शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
4
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
5
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
6
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
7
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
8
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
9
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
10
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
11
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
12
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
13
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
14
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
15
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
17
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
18
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
19
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
20
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?

सागरी सुरक्षेला सुरक्षारक्षकांचे बळ

By admin | Updated: October 17, 2015 02:06 IST

सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी आता सुरक्षारक्षकांचे बळ घेण्यात आले आहे. याकरिता रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडून ६० प्रशिक्षित सुरक्षारक्षक पुरविण्यात आले आहेत

पनवेल : सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी आता सुरक्षारक्षकांचे बळ घेण्यात आले आहे. याकरिता रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडून ६० प्रशिक्षित सुरक्षारक्षक पुरविण्यात आले आहेत. २० ठिकाणी हे गार्ड गेल्या महिन्यापासून कर्तव्य बजावत आहेत. त्यांना राज्याच्या मत्स्यालय विभागाकडून हे वेतन देण्यात येणार आहे. रायगड सुरक्षारक्षक मंडळ या माध्यमातून पोलीस, गुप्तवार्ता, कोस्टल बोर्ड या विभागांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करीत असून, सुरक्षिततेची मोठी जबाबदारी स्वीकारली आहे.१९९३ ला मुंबईत जो बॉम्बस्फोट झाला होता, त्यावेळी श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी समुद्रकिनारी आरडीएक्स उतरविले होते. तसेच २६/११चे दहशतवादी समुद्रमार्गानेच आले होते. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने सागरी सुरक्षितेतवर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे.रायगड जिल्हा हा मुंबईपासून जवळ असून भौगोलिक स्थान असलेला महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. समुद्रमार्गे हे अंतर अवघे १८ किलोमीटर इतके आहे. त्यामुळे रायगडच्या सागरी सुरक्षेकरिता मोठा फौजफाटा वापरण्यात येत आहे. अडीच हजार मनुष्यबळ या ठिकाणी पहारा देत आहे. त्यांच्या मदतीसाठी १ सप्टेंबरपासून सागरी सुरक्षारक्षक काम करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील जो काही सागरी भाग आहे, त्यामध्ये २० ठिकाणे अतिसंवेदनशील आहेत. तिथे सुरक्षा देण्याकरिता तारापूरवाला मत्स्यालय आयुक्त कार्यालयाने सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षारक्षकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाला प्रस्ताव दिला. त्यानंतर चेअरमन श्याम जोशी यांनी पुढाकार घेऊन ६० सुरक्षारक्षकांची फळी तयार केली. मत्स्य विभागाने आमच्याकडे गार्डची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना ६० गार्ड आम्ही गेल्या महिन्यात दिले आहेत. या ठिकाणी काम करणे अतिशय आव्हानात्मक आहे, ती जबाबदारी आमचे गार्ड नक्की पार पाडतील. येणाऱ्या-जाणाऱ्या बोटींची नोंद ठेवणे, संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित पोलिसांना कळविणे यासारखी कामे सुरक्षारक्षकांना दिली आहेत.-श्याम जोशी, चेअरमन, रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ एका लॅण्डिंग पॉइंटवर तीन याप्रमाणे येथे एकूण ६० सुरक्षारक्षक पुरविण्यात आले आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता पाच पर्यवेक्षकसुद्धा तैनात केले आहेत. सुरक्षारक्षकांना वेतन, भत्ते मिळून १३,२२२; पर्यवेक्षकांना १४,१०० रु पयांचे वेतन मत्स्य आयुक्तालयाकडून देण्यात येणार आहे.