शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महापालिकेत ‘त्या’ कर्मचाऱ्यांचे प्रश्न अधांतरीच; कामबंद आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 01:06 IST

तीन वर्षे लोटली तरी २३ ग्रामपंचायतींत कामगार वाऱ्यावर

पनवेल : पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर पूर्वाश्रमीच्या २३ ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांचे तात्पुरत्या स्वरूपात समावेशन महापालिकेत करण्यात आले होते. पालिकेच्या स्थापनेला तीन वर्षांचा कार्यकाळ लोटला तरीही अद्याप संबंधित कर्मचाºयांचा पालिकेत समावेश करण्यात न आल्याने संबंधित कर्मचाºयांच्या संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करीत आयुक्त गणेश देशमुख यांना पत्र लिहून कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.१ आॅक्टोबर २०१६ रोजी पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा समावेश महापालिकेत करण्यात आला. २३ ग्रामपंचायतीत ३२० कर्मचारी महापालिकेत काम करीत होते. कर्मचारी समावेशनासाठी नगरविकास विभागाने कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. महापालिकेचे समावेशन प्रकियेला जिल्हा परिषदेकडून आवश्यक सहकार्य न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया लांबली. सुरुवातीला महापालिकेने कर्मचाºयांचे सहा महिने पगारही रखडविले होते. दरम्यान, समितीने केलेल्या छाननीत २२ कर्मचाºयांची भरती बेकायदेशीर असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हा अहवाल नगरविकास विभागाला २५ जानेवारी २०१९ रोजी सादर करण्यात आला होता. २९७ कर्मचाºयांच्या समावेशावर शिक्कामोर्तब करण्यात येऊनही निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. यासाठी २० आॅगस्ट रोजी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांच्यासोबत बैठकही घेतली होती.म्युनिसिपल एम्पलॉइज युनियनच्या पदाधिकाºयांनी २३ आॅगस्ट २०१९ रोजी नगरविकास विभागाच्या अधिकाºयांशी भेट घेतली होती. कर्मचाºयांना महापालिकेत समाविष्ट करून घेण्याबाबत महापालिका प्रशासन, नगरविकास विभाग विलंब लावत असल्याचा आरोप कामगारनेते सुरेश ठाकूर यांनी केला होता. वारंवार टाळाटाळ करण्यात येत असल्याने १० जानेवारी रोजी कामगारांनी कुटुंबासह आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.३९ महिने उलटूनही कामगारांचा महत्त्वाचा प्रश्न सोडविला जात नसल्यामुळे प्रशासन आणि राज्याचा नगरविकास विभाग कर्मचाºयांच्या प्रश्नाबाबत गंभीर नसल्याचा आरोप कर्मचारी करीत आहेत. तीन महिन्यांपूर्वी काम बंद करण्याचे आंदोलन मागे घेतल्यानंतर कर्मचाºयांनी पुन्हा काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. आयुक्त गणेश देशमुख, मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र देऊन हा निर्णय जाहीर केला आहे. पनवेल महापालिका कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. २९७ कामगारांच्या समावेशाच्या मागणीसाठी १० जानेवारीपासून धरणे आंदोलन केले जाईल. २१ जानेवारीपर्यंत हा प्रश्न सुटला नाही, तर मात्र त्या दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा कामगारांनी दिलेल्या पत्रात करण्यात आलेला आहे.