रु ग्णालयात रेबीज लसीकरणाची सुविधा करण्यात आलेली आहे.- डॉ. दयानंद कटके,वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईHealthआरोग्य