शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

न्याय्य हक्कासाठी प्रकल्पग्रस्त पुन्हा एकवटले, खारघरमध्ये बैठक संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 03:18 IST

नवी मुंबईच्या निर्मितीसाठी ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यातील ९५ गावांतील शेतकऱ्यांच्या १०० टक्के जमिनी संपादित करण्यात आल्या.

पनवेल : नवी मुंबईच्या निर्मितीसाठी ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यातील ९५ गावांतील शेतकऱ्यांच्या १०० टक्के जमिनी संपादित करण्यात आल्या. जमिनी संपादित करताना राज्य सरकारकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे आजही प्रकल्पग्रस्तांना अपेक्षित आयुष्य जगावे लागत आहे. मागील ४० वर्षांपासून आपल्या न्याय्य हक्कासाठी झगडणाºया प्रकल्पग्रस्तांनी आता पुन्हा लढ्याची हाक दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी ९५ गाव संघर्ष समितीच्या वतीने खारघर येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.खारघरमधील कोपरा गावातील समाजमंदिरात रविवारी नवी मुंबई प्रकल्पबाधित ९५ गाव संघर्ष समितीची ही बैठक पार पडली. या वेळी प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करण्यासाठी माजी न्यायमूर्ती बी. एल. वाघमारे व अ‍ॅड. सुरेश ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राजकारणविरहित संघटना स्थापित करून प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर लढा देण्याचे काम संघटनेमार्फत केले जाणार आहे.या वेळी मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. गावठाण प्रश्न, गरजेपोटी घरे, साडेबारा टक्के भूखंड, गावठाण विस्तार, नैना, एमआयडीसी आदी प्रकल्पग्रस्तांना उद्ध्वस्त करणाºया प्रकल्पावर या ठिकाणी चर्चा करण्यात आली.सध्याच्या घडीला गावोगावी बैठका घेऊन प्रकल्पग्रस्तांना जागृत करण्याचे काम ही संघटना करीत आहे. या वेळी न्यायमूर्ती वाघमारे यांनी स्थानिकांच्या प्रश्नाबाबत सर्वांना माहिती करून दिली.प्रकल्पग्रस्तांना हक्क मिळवून देण्यासाठी स्थानिक वकिलांनीही पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. अ‍ॅडव्होकेट सुरेश ठाकूर यांनीदेखील मोलाचे मार्गदर्शन केले, या वेळी उपस्थितांमध्ये रवि पाटील, दशरथ भगत, प्रशांत पाटील, गोपाळ पाटील, गुरु नाथ गायकर, संतोष गायकर, रवींद्र भगत, संतोष पवार, सुधाकर पाटील, रमाकांत पाटील, संतोष तांबोळी, रोहिदास गायकर, अ‍ॅडव्होकेट प्रियांका ठाकूर आदीसह मोठ्या संख्येने प्रकल्पगस्त सर्वपक्षीय नेते, नागरिक उपस्थित होते. या बैठकीत स्थानिक प्रकल्पग्रस्त नेत्यांवर काही वक्त्यांनी टीका केली. स्वत:च्या फायद्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा वापर केला जातो, हा आरोपदेखील या वेळी करण्यात आला.या संघटनेमार्फत एक कोअर कमिटीची स्थापना करून सिडकोसोबत चर्चा करण्याचे या बैठकीत ठरले. यापुढे सिडको सोबत कायदेशीर लढा देण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. अशा प्रकारच्या गावोगावी बैठकीचे आयोजन सुरूच ठेवणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई