शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

शहरात विद्यार्थी वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 23:17 IST

नियमित तपासणी आवश्यक : शाळा व्यवस्थापन समितीच्या दुर्लक्षामुळे अपघातांत वाढ

वैभव गायकर।लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : शहरातील पळस्पे फाटा परिसरात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूलव्हॅनला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. या घटनेत संपूर्ण व्हॅन जळून खाक झाली. चालकाच्या सतर्कतेमुळे व्हॅनमधील दोन विद्यार्थिनींना वेळीच खाली उतरवण्यात आल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षितरीत्या व्हावी, याकरिता शासन आदेशानुसार, प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करण्याची सक्ती करण्यात आली आहे. पनवेल परिसरात अनेक खासगी, अनुदानित शाळा असून विद्यार्थीसंख्या जवळपास एक लाख ६५ हजार इतकी आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये परिवहन समितीची स्थापना झाली आहे की नाही, याबाबत साशंकता आहे.

दहा वर्षांपूर्वी २० आॅगस्ट २००९ मध्येही एका शाळेच्या बसला आग लागल्याची घटना घडली होती. या अपघातात १५ विद्यार्थी गंभीररीत्या भाजले होते, तर सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरच राज्यभरात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत संताप व्यक्त करण्यात आला होता.पनवेल तालुक्यात एकूण ४३५ स्कूलव्हॅन तसेच ११५ च्या आसपास शाळेच्या बस कार्यान्वित आहेत. यातून दररोज हजारो विद्यार्थी प्रवास करतात. त्यामुळे या वाहनांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. प्रादेशिक परिवहन विभागामार्फत या वाहनांची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे. त्याच धर्तीवर प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने सुरक्षित आहेत की नाहीत? विद्यार्थ्यांना उद्भवणाºया समस्यांवर समितीद्वारे तोडगा काढलाजातो.

समितीवर एक प्रादेशिक परिवहन अधिकारी, एक वाहतूक पोलीस अधिकारी, शाळेतील मुख्याध्यापक तसेच पालकांच्या प्रतिनिधीचा समावेश असतो. मात्र, अनेक शाळांमध्ये ही समिती केवळ कागदावरच असल्याचे समोर आले आहे. एखादी दुर्घटना घडल्यास, परिवहन विभाग, वाहनचालकांना जबाबदार धरले जाते. मात्र, अशा घटना टाळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत शाळा प्रशासन तसेच पालकांची उदासीनता दिसून येत आहे.शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. शाळा प्रशासनासह पालकांनीही आपली जबाबदारी लक्षात घेतल्यास अशा घटना टाळता येणे शक्य आहे. मंगळवारच्या घटनेनंतर पनवेल प्रादेशिक परिवहन विभाग सतर्क झाला आहे. 

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनांची नियमित तपासणी केली जाते. नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर कारवाई सुरू आहे. मात्र, शासनाच्या आदेशाने स्थापन केलेल्या परिवहन समित्यांच्या मार्फतही नियमित बैठका घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापन व पालकांनीही आपली जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे.- हेमांगिनी पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल