शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:59 IST

रस्ता सुरक्षा अभियान : नियम अमलात आणण्याची गरज

नवी मुंबई : रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांमध्येही जनजागृती महत्त्वाची असल्याची भावना आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. त्याकरिता नागरिकांनी वाहतुकीचे नियम प्रत्यक्षात अमलात आणण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. वाशी येथे सारथी सुरक्षा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल रोड सेफ्टी उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या उपस्थित होत्या.

वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सारथी सुरक्षाचे प्रवक्ता विनय मोरे यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी प्रत्येक व्यक्तीने आपआपली जबाबदारी ओळखून वाहन चालवताना अथवा पायी चालताना खबरदारी घेतल्यास बऱ्याच प्रमाणात अपघातांना आळा बसेल, अशी भावना आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली. वाहन अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार तसेच वाहतूक पोलीस सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याकरिता अनेक उपक्रम, अभियाने राबवली जात आहेत; परंतु प्रत्यक्षात नागरिकांनी त्यातून बोध घेतला तरच ही अभियाने यशस्वी ठरतील असेही त्या म्हणाल्या. सदर कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, महाविद्यालयाचे प्राचार्य शिवणकर, प्रसिद्ध जादूगार सतीश देशमुख, किमया देशमुख, प्रसन्ना कुमार, विनय मोरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई