शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचा सिडकोवर मोर्चा, विमानतळबाधित ग्रामस्थ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 00:22 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सिडकोवर तिरडी मोर्चा काढला.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सिडकोवर तिरडी मोर्चा काढला. विमानतळ प्रकल्पासाठी आपली गावे आणि वडिलोपार्जित जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाकडे सिडकोकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत शेकडो प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या बेलापूर येथील कार्यालयावर हल्लाबोल केला.आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रकल्पपूर्व कामे वेगाने सुरू आहेत. २०२१ पर्यंत विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्धार सिडकोने केला आहे. विमानतळाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर झाले असले तरी प्रकल्पबाधित गावांचे काही प्रश्न अद्यापि धुमसत आहेत. त्यामुळे दहा गावांच्या स्थलांतराचा प्रश्न रखडला आहे. दहापैकी सहा गावांनी १०० टक्के स्थलांतर केले असले, तरी उर्वरित गणेशपुरी, उलवे तरघर व कोंबडभुजे या चार गावांतील काही ग्रामस्थ अद्यापि आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने त्यांनी स्थलांतराला विरोध दर्शविला आहे. याचा परिणाम म्हणून या गावांच्या गावठाणाबाहेरील बांधकामांना सिडकोने नोटिसा बजावल्या आहेत. ग्रामस्थांनी आपली बांधकामे स्वत:हून काढून टाकावीत, अन्यथा सिडकोच्या माध्यमातून ती पाडून टाकली जातील, असा इशारा या नोटिसाद्वारे देण्यात आला आहे. सिडकोच्या या भूमिकेचे तीव्र पडसाद या चार गावांतील ग्रामस्थांत उमटले आहेत. याचाच एक भाग म्हणून येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी तिरडी मोर्चा काढून सिडकोच्या उदासीनतेचा प्रतिकात्मक निषेध केला. मोर्चात चार गावांतील शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. विमानतळ प्रकल्पासाठी सिडकोने दहा गावांतील जमिनी संपादित केल्या आहेत. मात्र, पुनर्वसनाबाबत सिडकोकडून कार्यवाही होताना दिसत नाहीत. जाहीर केलेल्या पुनर्वसन पॅकेजमधील अनेक गोष्टींना बगल दिली जात आहे. ज्या गावांत मासेमारी केले जाते, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापि अधांतरी आहे. उद्याने, क्रीडांगणे, शाळा, समाजमंदिरे, स्मशानभूमी आदी सुविधांबाबत सिडकोकडून कार्यवाही केली जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. प्रलंबित प्रश्न सोडविण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाईच्या हालचाली सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.>वाघिवली गावाच्या स्थलांतराची घाई नाहीतरघर, कोंबडभुजे, उलवे, गणेशपुरी, वाघिवली वाडा, वरचे ओवळे, कोल्ही, कोपर आणि चिंचपाडा अशी स्थलांतरित झालेल्या नऊ गावांची नावे आहेत. या यादीतील वाघिवली हे दहावे गाव आहे. वाघिवली हे गाव विमानतळाच्या गाभा क्षेत्राबाहेर असल्याने त्याच्या स्थलांतराची सध्या सिडकोला घाई नाही, असे असले तरी या गावातील ग्रामस्थांनाही पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेअंतर्गत भूखंड व इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. भविष्यात वाघिवली गावाच्या ठिकाणी खारफुटीची लागवड करण्याची सिडकोची योजना आहे.>सिडकोच्या कारभाराचा प्रकल्पग्रस्तांना चांगलाच अनुभव आहे. ५० वर्षे उलटली तरी साडेबारा टक्के भूखंडांचे वाटप सुरूच आहे. सिडकोच्या या दिरंगाईचा फटका अनेक प्रकल्पग्रस्तांना बसला आहे. विमानतळबाधित गावांच्या पुनर्वसनावर अद्यापि कार्यवाही सुरू नाही. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ही वस्तुस्थिती असताना प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई करण्याचा घाट सिडकोने घातला आहे. त्याचा निषेध म्हणून तिरडी मोर्चा काढण्यात आला आहे.- अ‍ॅड. प्रशांत भोईर,अध्यक्ष, नांदाई माता चार गाव पुनर्वसन समिती