शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

प्रकल्पग्रस्तांचा सिडकोवर मोर्चा, विमानतळबाधित ग्रामस्थ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 00:22 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सिडकोवर तिरडी मोर्चा काढला.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सिडकोवर तिरडी मोर्चा काढला. विमानतळ प्रकल्पासाठी आपली गावे आणि वडिलोपार्जित जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाकडे सिडकोकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत शेकडो प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या बेलापूर येथील कार्यालयावर हल्लाबोल केला.आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रकल्पपूर्व कामे वेगाने सुरू आहेत. २०२१ पर्यंत विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्धार सिडकोने केला आहे. विमानतळाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर झाले असले तरी प्रकल्पबाधित गावांचे काही प्रश्न अद्यापि धुमसत आहेत. त्यामुळे दहा गावांच्या स्थलांतराचा प्रश्न रखडला आहे. दहापैकी सहा गावांनी १०० टक्के स्थलांतर केले असले, तरी उर्वरित गणेशपुरी, उलवे तरघर व कोंबडभुजे या चार गावांतील काही ग्रामस्थ अद्यापि आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने त्यांनी स्थलांतराला विरोध दर्शविला आहे. याचा परिणाम म्हणून या गावांच्या गावठाणाबाहेरील बांधकामांना सिडकोने नोटिसा बजावल्या आहेत. ग्रामस्थांनी आपली बांधकामे स्वत:हून काढून टाकावीत, अन्यथा सिडकोच्या माध्यमातून ती पाडून टाकली जातील, असा इशारा या नोटिसाद्वारे देण्यात आला आहे. सिडकोच्या या भूमिकेचे तीव्र पडसाद या चार गावांतील ग्रामस्थांत उमटले आहेत. याचाच एक भाग म्हणून येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी तिरडी मोर्चा काढून सिडकोच्या उदासीनतेचा प्रतिकात्मक निषेध केला. मोर्चात चार गावांतील शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. विमानतळ प्रकल्पासाठी सिडकोने दहा गावांतील जमिनी संपादित केल्या आहेत. मात्र, पुनर्वसनाबाबत सिडकोकडून कार्यवाही होताना दिसत नाहीत. जाहीर केलेल्या पुनर्वसन पॅकेजमधील अनेक गोष्टींना बगल दिली जात आहे. ज्या गावांत मासेमारी केले जाते, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापि अधांतरी आहे. उद्याने, क्रीडांगणे, शाळा, समाजमंदिरे, स्मशानभूमी आदी सुविधांबाबत सिडकोकडून कार्यवाही केली जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. प्रलंबित प्रश्न सोडविण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाईच्या हालचाली सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.>वाघिवली गावाच्या स्थलांतराची घाई नाहीतरघर, कोंबडभुजे, उलवे, गणेशपुरी, वाघिवली वाडा, वरचे ओवळे, कोल्ही, कोपर आणि चिंचपाडा अशी स्थलांतरित झालेल्या नऊ गावांची नावे आहेत. या यादीतील वाघिवली हे दहावे गाव आहे. वाघिवली हे गाव विमानतळाच्या गाभा क्षेत्राबाहेर असल्याने त्याच्या स्थलांतराची सध्या सिडकोला घाई नाही, असे असले तरी या गावातील ग्रामस्थांनाही पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेअंतर्गत भूखंड व इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. भविष्यात वाघिवली गावाच्या ठिकाणी खारफुटीची लागवड करण्याची सिडकोची योजना आहे.>सिडकोच्या कारभाराचा प्रकल्पग्रस्तांना चांगलाच अनुभव आहे. ५० वर्षे उलटली तरी साडेबारा टक्के भूखंडांचे वाटप सुरूच आहे. सिडकोच्या या दिरंगाईचा फटका अनेक प्रकल्पग्रस्तांना बसला आहे. विमानतळबाधित गावांच्या पुनर्वसनावर अद्यापि कार्यवाही सुरू नाही. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ही वस्तुस्थिती असताना प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई करण्याचा घाट सिडकोने घातला आहे. त्याचा निषेध म्हणून तिरडी मोर्चा काढण्यात आला आहे.- अ‍ॅड. प्रशांत भोईर,अध्यक्ष, नांदाई माता चार गाव पुनर्वसन समिती