शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

न्याय्य हक्कासाठी प्रकल्पग्रस्त पुन्हा एकवटले, खारघरमध्ये बैठक संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 03:18 IST

नवी मुंबईच्या निर्मितीसाठी ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यातील ९५ गावांतील शेतकऱ्यांच्या १०० टक्के जमिनी संपादित करण्यात आल्या.

पनवेल : नवी मुंबईच्या निर्मितीसाठी ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यातील ९५ गावांतील शेतकऱ्यांच्या १०० टक्के जमिनी संपादित करण्यात आल्या. जमिनी संपादित करताना राज्य सरकारकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे आजही प्रकल्पग्रस्तांना अपेक्षित आयुष्य जगावे लागत आहे. मागील ४० वर्षांपासून आपल्या न्याय्य हक्कासाठी झगडणाºया प्रकल्पग्रस्तांनी आता पुन्हा लढ्याची हाक दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी ९५ गाव संघर्ष समितीच्या वतीने खारघर येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.खारघरमधील कोपरा गावातील समाजमंदिरात रविवारी नवी मुंबई प्रकल्पबाधित ९५ गाव संघर्ष समितीची ही बैठक पार पडली. या वेळी प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करण्यासाठी माजी न्यायमूर्ती बी. एल. वाघमारे व अ‍ॅड. सुरेश ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राजकारणविरहित संघटना स्थापित करून प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर लढा देण्याचे काम संघटनेमार्फत केले जाणार आहे.या वेळी मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. गावठाण प्रश्न, गरजेपोटी घरे, साडेबारा टक्के भूखंड, गावठाण विस्तार, नैना, एमआयडीसी आदी प्रकल्पग्रस्तांना उद्ध्वस्त करणाºया प्रकल्पावर या ठिकाणी चर्चा करण्यात आली.सध्याच्या घडीला गावोगावी बैठका घेऊन प्रकल्पग्रस्तांना जागृत करण्याचे काम ही संघटना करीत आहे. या वेळी न्यायमूर्ती वाघमारे यांनी स्थानिकांच्या प्रश्नाबाबत सर्वांना माहिती करून दिली.प्रकल्पग्रस्तांना हक्क मिळवून देण्यासाठी स्थानिक वकिलांनीही पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. अ‍ॅडव्होकेट सुरेश ठाकूर यांनीदेखील मोलाचे मार्गदर्शन केले, या वेळी उपस्थितांमध्ये रवि पाटील, दशरथ भगत, प्रशांत पाटील, गोपाळ पाटील, गुरु नाथ गायकर, संतोष गायकर, रवींद्र भगत, संतोष पवार, सुधाकर पाटील, रमाकांत पाटील, संतोष तांबोळी, रोहिदास गायकर, अ‍ॅडव्होकेट प्रियांका ठाकूर आदीसह मोठ्या संख्येने प्रकल्पगस्त सर्वपक्षीय नेते, नागरिक उपस्थित होते. या बैठकीत स्थानिक प्रकल्पग्रस्त नेत्यांवर काही वक्त्यांनी टीका केली. स्वत:च्या फायद्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा वापर केला जातो, हा आरोपदेखील या वेळी करण्यात आला.या संघटनेमार्फत एक कोअर कमिटीची स्थापना करून सिडकोसोबत चर्चा करण्याचे या बैठकीत ठरले. यापुढे सिडको सोबत कायदेशीर लढा देण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. अशा प्रकारच्या गावोगावी बैठकीचे आयोजन सुरूच ठेवणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई