शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

सागरी सुरक्षेला सुरक्षारक्षकांचे बळ

By admin | Updated: October 17, 2015 02:06 IST

सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी आता सुरक्षारक्षकांचे बळ घेण्यात आले आहे. याकरिता रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडून ६० प्रशिक्षित सुरक्षारक्षक पुरविण्यात आले आहेत

पनवेल : सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी आता सुरक्षारक्षकांचे बळ घेण्यात आले आहे. याकरिता रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडून ६० प्रशिक्षित सुरक्षारक्षक पुरविण्यात आले आहेत. २० ठिकाणी हे गार्ड गेल्या महिन्यापासून कर्तव्य बजावत आहेत. त्यांना राज्याच्या मत्स्यालय विभागाकडून हे वेतन देण्यात येणार आहे. रायगड सुरक्षारक्षक मंडळ या माध्यमातून पोलीस, गुप्तवार्ता, कोस्टल बोर्ड या विभागांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करीत असून, सुरक्षिततेची मोठी जबाबदारी स्वीकारली आहे.१९९३ ला मुंबईत जो बॉम्बस्फोट झाला होता, त्यावेळी श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी समुद्रकिनारी आरडीएक्स उतरविले होते. तसेच २६/११चे दहशतवादी समुद्रमार्गानेच आले होते. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने सागरी सुरक्षितेतवर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे.रायगड जिल्हा हा मुंबईपासून जवळ असून भौगोलिक स्थान असलेला महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. समुद्रमार्गे हे अंतर अवघे १८ किलोमीटर इतके आहे. त्यामुळे रायगडच्या सागरी सुरक्षेकरिता मोठा फौजफाटा वापरण्यात येत आहे. अडीच हजार मनुष्यबळ या ठिकाणी पहारा देत आहे. त्यांच्या मदतीसाठी १ सप्टेंबरपासून सागरी सुरक्षारक्षक काम करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील जो काही सागरी भाग आहे, त्यामध्ये २० ठिकाणे अतिसंवेदनशील आहेत. तिथे सुरक्षा देण्याकरिता तारापूरवाला मत्स्यालय आयुक्त कार्यालयाने सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षारक्षकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाला प्रस्ताव दिला. त्यानंतर चेअरमन श्याम जोशी यांनी पुढाकार घेऊन ६० सुरक्षारक्षकांची फळी तयार केली. मत्स्य विभागाने आमच्याकडे गार्डची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना ६० गार्ड आम्ही गेल्या महिन्यात दिले आहेत. या ठिकाणी काम करणे अतिशय आव्हानात्मक आहे, ती जबाबदारी आमचे गार्ड नक्की पार पाडतील. येणाऱ्या-जाणाऱ्या बोटींची नोंद ठेवणे, संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित पोलिसांना कळविणे यासारखी कामे सुरक्षारक्षकांना दिली आहेत.-श्याम जोशी, चेअरमन, रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ एका लॅण्डिंग पॉइंटवर तीन याप्रमाणे येथे एकूण ६० सुरक्षारक्षक पुरविण्यात आले आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता पाच पर्यवेक्षकसुद्धा तैनात केले आहेत. सुरक्षारक्षकांना वेतन, भत्ते मिळून १३,२२२; पर्यवेक्षकांना १४,१०० रु पयांचे वेतन मत्स्य आयुक्तालयाकडून देण्यात येणार आहे.